शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
5
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
6
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
7
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
8
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
9
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
10
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
11
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
12
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
13
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
14
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
15
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
16
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
17
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
18
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
19
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला

विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलनाला का उपस्थित नव्हतो? जयंत पाटलांनी सांगितलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2023 21:48 IST

शिवसेना ठाकरे गट अन् काँग्रेसचे आमदार पायरीवर आंदोलन करताना राष्ट्रवादी गैरहजर

Jayant Patil on Maharashtra Monsoon Session: राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी सरकारविरूद्ध जोरदार आवाज उठवला आणि घोषणाबाजी केली. यावेळी विरोधी पक्षाच्या आमदारांमध्ये शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसचे आमदार होते. पण राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार दिसले नाहीत. यावरून अनेक गोष्टींची चर्चा रंगली. पण अखेर या चर्चांना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पूर्णविराम दिला. विधान भवनाच्या पायऱ्यांवर सरकारविरोधी आंदोलनाला का उपस्थित नव्हतो याचे जयंत पाटलांनीच कारण सांगितले.

"काल विरोधी पक्षांची बैठक झाली. त्यावेळी आम्हाला वाय बी चव्हाण येथे बैठकीसाठी बोलावण्यात आले. त्यामुळे विरोधी पक्षांच्या बैठकीत काय ठरलं हे आम्हाला माहिती नव्हतं. त्यामुळे आज आम्ही आमच्या पक्षाच्या कार्यालयात सर्व आमदारांना बोलावलं होतं. तेव्हा खाली पायऱ्यांवर आंदोलन सुरू आहे हे माहित नव्हतं, लक्षात आल्यानंतर आम्ही खाली आलो. त्यावेळी नाना पटोले, अंबादास दानवे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार अर्पण करत होते तेव्हा आम्ही तिथे जाऊन हार अर्पण केला. त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत उपस्थित राहू शकलो नाही, पण आम्ही विरोधातच आहोत. उद्या पायऱ्यांवरील आंदोलनात आम्हीही असणार आहोत," असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

"जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, त्यातून मार्ग दाखवावा अशी मागणी अजित पवारांसह मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या लोकांनी शरद पवार यांच्याकडे केली आहे. शरद पवारांना कोणी कधीही भेटू शकतं. त्यामुळे कोणी भेटायला आले तर त्यांना पवार नाकारत नाहीत," असेही जयंत पाटील म्हणाले उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्यासह त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांची भेट घेतली. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, प्रतोद जितेंद्र आव्हाड उपस्थित होते.

जयंत पाटील पुढे बोलताना म्हणाले, "आपल्या घरात कोणी आले तर विश्लेषणात्मक टिप्पणी करणे योग्य नाही. ते शरद पवारांना भेटायला आले तेव्हा ते कसे दिसत होते ते नाराज होते का? याच्याशी काहीही संबंध नाही. पवारांनी आपली भूमिका येवला येथील सभेत अगदी स्पष्ट केली आहे. त्यामुळे प्रत्येक भेटीनंतर शरद पवारां साहेबांनी स्पष्टीकरण दिले पाहिजे असे वाटत नाही. आम्ही सर्व एकच पक्ष आहोत. त्यामुळे काही लोकांनी पक्षविरोधी केलेली कृतीवर कारवाई म्हणून नोटीस बजावलेली आहे. विशेष म्हणजे शरद पवारांच्या आदेशानेच हे सर्व काम सुरू आहे. आम्ही विधीमंडळात विरोधी बाकावरच बसलेलो आहोत. आमची भूमिका अगदी स्पष्ट आहे."

"राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विरोधी पक्षात आहे. शरद पवार साहेब यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असणारे आमचे सर्व आमदार हे विरोधी पक्षातच बसले आहेत. आमच्यातल्या 9 सदस्यांनी सरकारमध्ये शपथ घेतलेली आहे. हेही खरं आहे परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आजची बैठकीची व्यवस्था बघितली तर सर्व विखुरलेल्या पद्धतीने आणि विरोधी पक्षाच्या बाजूला बसलेले आपण बघितले असेल. त्यामुळे शरद पवार साहेबांच्या भेटीला आमदार आल्याने त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उद्भवणे योग्य नाही. कारण गेली अनेक वर्ष ज्यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काम केलं आहे तिच लोक पुन्हा शरद पवार साहेबांना भेटत असतील तर त्यातून शरद पवार साहेबांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचं कोणतही कारण नाही," असे पाटील यांनी स्पष्ट केले.

"राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अनेक वर्ष ज्यांनी काम केलं आहे ते सर्वचजण शरद पवार साहेबांनी निर्माण केलेल्या राष्ट्रवादीचं एक मोठं कुटुंब आहे. त्यातलेच काही लोकांनी वेगळी कृती केलेली आहे. पण तिच लोक आज शरद पवार साहेबांकडे  येऊन भेटले आणि यातून मार्ग काढा अशी शरद पवार साहेबांना त्यांनी विनंती केली आहे. त्यामुळे इतर कोणी अस्वस्थ होण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. शरद पवार साहेब हे देशातले अनुभवी नेते आहेत. त्यांच्याकडे जाऊन आमदारांनी विनंती केली की निर्माण झालेल्या परिस्थितीतून मार्ग काढावा," असे जयंत पाटील यांनी माहिती दिली.

विरोधकांची उद्याला होत असलेले बैठकी संदर्भात विचारण्यात आले. त्यावेळी जयंत पाटील म्हणाले की, शरद पवार साहेब हे युपीएचा भाग आहेत. त्यामुळे बंगळुरू येथे आयोजित बैठकीला जातील त्यांनी त्यांची भूमिका अगदी स्पष्ट केलेली आहे. त्यामुळे त्यांच्यावर कोणतेही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचे काम नाही. विरोधकांच्या बैठकीला का गेले नाही, या प्रश्नावर जयंत पाटील यांनी उत्तर दिले.

टॅग्स :Maharashtra Monsoon Sessionमहाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशन - २०२३Jayant Patilजयंत पाटीलSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवार