शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

उद्धव ठाकरेंनी दत्तक घेतलं होतं, पण...; श्रीनिवास वनगांच्या मनस्तापावर संजय राऊत स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2024 12:49 IST

उद्धव ठाकरे यांनी या कुटुंबाला दत्तक घेऊन, या श्रीनिवास वनगा यांना लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी उभे केले, ताकद लावली आणि स्वतः प्रचारात दाखल झाले. दुर्दैवाने त्यांचा पराभव झाल्यानंतर, त्यांना विधानसभेत आणण्यासाठीही उद्धव ठाकरे यांचाच पुढाकार होता.

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेले पालघरचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार श्रीनिवास वनगा गेल्या काही तासांपासून नॉट रिचेबल आहेत. कुटुंबीय आणि पोलीस प्रशासन त्यांचा शोध घेत आहे. नॉट रिचेबल होण्यापूर्वी त्यांनी धाय मोकलून रडत उद्धव ठाकरे यांची माफीही मागितली. यासंदर्भात बोलताना आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे यांनी या कुटुंबाला दत्तक घेतले होते. लोकसभाही लढवली होती. पण दुर्दैवाने त्यांचा पराभव झाला. यानंतर त्यांना विधानसभेत आणण्यासाठीही उद्धव ठाकरे यांचाच पुढाकार होता. पश्चाताप झालाय आता घरी बसा, असे राऊत यांनी म्हटले आहे. ते पत्रकारांसोबत बोलत होते.

राऊत म्हणाले, "हे जे वनगा नावाचे गृहस्त आहेत, आमदार झाले ते उद्धव ठाकरे यांच्यामुळे, उद्धव ठाकरे यांनी त्यांना लोकसभाही लढवली. भाजपने दुर्लक्ष केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी या कुटुंबाला दत्तक घेऊन, या श्रीनिवास वनगा यांना लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी उभे केले, ताकद लावली आणि स्वतः प्रचारात दाखल झाले. दुर्दैवाने त्यांचा पराभव झाल्यानंतर, त्यांना विधानसभेत आणण्यासाठीही उद्धव ठाकरे यांचाच पुढाकार होता. त्या कुटुंबाला न्याय मिळायला हवा, अशी त्यांची भूमिका होती. 

तेव्हा त्या भागातील अनेक शिवसैनिकांनाही रडू कोसळलं होतं -"श्रीनिवास वनगा हे आमदार झाले ते काही एकनाथ शिंदेंमुळे नाही. ते उद्धव ठाकरे यांच्यामुळे आमदार झाले. पण हे महाशय सुरतला गेले, गोहाटीला गेले, गोव्याला गेले, कुठल्यातरी टेबलावर आम्ही त्यांना नाचतानाही बघितलं. तेव्हा त्या भागातील अनेक शिवसैनिकांनाही रडू कोसळलं होतं. आता ही कर्माची फळं असतात. ती अनेकांना भोगावी लागतील. उद्धव ठाकरे हे देव माणूस आहेत, हे तुम्हाला आता पटलं, आहेतच. त्यासाठी इतर कुणाच्या सर्टिफिकेटची आवश्यकता नाही," असेही राऊत म्हणाले.

पश्चाताप झालाय घरी बसा -जर वनगा यांना केलेल्या चुकीचा पश्चाताप होत असेल, तर मातोश्रीचे दरवाजे पुन्हा उघडले जाऊ शकतात? असा प्रश्न विचारला असता, राऊत म्हणाले, हा प्रश्न तुम्ही कशासाठी विचारताय या प्रश्नाला काय अर्थ आहे? पश्चाताप झालाय घरी बसा.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे