शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्यांना इंग्रजीत पत्रिका हवी, त्यांना इंग्लंडला पाठवा; सुधीर मुनगंटीवार यांचा सरकारला घरचा अहेर
2
चीनमध्ये जिनपिंग पर्व संपुष्टात? १६ दिवसांपासून बेपत्ता; सत्तेतून बेदखल होण्याची चिन्हे....
3
४ टक्के वाढू शकतो कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता; मोदी सरकार देऊ शकते मोठं गिफ्ट
4
छत्रपती संभाजीनगर हादरलं; काळा गणपती मंदिराजवळ भीषण अपघात, दोन ठार, चार जखमी
5
एक मिनिटात तत्काळ तिकीट, रेल्वेच्या नव्या नियमानंतर काढली अशी पळवाट, टेलिग्रामवर रॅकेट सक्रिय
6
अमित शाह पुणे दौरा: झाडाझडतीत तरुणाकडे मिळाले पिस्तुल, पोलिसांनी केले जप्त
7
Trump Putin Call: '...तोपर्यंत युद्ध थांबवणार नाही'; व्लादिमीर पुतीन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना ठणकावलं
8
कंत्राटे, टेंडर्सच्या मागे लागू नका; मतदारसंघाच्या हिताचा विचार करा, भाजप आमदारांना मुख्यमंत्र्यांनी दिला सल्ला
9
Pune Accident Video: कार थांबली, ते जवळ गेले अन् पाठीमागून...; काळजाचा ठोका चुकवणारा अपघात
10
कार आणि मोटारसायकलच्या टायरमध्ये हवा कमी ठेवण्याचे ४ मोठे नुकसान, अपघाताचाही धोका!
11
Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट ओपनिंग; सेन्सेक्स ७० अंकांनी वधारला, मेटल-ऑटो शेअर्समध्ये घसरण
12
BJP New President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष महिला? निर्मला सितारामन यांच्यासह 'ही' ३ नावे चर्चेत!
13
महाराष्ट्रात रजिस्ट्रेशन, चालवली बंगळुरूत; फरारीच्या मालकाला भरावा लागला १.४२ कोटींचा टॅक्स; प्रकरण काय?
14
Post Office च्या PPF स्कीममध्ये महिन्याला ₹२००० जमा कराल तर १५ वर्षांनंतर किती रक्कम मिळेल, पैसेही राहतील सुरक्षित
15
One Big Beautiful Bill Passed : डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा विजय, अमेरिकेच्या संसदेत 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; नेमकं काय आहे यात?
16
शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर पती पराग त्यागीची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट, म्हणाला- "आजूबाजूच्या अफवांमध्ये.."
17
"गरीब हिंदूंना कशाला मारताय? हिंमत असेल तर नळबाजार, मोहम्मद अली रोड येथे जाऊन…’’, नितेश राणेंनी दिलं आव्हान 
18
"एअर इंडियाने कोलंबोला जातोय, इच्छापत्र बनवून ठेवलंय...", प्रसिद्ध अभिनेत्याने शेअर केला Video
19
Today Daily Horoscope: कोणत्या राशीला आज धनलाभाचा योग? जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
20
‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ विजेत्या गावांना प्रत्येकी २५ लाख; ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची घोषणा

संपूर्ण देशात प्रत्येक भागात २४ तास वीज देणं शक्य, कारण...; KCR यांनी दिलं वचन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2023 18:30 IST

कोळसा आयात करायची गरज का? जेवढे अदानीवर प्रेम तितके देशातील जनतेवर का नाही? असा सवाल केसीआर यांनी मोदींना केला.

नांदेड - देशाची ४ लाख १० हजार मेगावॅट पॉवर क्षमता आहे. २ लाख १५ हजार मेगावॅटपेक्षा कधीही जास्त वापर विजेचा होत नाही. ४० हजार मेगावॅट वीज उत्पादन करणारे कारखाने देशातील विविध भागात आहे. पण तरीही कुठल्याही राज्यात २४ तास वीज मिळत नाही. अनेक राज्यात शेतकरी चिंताग्रस्त आहेत. कधी दिवसा तर कधी रात्री लाईट येते. लांबलचक भाषण, खोटी भाषणे कितीदिवस ऐकत राहणार? असं सांगत तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. 

मुख्यमंत्री केसीआर म्हणाले की, वीज खासगीकरण केल्यास आम्ही सत्तेत आल्यावर पुन्हा परत घेऊ. ९० टक्के वीज कंपन्यांचे सरकारीकरण होईल. आम्ही तेलंगणा राज्यात ते करून दाखवलंय. जर देशाची जनता आम्हाला संधी दिली तर २ वर्षात देशात उच्च गुणवत्तेची वीज २४ तास देऊ. आम्ही हे राज्यात केलेय. देशात तेलंगणा हे एकमेव राज्य आहे जिथे २४ तास वीज दिली जाते असं त्यांनी सांगितले. 

कोळसा आयात करण्याची गरज काय? कोळसा आयात करायची गरज का? जेवढे अदानीवर प्रेम तितके देशातील जनतेवर का नाही? केंद्रानं राज्यांना कोळसा आयात करण्याचे निर्बंध घातलेत. कोळसा देशात इतक्या प्रमाणात आहे तरी देशात बाहेरून कोळसा आयात करावा लागतो. देशात २-३ रेल्वे रुळ बनवले तर कोळसा वाहतूक करण्यात सोप्पं जाईल. १ किलोही कोळसा आयात करण्याची देशात गरज नाही. राज्यांना बळजबरीनं कोळसा खरेदी करायला सांगितले जाते. त्यामुळे परिवर्तन होणं काळाची गरज आहे असंही मुख्यमंत्री केसीआर म्हणाले. 

जनता पाण्यापासून वंचित का? सरकार दमदार असेल आणि रणनीती बदलेल तर प्रत्येक एकरला पाणी देऊ शकतो. पाणी मुलभूत गरज आहे. देशात पाण्याची कमतरता आहे. दुषित पाणी पिऊन लोकांचं आरोग्य बिघडत आहे. पाण्यासाठी युद्ध करण्याची देशात गरज आहे का? राज्याराज्यांमध्ये पाण्यावरुन लढाई सुरू आहे. भरपूर पाणी प्रत्येक एकरला देऊ शकतो. पाणी संपत्ती निसर्गाने दिलीय मग जनता यापासून वंचित का? पुढील १०० वर्ष शुद्ध पाण्याची कमतरता देशाला भासणार नाही. संपत्ती राहूनही पिण्याच्या पाण्यापासून देश तरसतो आहे. बीआरएस जर सरकार बनवेल तर पाण्याचे धोरण राबवेल असंही केसीआर यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं. 

टॅग्स :TelanganaतेलंगणाelectricityवीजIndiaभारत