शहरं
Join us  
Trending Stories
1
कष्टकऱ्यांचा आधारवड काेसळला: डाॅ. बाबा आढाव यांचे निधन, वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
"ठाकरे ब्रँड एकच होता, सध्या राज ठाकरेंचा वापर करून..."; CM देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक मत
3
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
4
“धर्मवीर ३ ची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल, आनंद दिघे...”; एकनाथ शिंदेंनी सांगितले ‘राज’कारण
5
बाबरी मशिदीचे भूमिपूजन करणाऱ्या हुमायूं कबीर यांचा मोठा 'यू-टर्न'; आता काय म्हणाले?
6
1 रुपये 34 पैशांच्या शेअरची कमाल, ₹90 वर गेला भाव, खरेदीसाठी लोकांची झुंबड; आता कंपनीनं केली मोठी घोषणा!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, "याचं उत्तर शोधणार नाही"
8
गोवा अग्निकांडाचे आरोपी इंडिगोच्या फ्लाईटने फुकेतला पसार; पोलीस पोहोचण्याआधीच काढला पळ
9
“...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील
10
जपानच्या उत्तर किनाऱ्यावर ७.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा
11
"कोण बसवणार आहे मला? काय बोलताय"; 'वंदे मातरम्'वर बोलत असताना राजनाथ सिंह प्रचंड भडकले
12
'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत
13
“मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको, ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”: मंत्री प्रताप सरनाईक
14
लग्न करताच 'या' कपलला मिळतात 2.5 लाख रुपये, 90% लोकांना ही योजनाच माहीत नाही!
15
VIDEO: नववधूला सरप्राईज! शेजारी बसलेला नवरदेव अचानक उठला अन् सुरु केला भन्नाट डान्स
16
भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
17
"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
18
निवृत्तीसाठी कोणता फंड सर्वोत्तम? EPF, PPF की NPS? कोणासाठी कोणती योजना चांगली? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
19
क्रिकेट चाहत्यांना धक्का! पुढील वर्षीचा टी२० वर्ल्ड कप मोबाईलवर दिसणार नाही? जिओस्टारने घेतली माघार
20
२०२५ च्या शेवटी भारतीय गुगलवर का सर्च करताहेत ५२०१३१४? अर्थ समजल्यावर तुम्हीही व्हाल हैराण
Daily Top 2Weekly Top 5

जालना जिल्ह्याला पुन्हा एकदा मिळणार दोन मंत्रीपदे ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2019 13:53 IST

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला निवडणुकीपूर्वी मोठ्या प्रमाणात गळती लागली होती. मात्र अनेक नेत्यांनी पक्षाची एकनिष्ठ राहात तग धरला होता. यामध्ये राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे आणि काँग्रेसचे कैलास गोरंट्याल यांचे नाव आघाडीवर येते.

- रवींद्र देशमुखमुंबई - राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. मात्र मंत्रीमंडळाचा अद्याप विस्तार झालेला नाही. त्यामुळे मंत्रीपदाची लॉटरी कोणाला लागणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. मंत्रीपदांचा महाविकास आघाडीचा फॉर्म्युला निश्चित झाला असला तरी खातेवाटप ठरत नसल्याने विस्तार रेंगाळला आहे. मात्र जालना जिल्ह्याला यावेळी पुन्हा दोन मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. 

जालना जिल्ह्यात शिवसेनेला घरघर लागली असून पाचपैकी एकही जागा मिळाली नाही. तर काँग्रेसने कमबॅक करत जालना विधानसभा परत मिळवली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे घनसावंगी मतदार संघ आहे. जिल्ह्यात भाजपने परतूर, बदनापूर आणि भोकरदनमधून विजय मिळवला. 2014 मध्ये जिल्ह्यात भाजपकडून बबनराव लोणीकर आणि शिवसेनेकडून अर्जुन खोतकर यांना मंत्रीपदं मिळाली होती. 

दरम्यान राज्यात अभूतपूर्व स्थितीनंतर सत्तांतर झाले असून प्रथम क्रमांकाचा पक्ष ठरलेल्या भाजपला विरोधात बसावे लागले आहे. तर इतर पक्ष राज्यातील संघटनावर भर देण्याच्या तयारीत आहे. मंत्रीपदाच्या माध्यमातून संघटन मजबूत करणे हेच उद्दीष्ट काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने ठरवले आहे. त्यामुळे जालना जिल्ह्याला गेल्यावेळप्रमाणे पुन्हा एकदा दोन मंत्रीपदं मिळण्याची शक्यता आहे. 

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला निवडणुकीपूर्वी मोठ्या प्रमाणात गळती लागली होती. मात्र अनेक नेत्यांनी पक्षाची एकनिष्ठ राहात तग धरला होता. यामध्ये राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे आणि काँग्रेसचे कैलास गोरंट्याल यांचे नाव आघाडीवर येते. टोपे यांना पुन्हा एकदा राष्ट्रवादीकडून मंत्रीपद मिळणार हे निश्चित मानले जाते. त्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळू शकते. तर गोरंट्याल देखील मंत्रीपदाच्या शर्यतीत असून त्यांना राज्यमंत्रीपद की कॅबिनेट मंत्रीपद मिळणार हे अद्याप निश्चित नाही. गोरंट्याल यांना मंत्रीपद मिळाल्यास जिल्ह्यात संघटन मजबूत करण्यासाठी काँग्रेसला फायदा होऊ शकतो.