शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
5
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
6
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
7
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
8
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
9
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
10
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
11
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
12
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
13
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
14
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
15
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
16
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
17
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
18
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
19
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
20
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?

होय, 'ती' आमच्या महाविकास आघाडीची चूक ठरली; अजित पवारांची स्पष्ट कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2023 10:49 IST

निकालाने पक्षांतरबंदी कायद्याला काय अर्थ राहणार आहे की नाही हा प्रश्न निर्माण झाला आहे असं अजित पवार म्हणाले.

पुणे - राज्यातील सत्तासंघर्षाबाबत सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही भाष्य केले आहे. लातूर दौऱ्यावर असताना सुप्रीम कोर्टाच्या निकालावर मी माझे मत मांडले होते. १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांकडे प्रकरण येईल असं मी म्हटलं होते. नाना पटोलेंनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा द्यायला नको होता, त्यानंतरही ते पद रिक्त ठेवणे आमची चूक झाली अशी कबुली अजित पवारांनी दिली आहे. 

अजित पवार म्हणाले की, नाना पटोलेंनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला, त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांना विचारात घेतले नाही. तो राजीनामा दिल्यावर लगेच विधानसभा अध्यक्षाबाबत महाविकास आघाडीने घ्यायला हवा होता. पण तो विषय तातडीने निकाला लागला नाही. अनेक काळ विधानसभेचे उपाध्यक्ष कामकाज पाहत होते. सत्तांतर घडल्यानंतर भाजपा-शिवसेनेने तात्काळ विधानसभा अध्यक्षपद बहुमताने भरले, जर आमचा अध्यक्ष असता तर ही वेळ आली नसती, ते १६ आमदार त्यावेळीस अपात्र ठरले असते असं त्यांनी म्हटलं.  

तसेच निकालाने पक्षांतरबंदी कायद्याला काय अर्थ राहणार आहे की नाही हा प्रश्न निर्माण झाला आहे. याआधीही बहुमत असल्याने कुठलीही अडचण येत नव्हती. सगळ्याच राजकीय पक्षांना संविधानाने ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्याचा आदर करून जनतेचा अपमान होता कामा नये, स्थिरता लाभली पाहिजे असं पाऊल उचलले पाहिजे. कुठलाही निकाल लागला असता तरी सरकारवर परिणाम होणार नव्हता. त्यांच्याकडे बहुमत होते, १६ आमदार अपात्र झाले असते तरी सरकार टिकले असते असं अजित पवारांनी सांगितले. 

दरम्यान, नैतिकतेला धरून शिंदे-फडणवीस सरकारने राजीनामा दिला पाहिजे अशी उद्धव ठाकरेंची मागणी आहे. परंतु मागणी असून काहीही उपयोग नाही, अटलबिहारी वाजपेयींची उंची आणि आत्ताच्या लोकांची उंची यात जमीन आस्मानचा फरक आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस राजीनामा देतील हे स्वप्नातही पाहू नये असं सांगत अजित पवारांनी सरकारवर निशाणा साधला. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारMahavikas Aghadiमहाविकास आघाडीNana Patoleनाना पटोले