शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
4
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
5
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
7
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
8
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
9
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
10
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
11
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
12
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
13
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
14
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
15
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
16
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
17
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
18
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
19
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
20
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर

जालना जिल्ह्याला पुन्हा एकदा मिळणार दोन मंत्रीपदे ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2019 13:53 IST

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला निवडणुकीपूर्वी मोठ्या प्रमाणात गळती लागली होती. मात्र अनेक नेत्यांनी पक्षाची एकनिष्ठ राहात तग धरला होता. यामध्ये राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे आणि काँग्रेसचे कैलास गोरंट्याल यांचे नाव आघाडीवर येते.

- रवींद्र देशमुखमुंबई - राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. मात्र मंत्रीमंडळाचा अद्याप विस्तार झालेला नाही. त्यामुळे मंत्रीपदाची लॉटरी कोणाला लागणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. मंत्रीपदांचा महाविकास आघाडीचा फॉर्म्युला निश्चित झाला असला तरी खातेवाटप ठरत नसल्याने विस्तार रेंगाळला आहे. मात्र जालना जिल्ह्याला यावेळी पुन्हा दोन मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. 

जालना जिल्ह्यात शिवसेनेला घरघर लागली असून पाचपैकी एकही जागा मिळाली नाही. तर काँग्रेसने कमबॅक करत जालना विधानसभा परत मिळवली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे घनसावंगी मतदार संघ आहे. जिल्ह्यात भाजपने परतूर, बदनापूर आणि भोकरदनमधून विजय मिळवला. 2014 मध्ये जिल्ह्यात भाजपकडून बबनराव लोणीकर आणि शिवसेनेकडून अर्जुन खोतकर यांना मंत्रीपदं मिळाली होती. 

दरम्यान राज्यात अभूतपूर्व स्थितीनंतर सत्तांतर झाले असून प्रथम क्रमांकाचा पक्ष ठरलेल्या भाजपला विरोधात बसावे लागले आहे. तर इतर पक्ष राज्यातील संघटनावर भर देण्याच्या तयारीत आहे. मंत्रीपदाच्या माध्यमातून संघटन मजबूत करणे हेच उद्दीष्ट काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने ठरवले आहे. त्यामुळे जालना जिल्ह्याला गेल्यावेळप्रमाणे पुन्हा एकदा दोन मंत्रीपदं मिळण्याची शक्यता आहे. 

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला निवडणुकीपूर्वी मोठ्या प्रमाणात गळती लागली होती. मात्र अनेक नेत्यांनी पक्षाची एकनिष्ठ राहात तग धरला होता. यामध्ये राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे आणि काँग्रेसचे कैलास गोरंट्याल यांचे नाव आघाडीवर येते. टोपे यांना पुन्हा एकदा राष्ट्रवादीकडून मंत्रीपद मिळणार हे निश्चित मानले जाते. त्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळू शकते. तर गोरंट्याल देखील मंत्रीपदाच्या शर्यतीत असून त्यांना राज्यमंत्रीपद की कॅबिनेट मंत्रीपद मिळणार हे अद्याप निश्चित नाही. गोरंट्याल यांना मंत्रीपद मिळाल्यास जिल्ह्यात संघटन मजबूत करण्यासाठी काँग्रेसला फायदा होऊ शकतो.