शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8 व्या वेतन आयोगाला केंद्राची मंजुरी; वाढीव पगार कधीपासून मिळणार?
2
'मासिक पाळी आलीय, ब्रेक पाहिजे', सुपरवायझर म्हणाला, 'कपडे काढा'; हरयाणा विद्यापीठातील धक्कादायक प्रकार
3
आज पुन्हा सोन्याचे दर घसरले, २००० रुपयांनी झालं स्वस्त; चांदीची चमकही झाली कमी, काय आहेत नवे रेट
4
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
5
Mohammed Shami: रणजीमध्ये शमीचा 'सुपरहिट' शो! दोन सामन्यांत १५ विकेट्स, पुनरागमनाचे संकेत
6
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
7
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
8
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
9
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
10
सावधान! 'ही' ५ उपकरणे एक्सटेंशन बोर्डमध्ये लावाल तर होऊ शकतो मोठा स्फोट; जाणून घ्या
11
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
12
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
13
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
14
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
15
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
16
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
17
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
18
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
19
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
20
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका

विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलनाला का उपस्थित नव्हतो? जयंत पाटलांनी सांगितलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2023 21:48 IST

शिवसेना ठाकरे गट अन् काँग्रेसचे आमदार पायरीवर आंदोलन करताना राष्ट्रवादी गैरहजर

Jayant Patil on Maharashtra Monsoon Session: राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी सरकारविरूद्ध जोरदार आवाज उठवला आणि घोषणाबाजी केली. यावेळी विरोधी पक्षाच्या आमदारांमध्ये शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसचे आमदार होते. पण राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार दिसले नाहीत. यावरून अनेक गोष्टींची चर्चा रंगली. पण अखेर या चर्चांना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पूर्णविराम दिला. विधान भवनाच्या पायऱ्यांवर सरकारविरोधी आंदोलनाला का उपस्थित नव्हतो याचे जयंत पाटलांनीच कारण सांगितले.

"काल विरोधी पक्षांची बैठक झाली. त्यावेळी आम्हाला वाय बी चव्हाण येथे बैठकीसाठी बोलावण्यात आले. त्यामुळे विरोधी पक्षांच्या बैठकीत काय ठरलं हे आम्हाला माहिती नव्हतं. त्यामुळे आज आम्ही आमच्या पक्षाच्या कार्यालयात सर्व आमदारांना बोलावलं होतं. तेव्हा खाली पायऱ्यांवर आंदोलन सुरू आहे हे माहित नव्हतं, लक्षात आल्यानंतर आम्ही खाली आलो. त्यावेळी नाना पटोले, अंबादास दानवे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार अर्पण करत होते तेव्हा आम्ही तिथे जाऊन हार अर्पण केला. त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत उपस्थित राहू शकलो नाही, पण आम्ही विरोधातच आहोत. उद्या पायऱ्यांवरील आंदोलनात आम्हीही असणार आहोत," असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

"जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, त्यातून मार्ग दाखवावा अशी मागणी अजित पवारांसह मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या लोकांनी शरद पवार यांच्याकडे केली आहे. शरद पवारांना कोणी कधीही भेटू शकतं. त्यामुळे कोणी भेटायला आले तर त्यांना पवार नाकारत नाहीत," असेही जयंत पाटील म्हणाले उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्यासह त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांची भेट घेतली. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, प्रतोद जितेंद्र आव्हाड उपस्थित होते.

जयंत पाटील पुढे बोलताना म्हणाले, "आपल्या घरात कोणी आले तर विश्लेषणात्मक टिप्पणी करणे योग्य नाही. ते शरद पवारांना भेटायला आले तेव्हा ते कसे दिसत होते ते नाराज होते का? याच्याशी काहीही संबंध नाही. पवारांनी आपली भूमिका येवला येथील सभेत अगदी स्पष्ट केली आहे. त्यामुळे प्रत्येक भेटीनंतर शरद पवारां साहेबांनी स्पष्टीकरण दिले पाहिजे असे वाटत नाही. आम्ही सर्व एकच पक्ष आहोत. त्यामुळे काही लोकांनी पक्षविरोधी केलेली कृतीवर कारवाई म्हणून नोटीस बजावलेली आहे. विशेष म्हणजे शरद पवारांच्या आदेशानेच हे सर्व काम सुरू आहे. आम्ही विधीमंडळात विरोधी बाकावरच बसलेलो आहोत. आमची भूमिका अगदी स्पष्ट आहे."

"राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विरोधी पक्षात आहे. शरद पवार साहेब यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असणारे आमचे सर्व आमदार हे विरोधी पक्षातच बसले आहेत. आमच्यातल्या 9 सदस्यांनी सरकारमध्ये शपथ घेतलेली आहे. हेही खरं आहे परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आजची बैठकीची व्यवस्था बघितली तर सर्व विखुरलेल्या पद्धतीने आणि विरोधी पक्षाच्या बाजूला बसलेले आपण बघितले असेल. त्यामुळे शरद पवार साहेबांच्या भेटीला आमदार आल्याने त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उद्भवणे योग्य नाही. कारण गेली अनेक वर्ष ज्यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काम केलं आहे तिच लोक पुन्हा शरद पवार साहेबांना भेटत असतील तर त्यातून शरद पवार साहेबांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचं कोणतही कारण नाही," असे पाटील यांनी स्पष्ट केले.

"राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अनेक वर्ष ज्यांनी काम केलं आहे ते सर्वचजण शरद पवार साहेबांनी निर्माण केलेल्या राष्ट्रवादीचं एक मोठं कुटुंब आहे. त्यातलेच काही लोकांनी वेगळी कृती केलेली आहे. पण तिच लोक आज शरद पवार साहेबांकडे  येऊन भेटले आणि यातून मार्ग काढा अशी शरद पवार साहेबांना त्यांनी विनंती केली आहे. त्यामुळे इतर कोणी अस्वस्थ होण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. शरद पवार साहेब हे देशातले अनुभवी नेते आहेत. त्यांच्याकडे जाऊन आमदारांनी विनंती केली की निर्माण झालेल्या परिस्थितीतून मार्ग काढावा," असे जयंत पाटील यांनी माहिती दिली.

विरोधकांची उद्याला होत असलेले बैठकी संदर्भात विचारण्यात आले. त्यावेळी जयंत पाटील म्हणाले की, शरद पवार साहेब हे युपीएचा भाग आहेत. त्यामुळे बंगळुरू येथे आयोजित बैठकीला जातील त्यांनी त्यांची भूमिका अगदी स्पष्ट केलेली आहे. त्यामुळे त्यांच्यावर कोणतेही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचे काम नाही. विरोधकांच्या बैठकीला का गेले नाही, या प्रश्नावर जयंत पाटील यांनी उत्तर दिले.

टॅग्स :Maharashtra Monsoon Sessionमहाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशन - २०२३Jayant Patilजयंत पाटीलSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवार