शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
3
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
4
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
5
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
6
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
7
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
8
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
9
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
10
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
11
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
12
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
13
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
14
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
15
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
16
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
17
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
18
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
19
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
20
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!

संविधानाची ७५ वर्षं पूर्ण होत असताना सरन्यायाधीश होण्याचा सन्मान मिळाला याचा विशेष आनंद - सरन्यायाधीश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 12:54 IST

बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाने रविवारी आयोजित केलेल्या सत्कार समारंभात ते बोलत होते.

मुंबई : विधिमंडळ, कार्यपालिका व न्यायपालिका नाही तर देशाचे संविधान सर्वोच्च आहे. त्याआधारेच लोकशाहीच्या या तीन स्तंभांनी एकत्रितपणे काम केले पाहिजे. संविधानात सुधारणा करण्याचा अधिकार संसदेला असला, तरी ते मूलभूत रचनेला स्पर्श करू शकत नाही, असे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी सांगितले.बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाने रविवारी आयोजित केलेल्या सत्कार समारंभात ते बोलत होते. याप्रसंगी न्यायमूर्ती गवई यांच्या ५० महत्त्वाच्या निर्णयांचा आढावा घेणारे पुस्तकही प्रकाशित करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक, दीपांकर दत्ता, प्रसन्ना वराळे आणि उच्च न्यायालयाचे मुख्य न्या. आलोक आराधे हेही यावेळी उपस्थित होते.

संविधानाची ७५ वर्षं पूर्ण होत असताना सरन्यायाधीश होण्याचा सन्मान मिळाला याचा विशेष आनंद आहे असे सांगताना गवई म्हणाले की, निवाऱ्याचा अधिकार हा मूलभूत अधिकार आहे. एखाद्या व्यक्तीवर गुन्हा दाखल असेल वा ती दोषी ठरली असली तरी त्याच्या कुटुंबाचे कायदेशीर घर कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. कायद्याचे राज्य पाळले गेले पाहिजे. आम्ही अलीकडेच मणिपूरलाही भेट दिली. तेथे संघर्ष करणाऱ्या दोन्ही समुदायांना आश्वासन दिले, की देश तुमच्या पाठीशी आहे व न्याय तुमच्या दाराशी आहे, लाभ घ्या. हे करण्याची संधी मिळाली, हे माझे भाग्य आहे.

नोव्हेंबरमध्ये गवई सेवानिवृत्त झाल्यानंतर न्या. सूर्यकांत सरन्यायाधीश होणार आहेत. न्या. सूर्यकांत यावेळी म्हणाले की, महाराष्ट्राच्या बारने नागरी कायदे, फौजदारी कायदे, विशेषतः संविधानवाद, संविधान नीतिमत्ता, मूलभूत संरचना सिद्धांत या बाबतीत दिलेले योगदान अद्वितीय आहे.

...आणि सभागृहात सर्वांना गहिवरून आले या कार्यक्रमात न्या. भूषण गवई यांनी अमरावतीपासून नागपूर आणि मुंबई-दिल्लीपर्यंतच्या कारकिर्दीतील प्रवास उलगडून सांगितला. अमरावतीमध्ये नगर परिषद शाळा क्रमांक ८ मध्ये आपण शिकलो. 

मी आर्किटेक्ट होणार होतो; पण वडिलांची वकील होण्याची इच्छा पूर्ण न झाल्याने त्यांनी मलाच वकील होण्यास सांगितले.  त्यांचा आदेश पाळून मी या क्षेत्रात आलो.आता वडील असते तर त्यांना खूप आनंद झाला असता, असे बोलताना न्या. गवई यांना गहिवरून आले. त्यांच्या आई कमलताई गवई यांचेही डोळे यावेळी भरून आले. यामुळे सभागृहातील सारेच काही क्षणासाठी भावुक झाल्याचे दिसून आले.

टॅग्स :Mumbaiमुंबई