शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

सत्तेचा दुरुपयोग, विरोधकांकडून सुडाचे राजकारण - जयंत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2022 18:42 IST

Jayant Patil : विरोधात बोलणार्‍यांना तपास यंत्राणांमार्फत अटक करून कारवाई करण्याचा प्रकार विरोधकांनी चालू केला आहे. याबाबत जनता सुज्ञ आहे वेळ येताच जनता धडा शिकवेल, असे म्हणत जयंत पाटील यांनी विरोधकांवर निशाणा साधला. 

सोलापूर : सत्तेचा दुरुपयोग विरोधक कसा करतात, हे राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या अटकेवरून दिसून येत आहे, असा आरोप राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी करमाळा येथील परिसंवाद कार्यक्रमात बोलताना केला आहे. आतापर्यंत विरोधकांनी सुडाचे राजकारण सुरू केले आहे. अनेक सरकारे आली आणि गेली कोणीही सत्तेवर आले, तरी असे कायम टिकत नाही. सध्या सुडाचे राजकारण चालू आहे. विरोधात बोलणार्‍यांना तपास यंत्राणांमार्फत अटक करून कारवाई करण्याचा प्रकार विरोधकांनी चालू केला आहे. याबाबत जनता सुज्ञ आहे वेळ येताच जनता धडा शिकवेल, असे म्हणत जयंत पाटील यांनी विरोधकांवर निशाणा साधला. 

आमदार संजय मामा शिंदे यांच्या करमाळा येथील संपर्क कार्यालय समोर राष्ट्रवादी काँग्रेसची परिसंवाद आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या आढावा बैठकीत जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. यावेळी अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेमुळे जयंत पाटील हे उद्विग्न  झाल्याचे दिसत होते. जनता याबाबत योग्य ते निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. गेल्या काही महिन्यापासून केंद्र सरकारी तपास यंत्रणाच्या माध्यमातून कशा दुरुपयोग करते, विरोधकांना कशी अडकवते याविषयी पुराव्यानिशीनवाब मलिक यांनी अख्ख्या देशाला उघड करून दाखवले होते, याचा सूड विरोधकांनी अशा प्रकारातून व्यक्त केल्याचे दिसते, असे जयंत पाटील म्हणाले. 

तसेच, यावेळी व्यासपीठावरील माजी आमदार जयवंतराव जगताप यांना तसेच राष्ट्रवादी काँग्रेस समर्थक आमदार संजय मामा शिंदे यांना पेचात टाकणारे प्रश्न उपस्थित केले. संजय मामा शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपण सहभागी होऊन जिल्ह्याचे नेतृत्व करण्याची खुली ऑफर कार्यक्रमादरम्यान दिली. याचबरोबर, संजय मामा शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत असे कार्यकर्त्यांच्या गळ्यातील गमजा घेऊन व्यासपीठावरील एका पदाधिकाऱ्याने संजय मामा शिंदे यांच्या गळ्यात घालून सन्मान करण्याचा विनंती केली होती. त्यावेळी जयंत पाटील यांनी संजय मामा हे राष्ट्रवादीचेच आहेत त्यांना राष्ट्रवादीचा गमजा घालण्याची काही आवश्यकता नाही असे व्यासपीठावरून सांगितले. तसेच, आज माझा सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील शेवटचा कार्यक्रम आटपून इंदापूरकडे रवाना होणार आहे, असे जयंत पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलSolapurसोलापूर