शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

“धर्मा धर्मात दरी निर्माण होते हे निराशाजनक”; कोरोना काळातील कामावरून प्रितम मुंडेंकडून राज्य सरकारचं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 17:48 IST

भाजपच्या खासदार प्रितम मुंडे यांनी मात्र कोरोनाकाळातील राज्य सरकारच्या कामांचं कौतुक केलं.

भाजप आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये अनेकदा शाब्दीक चकमक दिसून आली. भाजप सरकारवर टीकेची एकही संधी सोडत नाही. दरम्यान, भाजपच्या खासदार प्रितम मुंडे यांनी मात्र कोरोनाकाळातील राज्य सरकारच्या कामांचं कौतुक केलं. तसंच भोंग्यांबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी धर्मा धर्मांमध्ये दरी निर्माण होते हे निराशाजनक असल्याचं म्हटलं.

“राज्य सरकारच्या कामाविषयी सांगायचं तर मी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं मनापासून कौतुक करते. त्यांनी अतिशय उत्तमरित्या तो प्रकार हाताळला आहे. राजकीय मंचावर येऊन आरोप प्रत्यारोप करण्याचे विषय वेगळे असतात. पण आरोग्य हा असा विषय आहे, की कोरोनाशी सामना करताना केंद्र सरकार सतर्क होतं आणि लोकांची काळजी घेण्याचं काम करत होतं. महाराष्ट्र देशातील मोठं राज्य आहे आणि लोकसंख्याही जास्त आहे, बाहेरून येणाऱ्या कामगारांची संख्याही अधिक आहे. याकडे लक्ष देताना टोपे यांच्या माध्यमातून काम चांगल्या प्रकारे झालं आहे,” असं म्हणत मुंडे यांनी आरोग्यमंत्र्यांचं कौतुक केलं.

... ते अस्वस्थ करणारं“धर्माधर्मांमध्ये दरी निर्माण होते हे निश्चितच निराशाजनक आहे. यात कोणाविषयी बोलण्याचं कारण नाही. ज्या गोष्टी गुण्यागोविंदानं आधी समाजात नांदत होत्या, त्यात अचानक आलेली ही विषयमता अस्वस्थ करणारी आहे. आजचा हा विषय नसला तरी कधीनाकधी राजकीय लोकांना याला सामोरं जावं लागेल,” असंही त्यांनी भोंग्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटलं.

टॅग्स :Pritam Mundeप्रीतम मुंडेRajesh Topeराजेश टोपेMahavikas Aghadiमहाविकास आघाडीBJPभाजपा