शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Nirupam राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंनी माफी मागावी; EVM हॅक आरोपावरून शिवसेनेचा पलटवार
2
West Bengal Kanchenjunga Express Train Accident: बंगालमध्ये ट्रेनचा मोठा अपघात! कंचनजंगा एक्स्प्रेसला भरधाव मालगाडीची धडक, ५ जणांचा मृत्यू
3
धोक्याची घंटा! इंफेक्शनमुळे ४८ तासांत होतो रुग्णाचा मृत्यू; काय आहे Flesh-Eating Bacteria?
4
T20 WC 2024: श्रीलंकेचा शेवट गोड, ८३ धावांनी विजय; नेदरलँड्सला पराभवासह निरोप
5
नागपूरचा डॉली चहावाला सातासमुद्रापार; मालदीवच्या समुद्रकिनारी टपरी, पर्यटकांनी घेतला आस्वाद
6
देवेंद्र फडणवीसांनी मला संकटातून वाचवलं; खासदार नरेश म्हस्केंनी सांगितला किस्सा
7
बापरे! महागाईचा सर्जिकल स्ट्राइक; पाकिस्तानात टोमॅटो २०० रुपये किलो
8
MHT CET 2024 Results: पैकीच्या पैकी! रिक्षाचालकाच्या मुलाची उत्तुंग झेप, MHT CET मध्ये १०० पर्सेंटाइल
9
संगमरवरी बांधकाम आणि बरंच काही! अमिताभ बच्चन यांच्या घरातल्या मंदिराचे सुंंदर Inside फोटो बघा
10
राम मंदिर उभारणीमुळे पराभव, शिंदे गटाच्या उमेदवाराचा दावा
11
Home Loan EMI च्या त्रासातून सुटका करायची असेल ही ट्रीक नक्की वापरा; गृहकर्ज संपेल
12
स्वानंदीने लक्ष्मीकांत बेर्डेंचा आतापर्यंत न पाहिलेला फोटो केला शेअर, चाहते करताहेत प्रेमाचा वर्षाव
13
जगप्रसिद्ध बीबी का मकबराच्या चारही मिनारचे ‘तीन तेरा’
14
'खटा-खट खटा-खट रिटर्न'! ₹४०० चा शेअर पोहोचला १८०० पार; 'या' Energy शेअरनं केलं मालामाल
15
"बिकिनी घालणं सोपी गोष्ट नाही, त्यासाठी कष्ट लागतात", पर्ण पेठे स्पष्टच बोलली
16
लाईफ इन्शुरन्स धारकांसाठी खूशखबर! पॉलिसी मध्येच सरेंडर केल्यास मिळणार पूर्वीपेक्षा अधिक पैसे
17
कंचनजंगा एक्स्प्रेसच्या अपघातात लोको पायलट, गार्डचा मृत्यू? रेल्वे मंत्रालय माहिती देताना म्हणाले...
18
NSE नं इन्स्टाग्राम, टेलिग्रामच्या 'या' हँडल्सबाबत दिला इशारा; फसवणूक करणारे नंबर्सही केले जारी
19
चाळिशीनंतर स्वत:ला जपा! महिलांना 'या' आजारांचा मोठा धोका; दुर्लक्ष करणं बेतेल जीवावर
20
अनंत अंबानी-राधिका मर्चंटचे प्री-वेडिंग शूट करणाऱ्या फोटोग्राफरचे मानधन किती? जाणून घ्या

अपूर्ण घरकूल उद्दिष्टपूर्तीमध्ये जळगाव राज्यात अव्वल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2017 8:45 AM

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने आधुनिक तंत्रज्ञान, सोशल मीडियाचा वापर करत दहा वर्षात ३७ हजार ८८५ जणांना घरकूलांचा लाभ मिळवून देत ९० टक्के काम पूर्ण केले आहे. 

जळगाव,दि.४ - जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत २००६ पासून ४१ हजार ९७८ घरकूले अपूर्ण होती. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने आधुनिक तंत्रज्ञान, सोशल मीडियाचा वापर करत दहा वर्षात ३७ हजार ८८५ जणांना घरकूलांचा लाभ मिळवून देत ९० टक्के काम पूर्ण केले आहे. या कामगिरीमुळे या अपूर्ण घरकुलांच्या उद्दिष्टपूर्तीमध्ये जळगाव जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे.

