शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

बीड सरपंच हत्याप्रकरणी राज्य सरकारला ७ जानेवारीची मुदत, अन्यथा..;  सरपंच परिषदेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 16:50 IST

'राज्यात अशा घटना घडणे चिंताजनक'

कोल्हापूर : बीड जिल्ह्यातील सरपंच हत्या प्रकरण, धाराशिव जिल्ह्यातील सरपंचाला पेट्रोलने जिवंत जाळण्याचा प्रयत्न यासह राज्यात सतत सरपंचांवर होणारे जीवघेणे हल्ले, अशा घटनांचा महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेने निषेध केला असून, ७ जानेवारीपर्यंत आरोपींना अटक करण्यासाठी डेडलाइन दिली आहे. तोपर्यंत राज्य सरकारने जर ठोस निर्णय घेतला नाही, तर राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील सर्व सरपंच आणि उपसरपंच मुंबईत धरणे धरतील, असा निर्णय महाराष्ट्र प्रदेश सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे यांनी घेतला आहे.महाराष्ट्र प्रदेश सरपंच परिषदेतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोग या गावच्या माजी सरपंचाचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. ही घटना ताजी असतानाच पुन्हा धाराशिव जिल्ह्यातील सरपंचाच्या कारची तोडफोड करून त्यांना पेट्रोलने जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला आहे. या दोन घटनांबरोबरच राज्यात सातत्याने सरपंचांवर होणाऱ्या जीवघेण्या हल्ल्यांमुळे सरपंच परिषद आक्रमक झाली आहे.

राज्यात अशा घटना घडणे हे अतिशय चिंताजनक आहे. सरपंचांनी गाव कसा चालवायचा? सरपंच आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची हमी घ्यायची कुणी, असा प्रश्न करीत या घटनांना आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलण्याची मागणी राज्य सरकारकडे सरपंच परिषदेचे अध्यक्ष जी. एम. पाटील (आजरा) यांनी केली आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणGovernmentसरकार