शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

शहीद जवानांच्या नावाने मोदींनी मत मागणे चुकीचेच : विक्रम गोखले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2019 19:07 IST

जर मोदींना पुलवामा आणि शेतकऱ्यांसंदर्भात प्रश्न विचारले तर त्यांनी उत्तर देणे योग्य आहे. मात्र, मते वाढावीत म्हणून पुलवामा हल्ल्यातील शहिदांचा वापर करू नये.

पुणे : मी कोणत्याही पक्षाशी बांधील नाही. मी केवळ जवान आणि शेतक-यांशी बांधील आहे, अशी स्पष्टोक्ती देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांच्या नावाने मत मागणे चुकीचेच आहे, अशा शब्दातं ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी मोदींना कानपिचकी मारली. तर दुसरीकडे दुष्काळाचे खापर सत्ताधा-यांवरफोडणे हे देखील चुकीचे आहे असा टोला विरोधकांना लगावत सरकारची पाठराखण केली. विक्रम गोखले अ‍ॅक्टिंग व अ‍ॅकडमी आणि एचआर झूम यांच्यातर्फे १९ मे रोजी अण्णा भाऊ साठे नाट्यगृह येथे विक्रम गोखले अभिनय कार्यशाळा घेण्यात येणार आहे. त्याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत गोखले बोलत होते. गोखले म्हणाले, जर मोदींना पुलवामा आणि शेतकऱ्यांसंदर्भात प्रश्न विचारले तर त्यांनी उत्तर देणे योग्य आहे. मात्र, मते वाढावीत म्हणून पुलवामा हल्ल्यातील शहिदांचा वापर करू नये. हवामानातील बदल काही सत्ताधा-यांनी सांगितले म्हणून होत नाहीत. त्यामुळे उष्माघात, दुष्काळ आणि पूर अशा संकटांमध्ये नागरिकांचा मृत्यू झाला तर त्याला सरकार जबाबदार कसे? प्रत्येक गोष्टीमध्ये सत्ताधा-वर खापर फोडणे चुकीचे आहे. राजकारणातील अभिनेत्यांच्या सहभागाविषयी विचारले असता ते पुढे म्हणाले, अभिनयाच्या क्षेत्रातील व्यक्ती राजकारणात यशस्वी होतील याची शाश्वती नसते. आमचे बच्चन साहेब राजकारणात गेले. नंतर त्यांना त्याचा पश्चात्ताप झाला.आमच्या पक्षात या म्हणून अनेकवेळा मलाही आग्रह झाला. परंतु, कोणत्याही राजकीय पक्षाशी मी बांधील नाही. सर्वच राजकीय पक्षांमध्ये माझे मित्र असल्यामुळे मी कोणत्याच पक्षामध्ये दाखल झालो नाही. मात्र, चांगला राजकीय पुढारी होण्यासाठी योग्य अभ्यास असणे गरजेचे आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. सध्या राजकारणाचा व्यवसाय झाला आहे. भाऊ, दादा, साहेब अशी बिरुदं लावून ज्यांच्यामागे आपण धावतो त्यांनी हे ध्यानात घेतले पाहिजे की रणांगणात जाण्याची वेळ येते तेव्हा नेते घरी असतात आणि लाठया-काठया मुलांना खाव्या लागतात...................................

टॅग्स :PuneपुणेVikram Gokhaleविक्रम गोखलेIndian Armyभारतीय जवानNarendra Modiनरेंद्र मोदी