शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

सत्तेचा दुरुपयोग, विरोधकांकडून सुडाचे राजकारण - जयंत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2022 18:42 IST

Jayant Patil : विरोधात बोलणार्‍यांना तपास यंत्राणांमार्फत अटक करून कारवाई करण्याचा प्रकार विरोधकांनी चालू केला आहे. याबाबत जनता सुज्ञ आहे वेळ येताच जनता धडा शिकवेल, असे म्हणत जयंत पाटील यांनी विरोधकांवर निशाणा साधला. 

सोलापूर : सत्तेचा दुरुपयोग विरोधक कसा करतात, हे राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या अटकेवरून दिसून येत आहे, असा आरोप राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी करमाळा येथील परिसंवाद कार्यक्रमात बोलताना केला आहे. आतापर्यंत विरोधकांनी सुडाचे राजकारण सुरू केले आहे. अनेक सरकारे आली आणि गेली कोणीही सत्तेवर आले, तरी असे कायम टिकत नाही. सध्या सुडाचे राजकारण चालू आहे. विरोधात बोलणार्‍यांना तपास यंत्राणांमार्फत अटक करून कारवाई करण्याचा प्रकार विरोधकांनी चालू केला आहे. याबाबत जनता सुज्ञ आहे वेळ येताच जनता धडा शिकवेल, असे म्हणत जयंत पाटील यांनी विरोधकांवर निशाणा साधला. 

आमदार संजय मामा शिंदे यांच्या करमाळा येथील संपर्क कार्यालय समोर राष्ट्रवादी काँग्रेसची परिसंवाद आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या आढावा बैठकीत जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. यावेळी अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेमुळे जयंत पाटील हे उद्विग्न  झाल्याचे दिसत होते. जनता याबाबत योग्य ते निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. गेल्या काही महिन्यापासून केंद्र सरकारी तपास यंत्रणाच्या माध्यमातून कशा दुरुपयोग करते, विरोधकांना कशी अडकवते याविषयी पुराव्यानिशीनवाब मलिक यांनी अख्ख्या देशाला उघड करून दाखवले होते, याचा सूड विरोधकांनी अशा प्रकारातून व्यक्त केल्याचे दिसते, असे जयंत पाटील म्हणाले. 

तसेच, यावेळी व्यासपीठावरील माजी आमदार जयवंतराव जगताप यांना तसेच राष्ट्रवादी काँग्रेस समर्थक आमदार संजय मामा शिंदे यांना पेचात टाकणारे प्रश्न उपस्थित केले. संजय मामा शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपण सहभागी होऊन जिल्ह्याचे नेतृत्व करण्याची खुली ऑफर कार्यक्रमादरम्यान दिली. याचबरोबर, संजय मामा शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत असे कार्यकर्त्यांच्या गळ्यातील गमजा घेऊन व्यासपीठावरील एका पदाधिकाऱ्याने संजय मामा शिंदे यांच्या गळ्यात घालून सन्मान करण्याचा विनंती केली होती. त्यावेळी जयंत पाटील यांनी संजय मामा हे राष्ट्रवादीचेच आहेत त्यांना राष्ट्रवादीचा गमजा घालण्याची काही आवश्यकता नाही असे व्यासपीठावरून सांगितले. तसेच, आज माझा सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील शेवटचा कार्यक्रम आटपून इंदापूरकडे रवाना होणार आहे, असे जयंत पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलSolapurसोलापूर