शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

एल्गार प्रकरणात तपास करणाऱ्यांची चौकशी करण्यात यावी : जयंत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2020 15:26 IST

अनेकांना नाहक तुरुंगात डांबले. त्यामुळे या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी चौकशी एसआयटीमार्फत व्हायला हवी, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.

मुंबई : एल्गार परिषदेच्या वेळेस जे गैरहजर होते त्यांच्याविरोधातही एल्गार परिषदेच्या संदर्भातील गुन्हे दाखल केले गेले. समाजातील ख्यातनाम लेखक, कलावंत तसेच ज्यांची प्रतिभा यापूर्वी समाजामध्ये सिद्ध झाली आहे, अशा लोकांची नावंही आरोपींमध्ये असणे, हे अत्यंत धक्कादायक असल्याचं राष्ट्रवादीचे नेते आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी म्हंटल आहे.

जयंत पाटील म्हणाले की, पुण्यात आयोजित एल्गार परिषदेत शंभर पेक्षा अधिक संघटना सामील झाल्या होत्या. मात्र कार्यक्रमाला हजर नसलेले अनेक विचारवंत, लेखक, कलाकार यांचेही नाव या प्रकरणात घेण्यात आले. अनेकांना नाहक तुरुंगात डांबले. त्यामुळे या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी चौकशी एसआयटीमार्फत व्हायला हवी, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.

तसेच तपास करणाऱ्यांची दृष्टी आणि डोकी शंका निर्माण करणारी आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने तपास करणाऱ्यांच्या चौकशीची भूमिका घेतलेली आहे. तर यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी लवकरच चर्चा केली जाईल आणि कुठल्याही अडचणी येऊ न देता निर्णय घेण्यात येईल, असेही जयंत पाटील यावेळी म्हणाले.

तर एल्गार परिषद प्रकरणात अनेकांना विनाकारण गोवण्यात आलं आहे. तिथं उपस्थित नसलेल्यांवरदेखील गुन्हे दाखल करण्यात आले. मागच्या सरकारनं त्यांच्या अधिकारांचा गैरवापर केला. यात त्यांना काही पोलिसांनीदेखील साथ दिली. त्यामुळे या प्रकरणात आक्षेपार्ह वर्तन करणाऱ्या पोलिसांची चौकशी व्हायलाच हवी. तसा अधिकार राज्य सरकारला आहे. एल्गार प्रकरणात मागच्या सरकारनं जे केलं, ते लोकांसमोर यायला हवं, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे.