शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

एल्गार प्रकरणात तपास करणाऱ्यांची चौकशी करण्यात यावी : जयंत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2020 15:26 IST

अनेकांना नाहक तुरुंगात डांबले. त्यामुळे या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी चौकशी एसआयटीमार्फत व्हायला हवी, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.

मुंबई : एल्गार परिषदेच्या वेळेस जे गैरहजर होते त्यांच्याविरोधातही एल्गार परिषदेच्या संदर्भातील गुन्हे दाखल केले गेले. समाजातील ख्यातनाम लेखक, कलावंत तसेच ज्यांची प्रतिभा यापूर्वी समाजामध्ये सिद्ध झाली आहे, अशा लोकांची नावंही आरोपींमध्ये असणे, हे अत्यंत धक्कादायक असल्याचं राष्ट्रवादीचे नेते आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी म्हंटल आहे.

जयंत पाटील म्हणाले की, पुण्यात आयोजित एल्गार परिषदेत शंभर पेक्षा अधिक संघटना सामील झाल्या होत्या. मात्र कार्यक्रमाला हजर नसलेले अनेक विचारवंत, लेखक, कलाकार यांचेही नाव या प्रकरणात घेण्यात आले. अनेकांना नाहक तुरुंगात डांबले. त्यामुळे या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी चौकशी एसआयटीमार्फत व्हायला हवी, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.

तसेच तपास करणाऱ्यांची दृष्टी आणि डोकी शंका निर्माण करणारी आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने तपास करणाऱ्यांच्या चौकशीची भूमिका घेतलेली आहे. तर यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी लवकरच चर्चा केली जाईल आणि कुठल्याही अडचणी येऊ न देता निर्णय घेण्यात येईल, असेही जयंत पाटील यावेळी म्हणाले.

तर एल्गार परिषद प्रकरणात अनेकांना विनाकारण गोवण्यात आलं आहे. तिथं उपस्थित नसलेल्यांवरदेखील गुन्हे दाखल करण्यात आले. मागच्या सरकारनं त्यांच्या अधिकारांचा गैरवापर केला. यात त्यांना काही पोलिसांनीदेखील साथ दिली. त्यामुळे या प्रकरणात आक्षेपार्ह वर्तन करणाऱ्या पोलिसांची चौकशी व्हायलाच हवी. तसा अधिकार राज्य सरकारला आहे. एल्गार प्रकरणात मागच्या सरकारनं जे केलं, ते लोकांसमोर यायला हवं, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे.