शहरं
Join us  
Trending Stories
1
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
2
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
3
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
4
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
5
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
6
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
7
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
8
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
9
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
10
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
11
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
12
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
13
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
14
'अमेरिका रशियन तेल खरेदीची परवानगी देतो; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
15
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
16
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
17
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
18
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
19
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
20
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका

संपूर्ण देशात प्रत्येक भागात २४ तास वीज देणं शक्य, कारण...; KCR यांनी दिलं वचन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2023 18:30 IST

कोळसा आयात करायची गरज का? जेवढे अदानीवर प्रेम तितके देशातील जनतेवर का नाही? असा सवाल केसीआर यांनी मोदींना केला.

नांदेड - देशाची ४ लाख १० हजार मेगावॅट पॉवर क्षमता आहे. २ लाख १५ हजार मेगावॅटपेक्षा कधीही जास्त वापर विजेचा होत नाही. ४० हजार मेगावॅट वीज उत्पादन करणारे कारखाने देशातील विविध भागात आहे. पण तरीही कुठल्याही राज्यात २४ तास वीज मिळत नाही. अनेक राज्यात शेतकरी चिंताग्रस्त आहेत. कधी दिवसा तर कधी रात्री लाईट येते. लांबलचक भाषण, खोटी भाषणे कितीदिवस ऐकत राहणार? असं सांगत तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. 

मुख्यमंत्री केसीआर म्हणाले की, वीज खासगीकरण केल्यास आम्ही सत्तेत आल्यावर पुन्हा परत घेऊ. ९० टक्के वीज कंपन्यांचे सरकारीकरण होईल. आम्ही तेलंगणा राज्यात ते करून दाखवलंय. जर देशाची जनता आम्हाला संधी दिली तर २ वर्षात देशात उच्च गुणवत्तेची वीज २४ तास देऊ. आम्ही हे राज्यात केलेय. देशात तेलंगणा हे एकमेव राज्य आहे जिथे २४ तास वीज दिली जाते असं त्यांनी सांगितले. 

कोळसा आयात करण्याची गरज काय? कोळसा आयात करायची गरज का? जेवढे अदानीवर प्रेम तितके देशातील जनतेवर का नाही? केंद्रानं राज्यांना कोळसा आयात करण्याचे निर्बंध घातलेत. कोळसा देशात इतक्या प्रमाणात आहे तरी देशात बाहेरून कोळसा आयात करावा लागतो. देशात २-३ रेल्वे रुळ बनवले तर कोळसा वाहतूक करण्यात सोप्पं जाईल. १ किलोही कोळसा आयात करण्याची देशात गरज नाही. राज्यांना बळजबरीनं कोळसा खरेदी करायला सांगितले जाते. त्यामुळे परिवर्तन होणं काळाची गरज आहे असंही मुख्यमंत्री केसीआर म्हणाले. 

जनता पाण्यापासून वंचित का? सरकार दमदार असेल आणि रणनीती बदलेल तर प्रत्येक एकरला पाणी देऊ शकतो. पाणी मुलभूत गरज आहे. देशात पाण्याची कमतरता आहे. दुषित पाणी पिऊन लोकांचं आरोग्य बिघडत आहे. पाण्यासाठी युद्ध करण्याची देशात गरज आहे का? राज्याराज्यांमध्ये पाण्यावरुन लढाई सुरू आहे. भरपूर पाणी प्रत्येक एकरला देऊ शकतो. पाणी संपत्ती निसर्गाने दिलीय मग जनता यापासून वंचित का? पुढील १०० वर्ष शुद्ध पाण्याची कमतरता देशाला भासणार नाही. संपत्ती राहूनही पिण्याच्या पाण्यापासून देश तरसतो आहे. बीआरएस जर सरकार बनवेल तर पाण्याचे धोरण राबवेल असंही केसीआर यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं. 

टॅग्स :TelanganaतेलंगणाelectricityवीजIndiaभारत