शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

Delhi Election Results: 'भाजपचा बुडबुडा फुटला' ; दिल्ली विधानसभा निकालावरून जयंत पाटलांचा भाजपला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2020 17:55 IST

भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मोठा पराभव असल्याचे सुद्धा पाटील म्हणाले.

मुंबई : दिल्ली विधानसभा निकालाचे सर्वच आकडे जवळपास आले असून, आम आदमी पार्टीने पुन्हा विजय मिळवला आहे. तर भाजप आणि काँग्रेसला पराभव स्वीकारावा लागला आहे. दिल्लीच्या निकालावरून आता राजकीय प्रतिक्रिया येत असून, राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या माध्यमातून भाजपचा बुडबुडा आता फुटला आहे. दिल्लीकरांनी मतदानाच्या माध्यमातून आपला विरोध प्रकट केला आहे. तर भाजपाची लोकप्रियतेची लाट आता ओसरली असल्याचे दिल्लीकरांनी सूचित केले असल्याचा टोला जयंत पाटील यांनी भाजपला लगावला आहे.

तर गेल्या पाच वर्षात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलेलं काम आणि भाजपनी त्यांच्या वाट्यात निर्माण केलेले अडथळे पाहून दिल्लीकरांनी केजरीवाल यांच्या बाजूने कौल दिला आहे. यातच भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मोठा पराभव असल्याचे सुद्धा पाटील म्हणाले.