शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
2
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
3
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
4
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
5
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
6
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
7
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
8
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
9
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
10
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
11
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
12
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
13
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
14
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
15
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
16
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
17
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
18
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
19
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
20
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका

"ठाकरे सेनेला राजकारणात कुणाचा तरी आधार घ्यावा लागतोय ही खरी शोकांतिका"

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2022 11:13 IST

साडेतीन महिन्याचा कालावधी सोडला तर रोज त्याच विषयांवर बोलतात. लोकं राऊतांचे एका कानाने ऐकतात अन् दुसऱ्या कानानं सोडून देतात असं शंभुराज देसाई म्हणाले.

मुंबई - ठाकरे सेनेला आता एका मांडीवर राष्ट्रवादीनं बसवलंय तर दुसऱ्या मांडीवर काँग्रेसनं बसवलंय. ठाकरे सेनेला दत्तक घेतलं आहे. जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष उघडपणे राष्ट्रवादी शिवसेना असल्याचं विधान केले आहे. ठाकरे सेनेला कुणाचा तरी आधार घ्यावा लागतोय. ज्या बाळासाहेबांनी इतरांना आधार दिला त्यांच्या मुलाला आणि नातवाला त्यांच्या चुकीच्या धोरणांमुळे इतरांचा आधार घ्यावा लागतो ही खरी शोकांतिका आहे अशा शब्दात मंत्री शंभुराज देसाई यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे. 

मंत्री शंभुराज देसाई म्हणाले की, दिशा सालियान प्रकरणी जेव्हा चर्चा सभागृहात सुरू होती. तेव्हा या प्रकरणात जी नवीन माहिती समोर आली आहे. पूर्वीच्या तपासात ज्या बाबी समोर आल्या नव्हत्या किंवा जाणीवपूर्वक आणल्या नाहीत. त्या माहितीची चौकशी करणार असल्याचं गृहमंत्र्यांनी म्हटलं. तपासून घ्यायच्या अगोदरच नाना पटोले कुठल्या आधारे माहिती खोटी असल्याचा दावा करतात. तपास यंत्रणेचा अहवाल पुढे आल्यावर त्यावर भाष्य करता येईल असं प्रत्युत्तर त्यांनी नाना पटोलेंना दिलं. 

तर चिखलफेक तुमचे तीन पक्ष करतायेत. तुमचीच महाविकास आघाडी आहे. धोरणात्मक, राजकीय विषयांवर सभागृहात चर्चा करायची असेल. काही सकारात्मक विषय मांडायचे असतील. सकाळी ८ वाजल्यापासून रोज टीव्हीवर येऊन बोलतात. साडेतीन महिन्याचा कालावधी सोडला तर रोज त्याच विषयांवर बोलतात. लोकं राऊतांचे एका कानाने ऐकतात अन् दुसऱ्या कानानं सोडून देतात असा टोला शंभुराज देसाईंनी संजय राऊतांना लगावला.  

दरम्यान, २ वर्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विदर्भात आले नाही. विदर्भ, मराठवाड्याचे प्रश्नावर सभागृहात चर्चा सुरू आहे परंतु विरोधक चर्चेत सहभागी होत नाही. पहिला आठवडा पार पडला. समर्पक उत्तरे सगळ्यांना दिली. सभागृह सुरू झाल्यापासून संपेपर्यंत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सभागृहात असतात. आम्हाला प्रश्न सोडवायचे आहेत. आम्ही आमचे काम करू असंही शंभुराज देसाई म्हणाले. 

काय म्हणाले संजय राऊत?अधिवेशनात काहीही गाजत नाही. केवळ चिखलफेक केली जात आहे. भ्रष्टाचार दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे हे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला काळिमा फासणारे आहे. कुठलेही सरकार इतक्या सूडबुद्धीने वागले नाही. या प्रकरणात भाजपाला जे हवे तेच घडलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाचा मुद्दा मागे पडला. मंत्र्यांविरोधात SIT स्थापन करा ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला असं संजय राऊतांनी म्हटलं.  

टॅग्स :Shambhuraj Desaiशंभूराज देसाईUddhav Thackerayउद्धव ठाकरेSanjay Rautसंजय राऊत