शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

पुष्पक एक्स्प्रेसमधील मृत्यूचा थरार आम्ही डोळ्यांदेखत पाहिला, बचावलेल्या प्रवाशांनी कथन केला अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 06:14 IST

Jalgaon Train Accident:

कल्याण : मुंबईला येणाऱ्या पुष्पक एक्स्प्रेस दुर्घटनेत १२ प्रवाशांचा मृत्यू झाला. मात्र, नेमकी घटना कशी घडली, याची माहिती जेव्हा पुष्पक एक्स्प्रेस कल्याण स्थानकात आली तेव्हाच कळली. या अपघातातून बचावलेल्या प्रवाशांनी सांगितले की, मृत्यूचा थरार आम्ही डोळ्यादेखत पाहिला. त्यावेळी काळजाचे पाणी पाणी होत होते. भीतीपोटी प्रवासी मृत्युमुखी पडले. आम्ही बचावलो हे आमचे भाग्य समजतो.

प्रवासी नितीन गायकवाड यांनी सांगितले की, गाडीने जळगाव सोडले. आमचे काही सहकारी हे दुसऱ्या बोगीत होते. त्यांनी आम्हाला फोन केला की, गाडीला आग लागली आहे. मात्र, गाडीला आग लागलेली नव्हती. कोणीतरी चालत्या गाडीची चेन खेचली. चेन खेचणाऱ्याला वाटले की, गाडीला आग लागली.  चेन खेचल्याने गाडीच्या चाकांचे रुळावर घर्षण झाले. त्यातून ठिणग्या उडाल्या. या ठिणग्या पाहूनच भीतीपोटी प्रवाशांनी उड्या मारल्या. मृत प्रवाशांपैकी दोन प्रवाशांचे मृतदेह चाकात अडकल्याचे त्यांनी सांगितले. 

बातमी बघाताच फोनाफोनी सुरू प्रवासी संदीप जाधव यांनी सांगितले की, ते त्यांच्या सहकाऱ्यांसोबत बुद्धगया येथे गेले होते. परतीचा प्रवास करताना त्यांनी लखनऊ रेल्वेस्थानकातून पुष्पक एक्स्प्रेस पकडली. 

अपघाताची बातमी टीव्हीवर दिसताच घरातून आम्हाला फोन सुरू झाले. या घटनेची माहिती मिळताच केंद्रीय समाजकल्याण मंत्री रामदास आठवले यांनी फोनवरून माझ्याकडे घडल्या प्रकाराची विचारणा करून घटनेविषयी माहिती घेतली. याच गाडीने आम्ही रात्री पावणेबारा वाजता कल्याण स्थानकात सुखरूप पोहोचलो.

भिवंडीतील चौघांचा मृत्यूभिवंडी : पुष्पक एक्स्प्रेसच्या अपघातात भिवंडीतील जयगडी व विश्वकर्मा या दोन नेपाळी कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. जयकला जयगडी (६०), नन्ना विश्वकर्मा (५५), त्यांची पत्नी मैश्रा विश्वकर्मा (४५) व मुलगा हेमंत विश्वकर्मा (११) अशी मृतांची नावे आहेत. या दोन्ही कुटुंबांतील नऊ सदस्य पुष्पक एक्स्प्रेसमधून भिवंडीकडे येत होते. 

जयकला या मूळच्या नेपाळमधील असून, त्यांचा मुलगा भिवंडीत सुरक्षारक्षक म्हणून काम करतो. जयकला या भिवंडीत नातवंडांना प्रथमच भेटण्यासाठी व उपचारासाठी येत होत्या. जयकला यांनी अपघात होण्याच्या एक तास आधी नातवंडांसोबत व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधला होता. दुसरीकडे, याच कुटुंबाचे नातेवाईक असलेले नेपाळ येथील कुच्ची कलिकास्थानमधील नन्ना विश्वकर्मा पुण्यात एका कंपनीत काम करीत होते. त्यांची पत्नी मैश्रा विश्वकर्मा या आजारी असल्याने त्यांनाही उपचारासाठी ते गावाहून मुलगा हेमंत व इतर तीन जणांसह येत होते. अपघातात नन्ना, मैश्रा व हेमंत यांचा मृत्यू झाला.

टॅग्स :JalgaonजळगावIndian Railwayभारतीय रेल्वेAccidentअपघात