इंदिरा आवास योजना असे योजनेचे पूर्वीचे नाव आहे़ २०१५ पासून ही योजना प्रधानमंत्री आवास योजना या नावाने रुपांतरीत झाली़ २००५-०६ या आर्थिक वर्षात या योजनेतंर्गत ४१ हजार ९७८ घरकुले पूर्ण करण्याचे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेसमोर आव्हान होते़ ते पूर्ण करण्यासाठी यंत्रणा कामाला लागली होती. प्रत्येक तालुक्यात शिबिर, सभा घेण्यात आल्या़ यात अडचणी, तसेच आवश्यक त्या सूचनांचे मार्गदर्शन अधिकाºयांना तसेच लाभार्थींना करण्यात आले.

३७ हजार ८८५ जणांचे घराचे स्वप्न साकारप्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत विभागाने गेल्या दहा वर्षात जिल्ह्यातील ३७ हजार ८८५ जणांच्या घराचे स्वप्न साकार करीत घरकुले मिळवून दिली आहे़ प्रत्येक लाभार्थीच्या थेट खात्यावर तीन टप्प्यात अनुदान जमा झाले. केवळ अनुदानच नाही तर घरकुले पूर्ण होईपर्यंत विभागाने पाठपुरावा केला. यात प्रत्येक घरकुलात शौचालयाबाबतही विशेष काळजी घेण्यात आली.तंत्रज्ञान विकसीत केलेघरकुले पूर्ण करण्यासाठी विभागाने केवळ सभा, शिबिरेच नाही तर तंत्रज्ञानाचाही वापर केला़ जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे जिल्हा समन्वयक सुनील मोरे यांनी गुगल ड्राईव्हच्या माध्यमातून तंत्रज्ञान विकसीत केले़ या तंत्रज्ञानानुसार मोरे यांच्याकडून यानुसार प्रत्येक तालुका, गाव येथील कामांचा आढावा घेतला जात होता़ व काम पूर्ण होईपर्यंत तंत्रज्ञानाच्या मदतीने जिल्ह्याच्या कामावर संनियंत्रण ठेवण्यात आले.हॉटस् अ‍ॅपचाही केला उपयोगहॉटस्अ‍ॅप व सोशल मीडीयाचाही उद्दीष्ट पूर्ण करताना वापर झाला़ जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून प्रकल्प संचालक विक्रांत बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली व्हॉटस् अ‍ॅपवर ग्रुप तयार करण्यात आला़ यात प्रकल्प संचालक, जि़प़मुख्य कार्यकारी अधिकारी, शाखा अभियंता, उपअभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, संगणक परिचालक तसेच घरकुलाशी संबंधित सर्व यंत्रणा यांचा समावेश होता़ गु्रपव्दारे दररोज कामाचा आढावा घेतला गेला़ व अडचणी तत्काळ सोडविण्यात आल्या़ परिणामी आपोआपच कामाचा वेग वाढला.आर्थिक जातीनिहाय सर्वेक्षणातील १२ हजार ७५७ जणांना घरकुलेअपूर्ण घरकुलांची उद्दिष्टपूर्ती करत असताना इतर योजनेतील घरकुल उद्दिष्टपूर्तीकडे विभागाचे दुर्लक्ष झाले नाही़ २०११ मध्ये शासनाने केलेल्या सामाजिक आर्थिक जातनिहाय सर्वेक्षणनुसार ८३ हजार ४९४ लाभार्थी प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलांसाठी पात्र ठरले होते़ २०१६-१७ या आर्थिक वर्षात त्यापैकी १२ हजार ७५७ जणांना विभागाने लाभ मिळवून घरकुले पूर्ण केली आहे़ तसेच गेल्या वर्षी शबरी , रमाई तसेच पारधी या तिन्ही योजनेतील उद्दीष्टांनुसार एकूण तीन हजार १६८ लाभार्थींचे घरकुलांचे स्वप्न पूर्ण केले आहे़राज्यात जिल्हा अव्वलघरकुले ४१९७८पूर्ण ३७८८५अपूर्ण ४०९३९० टक्के काम पूर्णकोटअपूर्ण घरकुले पूर्ण करण्याच्या उपक्रमात जळगाव जिल्हा राज्यात प्रथम आहे. त्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पंचायत समिती, गटविकास अधिकारी व संबंधित यंत्रणेतील अधिकारी, कर्मचाºयांचे सहकार्य मिळाले़ हे पूर्ण यंत्रणेचे यश आहे़ आगामी काळात विविध योजनांच्या उद्दिष्टपूर्तीमध्ये जिल्हा कसा अव्वल राहिल, यासाठी प्रयत्नशिल आहे़- विक्रांत बगाडे, प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा