शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
2
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
3
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
4
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले
5
आयुष्य कसं वळणं घेईल? काहीच सांगता येत नाही; एक स्वप्न तुटलं, सोनम राजला भेटली अन्...! मग त्याच्यासाठी केलं एवढं मोठं कांड!
6
'...तर पाकिस्तानात घुसून हल्ला करू', परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा पाकिस्तानला थेट इशारा
7
Video - "हनिमूनवरुन जिवंत परतणं ही मोठी कामगिरी..."; सोनम-राजा प्रकरणावर मीम्स व्हायरल
8
राजा रघुवंशीची हत्या, सोनम झालेली बेपत्ता; एकाच वेळी १२० पोलीस करत होते 'ऑपरेशन हनिमून'!
9
सॉफ्टवेअर इंजिनिअर झटक्यात कोडिंग करायला गेले अन् चॅटजीपीटी बंद पडले! भारतीय युजर वैतागले 
10
CM फडणवीसांची नितेश राणेंना कठोर शब्दांत समज; म्हणाले, “तुमच्या मनात काही असले तरी...”
11
...अन् १४ चिनी नागरिकांचा जीव वाचला; चीननं मानले भारतीय नौदल आणि मुंबई कोस्ट गार्डचे आभार
12
बालपणीचे मित्र, इंदूरमधला कॅफे...राजाच्या हत्येसाठी राजने ३ मित्रांना कसं तयार केले?
13
जग बेलआऊटवर बेलआऊट पॅकेज देतेय, पाकिस्तानी सैन्य ते पैसे खातेय; वर्ल्ड बँकेनेच पाकिस्तानला उघडे केले...
14
हनिमून ते राजाची हत्या...; मेघालय पोलिसांनी विचारलेल्या 'या' १३ प्रश्नांनी उडवली सोनमची झोप!
15
बाबो! बोल्ड फोटोज आणि व्हिडिओज विकून खुशीने कमावले तब्बल १० कोटी, म्हणाली...
16
MS धोनीसंदर्भात व्यक्त होताना शास्त्रींना आठवला 'पाकीटमार'; म्हणाले... (VIDEO)
17
सात जन्मांची साथ..., हत्या केल्यानंतर सोनमने राजाच्या अकाउंवरून शेअर केली अशी पोस्ट, पण ती एक चूक नडली, पोलिसांना आला संशय
18
खतरनाक! सोशल मीडियावर प्रसिद्ध होणं बेतलं १९ वर्षीय मुलीच्या जीवावर; काय आहे डस्टिंग चॅलेंज?
19
विजेच्या धक्क्याने बाप गेलाच, दोन्ही मुलं पाणी घेऊन आली अन् त्यांचेही आयुष्य संपलं!
20
'सोनम रघुवंशी म्हणत होती बिझी आहे, त्याला समजलंच नाही...!'; राजा रघुवंशीच्या मित्रानं केला मोठा खुलासा

वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2024 19:31 IST

Devendra Fadnavis: जयंत पाटलांनी भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही गंभीर आरोप केला आहे.

Jayant Patil Speech ( Marathi News ) : नाशिक जिल्ह्यातील नाशिक लोकसभा मतदारसंघ आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघात आज महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. मविआ उमेदवार राजाभाऊ वाझे आणि भास्कर भगरे यांचे अर्ज दाखल करताना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित होते. यावेळी भाषण करताना जयंत पाटलांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसंच भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही गंभीर आरोप केला आहे.

कांदा प्रश्नावर केंद्र सरकार आणि देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करताना जयंत पाटील म्हणाले की, "काल परवा महाराष्ट्रातील कांदा पडून असताना फक्त गुजरातच्या कांद्याला निर्यातीसाठी परवानगी देण्याचे पाप सरकारने केलं. त्यांना महाराष्ट्राचा कांदा दिसला नाही. विरोधात वातावरण जातंय पाहून देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयापाठोपाठ सोशल मीडियावर पोस्ट लिहिली. यातून मोदी साहेबांचे आभार मानले आणि सांगितले की, महाराष्ट्रातील कांद्यावरील निर्यातबंदीही उठवली. मात्र हे सत्य नाही. मागचाच निर्णय पुन्हा घोषित केला आहे," असा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे. तसंच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा उद्योग थांबवायचा असेल तर निवडणुकीत मशाल आणि तुतारी वाजवणारा माणूस या दोन्ही चिन्हा समोरचे बटन दाबून आपली माणसं दिल्लीत पाठवण्याची जबाबदारी घ्या, असं आवाहनही यावेळी त्यांनी केलं आहे.

"संपूर्ण महाराष्ट्रात भाजपविरोधी वातावरण"

महाराष्ट्रात पहिल्या दोन टप्प्यांमध्ये जिथं मतदान झालं आहे तिथं भाजपचा एकही उमेदवार निवडून येणार नसल्याचा दावा जयंत पाटील यांनी केला आहे. "नाशिकच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रच महाविकास आघाडीच्या मागे खंबीर उभा आहे. आतापर्यंत ज्या ठिकाणी निवडणुका झाल्या, तिथे मी जाऊन आलो. या सर्व भागांमध्ये भारतीय जनता पक्षाचा एकही उमेदवार निवडून येत नाही. संपूर्ण महाराष्ट्रात भाजपविरोधी वातावरण आहे," असं पाटील म्हणाले.

दरम्यान, "लोकांची गर्दी पाहून नाशिक लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार राजाभाऊ वाजे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे दिंडोरी मतदारसंघाचे उमेदवार भास्करराव भगरे यांचा विजय निश्चित असल्याची जाणीव झाली," असंही जयंत पाटलांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसnashik-pcनाशिकdindori-pcदिंडोरीmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४