शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

पुष्पक एक्स्प्रेसमधील मृत्यूचा थरार आम्ही डोळ्यांदेखत पाहिला, बचावलेल्या प्रवाशांनी कथन केला अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 06:14 IST

Jalgaon Train Accident:

कल्याण : मुंबईला येणाऱ्या पुष्पक एक्स्प्रेस दुर्घटनेत १२ प्रवाशांचा मृत्यू झाला. मात्र, नेमकी घटना कशी घडली, याची माहिती जेव्हा पुष्पक एक्स्प्रेस कल्याण स्थानकात आली तेव्हाच कळली. या अपघातातून बचावलेल्या प्रवाशांनी सांगितले की, मृत्यूचा थरार आम्ही डोळ्यादेखत पाहिला. त्यावेळी काळजाचे पाणी पाणी होत होते. भीतीपोटी प्रवासी मृत्युमुखी पडले. आम्ही बचावलो हे आमचे भाग्य समजतो.

प्रवासी नितीन गायकवाड यांनी सांगितले की, गाडीने जळगाव सोडले. आमचे काही सहकारी हे दुसऱ्या बोगीत होते. त्यांनी आम्हाला फोन केला की, गाडीला आग लागली आहे. मात्र, गाडीला आग लागलेली नव्हती. कोणीतरी चालत्या गाडीची चेन खेचली. चेन खेचणाऱ्याला वाटले की, गाडीला आग लागली.  चेन खेचल्याने गाडीच्या चाकांचे रुळावर घर्षण झाले. त्यातून ठिणग्या उडाल्या. या ठिणग्या पाहूनच भीतीपोटी प्रवाशांनी उड्या मारल्या. मृत प्रवाशांपैकी दोन प्रवाशांचे मृतदेह चाकात अडकल्याचे त्यांनी सांगितले. 

बातमी बघाताच फोनाफोनी सुरू प्रवासी संदीप जाधव यांनी सांगितले की, ते त्यांच्या सहकाऱ्यांसोबत बुद्धगया येथे गेले होते. परतीचा प्रवास करताना त्यांनी लखनऊ रेल्वेस्थानकातून पुष्पक एक्स्प्रेस पकडली. 

अपघाताची बातमी टीव्हीवर दिसताच घरातून आम्हाला फोन सुरू झाले. या घटनेची माहिती मिळताच केंद्रीय समाजकल्याण मंत्री रामदास आठवले यांनी फोनवरून माझ्याकडे घडल्या प्रकाराची विचारणा करून घटनेविषयी माहिती घेतली. याच गाडीने आम्ही रात्री पावणेबारा वाजता कल्याण स्थानकात सुखरूप पोहोचलो.

भिवंडीतील चौघांचा मृत्यूभिवंडी : पुष्पक एक्स्प्रेसच्या अपघातात भिवंडीतील जयगडी व विश्वकर्मा या दोन नेपाळी कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. जयकला जयगडी (६०), नन्ना विश्वकर्मा (५५), त्यांची पत्नी मैश्रा विश्वकर्मा (४५) व मुलगा हेमंत विश्वकर्मा (११) अशी मृतांची नावे आहेत. या दोन्ही कुटुंबांतील नऊ सदस्य पुष्पक एक्स्प्रेसमधून भिवंडीकडे येत होते. 

जयकला या मूळच्या नेपाळमधील असून, त्यांचा मुलगा भिवंडीत सुरक्षारक्षक म्हणून काम करतो. जयकला या भिवंडीत नातवंडांना प्रथमच भेटण्यासाठी व उपचारासाठी येत होत्या. जयकला यांनी अपघात होण्याच्या एक तास आधी नातवंडांसोबत व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधला होता. दुसरीकडे, याच कुटुंबाचे नातेवाईक असलेले नेपाळ येथील कुच्ची कलिकास्थानमधील नन्ना विश्वकर्मा पुण्यात एका कंपनीत काम करीत होते. त्यांची पत्नी मैश्रा विश्वकर्मा या आजारी असल्याने त्यांनाही उपचारासाठी ते गावाहून मुलगा हेमंत व इतर तीन जणांसह येत होते. अपघातात नन्ना, मैश्रा व हेमंत यांचा मृत्यू झाला.

टॅग्स :JalgaonजळगावIndian Railwayभारतीय रेल्वेAccidentअपघात