शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
3
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
4
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
5
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
6
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
7
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
8
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
9
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
10
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
11
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
12
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
13
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
14
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
15
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
16
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
17
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
18
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
19
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
20
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!

जालना जिल्ह्याला पुन्हा एकदा मिळणार दोन मंत्रीपदे ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2019 13:53 IST

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला निवडणुकीपूर्वी मोठ्या प्रमाणात गळती लागली होती. मात्र अनेक नेत्यांनी पक्षाची एकनिष्ठ राहात तग धरला होता. यामध्ये राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे आणि काँग्रेसचे कैलास गोरंट्याल यांचे नाव आघाडीवर येते.

- रवींद्र देशमुखमुंबई - राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. मात्र मंत्रीमंडळाचा अद्याप विस्तार झालेला नाही. त्यामुळे मंत्रीपदाची लॉटरी कोणाला लागणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. मंत्रीपदांचा महाविकास आघाडीचा फॉर्म्युला निश्चित झाला असला तरी खातेवाटप ठरत नसल्याने विस्तार रेंगाळला आहे. मात्र जालना जिल्ह्याला यावेळी पुन्हा दोन मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. 

जालना जिल्ह्यात शिवसेनेला घरघर लागली असून पाचपैकी एकही जागा मिळाली नाही. तर काँग्रेसने कमबॅक करत जालना विधानसभा परत मिळवली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे घनसावंगी मतदार संघ आहे. जिल्ह्यात भाजपने परतूर, बदनापूर आणि भोकरदनमधून विजय मिळवला. 2014 मध्ये जिल्ह्यात भाजपकडून बबनराव लोणीकर आणि शिवसेनेकडून अर्जुन खोतकर यांना मंत्रीपदं मिळाली होती. 

दरम्यान राज्यात अभूतपूर्व स्थितीनंतर सत्तांतर झाले असून प्रथम क्रमांकाचा पक्ष ठरलेल्या भाजपला विरोधात बसावे लागले आहे. तर इतर पक्ष राज्यातील संघटनावर भर देण्याच्या तयारीत आहे. मंत्रीपदाच्या माध्यमातून संघटन मजबूत करणे हेच उद्दीष्ट काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने ठरवले आहे. त्यामुळे जालना जिल्ह्याला गेल्यावेळप्रमाणे पुन्हा एकदा दोन मंत्रीपदं मिळण्याची शक्यता आहे. 

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला निवडणुकीपूर्वी मोठ्या प्रमाणात गळती लागली होती. मात्र अनेक नेत्यांनी पक्षाची एकनिष्ठ राहात तग धरला होता. यामध्ये राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे आणि काँग्रेसचे कैलास गोरंट्याल यांचे नाव आघाडीवर येते. टोपे यांना पुन्हा एकदा राष्ट्रवादीकडून मंत्रीपद मिळणार हे निश्चित मानले जाते. त्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळू शकते. तर गोरंट्याल देखील मंत्रीपदाच्या शर्यतीत असून त्यांना राज्यमंत्रीपद की कॅबिनेट मंत्रीपद मिळणार हे अद्याप निश्चित नाही. गोरंट्याल यांना मंत्रीपद मिळाल्यास जिल्ह्यात संघटन मजबूत करण्यासाठी काँग्रेसला फायदा होऊ शकतो.