शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मध्य रेल्वेची ठाणे ते सीएसएमटी दरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद
2
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
3
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
4
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
5
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
6
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
7
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
8
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
9
'हिंदुस्तान झिदाबाद...' तिरंग्यासाठी लंडनमध्ये पाकिस्तानींशी भिडल्या भारतीय तरुणी, पाहा VIDEO
10
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...
12
LIC ची मोठी घोषणा! बंद पडलेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी; विलंब शुल्कातही मोठी सूट
13
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
14
रोनाल्डोचा साखरपुडा आणि सौदीचे ‘रहस्य’! स्थानिकांना वेगळा नियम आणि स्टारला वेगळा न्याय, का?
15
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?
16
चिपळुणात वाशिष्ठी नदीने ओलांडली इशारा पातळी; पूरसदृश स्थितीमुळे कामाशिवाय घराबाहेर न पडण्याची सूचना
17
"२६ जुलैचा जलप्रलय, तुम्ही मला...", वीणा जामकरने सांगितली ज्योती चांदेकरांची भावुक आठवण
18
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
19
Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
20
"झोया अख्तर बड्या बापाची मुलगी...", 'गलीबॉय'साठी ऑडिशन द्यायला सांगितल्याने भडकल्या उषा नाडकर्णी

संविधानाची ७५ वर्षं पूर्ण होत असताना सरन्यायाधीश होण्याचा सन्मान मिळाला याचा विशेष आनंद - सरन्यायाधीश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 12:54 IST

बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाने रविवारी आयोजित केलेल्या सत्कार समारंभात ते बोलत होते.

मुंबई : विधिमंडळ, कार्यपालिका व न्यायपालिका नाही तर देशाचे संविधान सर्वोच्च आहे. त्याआधारेच लोकशाहीच्या या तीन स्तंभांनी एकत्रितपणे काम केले पाहिजे. संविधानात सुधारणा करण्याचा अधिकार संसदेला असला, तरी ते मूलभूत रचनेला स्पर्श करू शकत नाही, असे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी सांगितले.बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाने रविवारी आयोजित केलेल्या सत्कार समारंभात ते बोलत होते. याप्रसंगी न्यायमूर्ती गवई यांच्या ५० महत्त्वाच्या निर्णयांचा आढावा घेणारे पुस्तकही प्रकाशित करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक, दीपांकर दत्ता, प्रसन्ना वराळे आणि उच्च न्यायालयाचे मुख्य न्या. आलोक आराधे हेही यावेळी उपस्थित होते.

संविधानाची ७५ वर्षं पूर्ण होत असताना सरन्यायाधीश होण्याचा सन्मान मिळाला याचा विशेष आनंद आहे असे सांगताना गवई म्हणाले की, निवाऱ्याचा अधिकार हा मूलभूत अधिकार आहे. एखाद्या व्यक्तीवर गुन्हा दाखल असेल वा ती दोषी ठरली असली तरी त्याच्या कुटुंबाचे कायदेशीर घर कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. कायद्याचे राज्य पाळले गेले पाहिजे. आम्ही अलीकडेच मणिपूरलाही भेट दिली. तेथे संघर्ष करणाऱ्या दोन्ही समुदायांना आश्वासन दिले, की देश तुमच्या पाठीशी आहे व न्याय तुमच्या दाराशी आहे, लाभ घ्या. हे करण्याची संधी मिळाली, हे माझे भाग्य आहे.

नोव्हेंबरमध्ये गवई सेवानिवृत्त झाल्यानंतर न्या. सूर्यकांत सरन्यायाधीश होणार आहेत. न्या. सूर्यकांत यावेळी म्हणाले की, महाराष्ट्राच्या बारने नागरी कायदे, फौजदारी कायदे, विशेषतः संविधानवाद, संविधान नीतिमत्ता, मूलभूत संरचना सिद्धांत या बाबतीत दिलेले योगदान अद्वितीय आहे.

...आणि सभागृहात सर्वांना गहिवरून आले या कार्यक्रमात न्या. भूषण गवई यांनी अमरावतीपासून नागपूर आणि मुंबई-दिल्लीपर्यंतच्या कारकिर्दीतील प्रवास उलगडून सांगितला. अमरावतीमध्ये नगर परिषद शाळा क्रमांक ८ मध्ये आपण शिकलो. 

मी आर्किटेक्ट होणार होतो; पण वडिलांची वकील होण्याची इच्छा पूर्ण न झाल्याने त्यांनी मलाच वकील होण्यास सांगितले.  त्यांचा आदेश पाळून मी या क्षेत्रात आलो.आता वडील असते तर त्यांना खूप आनंद झाला असता, असे बोलताना न्या. गवई यांना गहिवरून आले. त्यांच्या आई कमलताई गवई यांचेही डोळे यावेळी भरून आले. यामुळे सभागृहातील सारेच काही क्षणासाठी भावुक झाल्याचे दिसून आले.

टॅग्स :Mumbaiमुंबई