शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सगळ्या मुस्लिमांविरोधात नाही, पण जो..."; मंत्री नितेश राणेंनी दिली उघड धमकी
2
काळजाचा थरार! ११ वर्षीय शिवमनं बिबट्याच्या हल्ल्यातून ९ वर्षीय बहीण स्वरांजलीला वाचवले
3
वेदा‍ंता ग्रुपचे चेअरमन अनिल अग्रवाल यांचा मुलगा अग्निवेश अग्रवाल यांचं निधन
4
अमेरिका-रशियात तणाव वाढला! व्हेनेझुएलाहून जाणारा रशियन तेल टँकर US नौदलाने जप्त केला
5
उल्हासनगरातील गुंडाराज संपवून शहराचा चेहरामोहरा बदलणार; CM देवेंद्र फडणवीसांचा निशाणा कुणावर?
6
मतदानापूर्वीच मनसेत मोठा भूकंप होणार?; भाजपा-शिंदेसेना राज ठाकरेंना धक्का देण्याच्या तयारीत
7
मासेमारी करताना समुद्रात पडला खलाशी; ४ दिवसांनी मध्यरात्री 'असं' काय घडलं, कुटुंबाला बसला शॉक
8
पुण्यात 'पाताळ लोक' तयार करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितला अख्खा प्लॅन
9
"भाजपा कधीच मुस्लीम विरोधी नाही"; अकोटमधील AIMIM सोबत युतीवर BJP आमदाराचा पुन्हा ट्विस्ट
10
Maharashtra Government: सर्व पक्षांच्या प्रतोदांची पॉवर वाढली! आता थेट मंत्रिपदाचा दर्जा; अलिशान सुविधाही मिळणार
11
रक्षकच बनला भक्षक! चालत्या गाडीत पोलिस निरीक्षकाचा 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार
12
Nashik Accident: नाशिक-पेठ महामार्गावर काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; ४ जण ठार, ६ गंभीर जखमी
13
Shirdi Crime: 'तुझा नवरा माजलाय, त्याचे हातपाय तोडावे लागतील', अपहरण, हत्या आणि टायर टाकून जाळले; शिर्डीतील घटना
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात चकमक; सुरक्षा दलांनी घनदाट जंगलात दहशतवाद्यांना घेरले
15
AIMIM सोबत युती भोवणार, भाजपा आमदाराला पक्षाची नोटीस; "पक्षाच्या ध्येय धोरणाला सुरंग लावला..."
16
Plastic Water Bottle: गाडीत ठेवलेल्या बाटलीतील पाणी पिता का? तज्ज्ञांनी दिला गंभीर इशारा!
17
'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तान बिथरला; युद्ध रोखण्यासाठी ६० वेळा अमेरिकेला विनवणी, मग ४५ कोटी...
18
"अजित पवार हेच महाराष्ट्रातील भ्रष्टाचाराचे 'आका', स्वतःच्या लेकाचे पराक्रम पहा"; भाजपा आमदार लांडगेंचा हल्ला, पार्थ पवारांवरून डिवचले
19
किंग कोहलीभोवती चाहत्यांचा गराडा; 'विराट' गर्दीतून कसा बसा कारपर्यंत पोहोचला! व्हिडिओ व्हायरल
20
बापाचे काबाडकष्ट! १५ वर्षे दोन नोकऱ्या करून लेकीला दिलं शिक्षण; सर्वत्र होतंय भरभरून कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

संविधानाची ७५ वर्षं पूर्ण होत असताना सरन्यायाधीश होण्याचा सन्मान मिळाला याचा विशेष आनंद - सरन्यायाधीश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 12:54 IST

बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाने रविवारी आयोजित केलेल्या सत्कार समारंभात ते बोलत होते.

मुंबई : विधिमंडळ, कार्यपालिका व न्यायपालिका नाही तर देशाचे संविधान सर्वोच्च आहे. त्याआधारेच लोकशाहीच्या या तीन स्तंभांनी एकत्रितपणे काम केले पाहिजे. संविधानात सुधारणा करण्याचा अधिकार संसदेला असला, तरी ते मूलभूत रचनेला स्पर्श करू शकत नाही, असे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी सांगितले.बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाने रविवारी आयोजित केलेल्या सत्कार समारंभात ते बोलत होते. याप्रसंगी न्यायमूर्ती गवई यांच्या ५० महत्त्वाच्या निर्णयांचा आढावा घेणारे पुस्तकही प्रकाशित करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक, दीपांकर दत्ता, प्रसन्ना वराळे आणि उच्च न्यायालयाचे मुख्य न्या. आलोक आराधे हेही यावेळी उपस्थित होते.

संविधानाची ७५ वर्षं पूर्ण होत असताना सरन्यायाधीश होण्याचा सन्मान मिळाला याचा विशेष आनंद आहे असे सांगताना गवई म्हणाले की, निवाऱ्याचा अधिकार हा मूलभूत अधिकार आहे. एखाद्या व्यक्तीवर गुन्हा दाखल असेल वा ती दोषी ठरली असली तरी त्याच्या कुटुंबाचे कायदेशीर घर कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. कायद्याचे राज्य पाळले गेले पाहिजे. आम्ही अलीकडेच मणिपूरलाही भेट दिली. तेथे संघर्ष करणाऱ्या दोन्ही समुदायांना आश्वासन दिले, की देश तुमच्या पाठीशी आहे व न्याय तुमच्या दाराशी आहे, लाभ घ्या. हे करण्याची संधी मिळाली, हे माझे भाग्य आहे.

नोव्हेंबरमध्ये गवई सेवानिवृत्त झाल्यानंतर न्या. सूर्यकांत सरन्यायाधीश होणार आहेत. न्या. सूर्यकांत यावेळी म्हणाले की, महाराष्ट्राच्या बारने नागरी कायदे, फौजदारी कायदे, विशेषतः संविधानवाद, संविधान नीतिमत्ता, मूलभूत संरचना सिद्धांत या बाबतीत दिलेले योगदान अद्वितीय आहे.

...आणि सभागृहात सर्वांना गहिवरून आले या कार्यक्रमात न्या. भूषण गवई यांनी अमरावतीपासून नागपूर आणि मुंबई-दिल्लीपर्यंतच्या कारकिर्दीतील प्रवास उलगडून सांगितला. अमरावतीमध्ये नगर परिषद शाळा क्रमांक ८ मध्ये आपण शिकलो. 

मी आर्किटेक्ट होणार होतो; पण वडिलांची वकील होण्याची इच्छा पूर्ण न झाल्याने त्यांनी मलाच वकील होण्यास सांगितले.  त्यांचा आदेश पाळून मी या क्षेत्रात आलो.आता वडील असते तर त्यांना खूप आनंद झाला असता, असे बोलताना न्या. गवई यांना गहिवरून आले. त्यांच्या आई कमलताई गवई यांचेही डोळे यावेळी भरून आले. यामुळे सभागृहातील सारेच काही क्षणासाठी भावुक झाल्याचे दिसून आले.

टॅग्स :Mumbaiमुंबई