शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

उद्धव ठाकरेंनी दत्तक घेतलं होतं, पण...; श्रीनिवास वनगांच्या मनस्तापावर संजय राऊत स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2024 12:49 IST

उद्धव ठाकरे यांनी या कुटुंबाला दत्तक घेऊन, या श्रीनिवास वनगा यांना लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी उभे केले, ताकद लावली आणि स्वतः प्रचारात दाखल झाले. दुर्दैवाने त्यांचा पराभव झाल्यानंतर, त्यांना विधानसभेत आणण्यासाठीही उद्धव ठाकरे यांचाच पुढाकार होता.

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेले पालघरचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार श्रीनिवास वनगा गेल्या काही तासांपासून नॉट रिचेबल आहेत. कुटुंबीय आणि पोलीस प्रशासन त्यांचा शोध घेत आहे. नॉट रिचेबल होण्यापूर्वी त्यांनी धाय मोकलून रडत उद्धव ठाकरे यांची माफीही मागितली. यासंदर्भात बोलताना आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे यांनी या कुटुंबाला दत्तक घेतले होते. लोकसभाही लढवली होती. पण दुर्दैवाने त्यांचा पराभव झाला. यानंतर त्यांना विधानसभेत आणण्यासाठीही उद्धव ठाकरे यांचाच पुढाकार होता. पश्चाताप झालाय आता घरी बसा, असे राऊत यांनी म्हटले आहे. ते पत्रकारांसोबत बोलत होते.

राऊत म्हणाले, "हे जे वनगा नावाचे गृहस्त आहेत, आमदार झाले ते उद्धव ठाकरे यांच्यामुळे, उद्धव ठाकरे यांनी त्यांना लोकसभाही लढवली. भाजपने दुर्लक्ष केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी या कुटुंबाला दत्तक घेऊन, या श्रीनिवास वनगा यांना लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी उभे केले, ताकद लावली आणि स्वतः प्रचारात दाखल झाले. दुर्दैवाने त्यांचा पराभव झाल्यानंतर, त्यांना विधानसभेत आणण्यासाठीही उद्धव ठाकरे यांचाच पुढाकार होता. त्या कुटुंबाला न्याय मिळायला हवा, अशी त्यांची भूमिका होती. 

तेव्हा त्या भागातील अनेक शिवसैनिकांनाही रडू कोसळलं होतं -"श्रीनिवास वनगा हे आमदार झाले ते काही एकनाथ शिंदेंमुळे नाही. ते उद्धव ठाकरे यांच्यामुळे आमदार झाले. पण हे महाशय सुरतला गेले, गोहाटीला गेले, गोव्याला गेले, कुठल्यातरी टेबलावर आम्ही त्यांना नाचतानाही बघितलं. तेव्हा त्या भागातील अनेक शिवसैनिकांनाही रडू कोसळलं होतं. आता ही कर्माची फळं असतात. ती अनेकांना भोगावी लागतील. उद्धव ठाकरे हे देव माणूस आहेत, हे तुम्हाला आता पटलं, आहेतच. त्यासाठी इतर कुणाच्या सर्टिफिकेटची आवश्यकता नाही," असेही राऊत म्हणाले.

पश्चाताप झालाय घरी बसा -जर वनगा यांना केलेल्या चुकीचा पश्चाताप होत असेल, तर मातोश्रीचे दरवाजे पुन्हा उघडले जाऊ शकतात? असा प्रश्न विचारला असता, राऊत म्हणाले, हा प्रश्न तुम्ही कशासाठी विचारताय या प्रश्नाला काय अर्थ आहे? पश्चाताप झालाय घरी बसा.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे