शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

"ठाकरे सेनेला राजकारणात कुणाचा तरी आधार घ्यावा लागतोय ही खरी शोकांतिका"

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2022 11:13 IST

साडेतीन महिन्याचा कालावधी सोडला तर रोज त्याच विषयांवर बोलतात. लोकं राऊतांचे एका कानाने ऐकतात अन् दुसऱ्या कानानं सोडून देतात असं शंभुराज देसाई म्हणाले.

मुंबई - ठाकरे सेनेला आता एका मांडीवर राष्ट्रवादीनं बसवलंय तर दुसऱ्या मांडीवर काँग्रेसनं बसवलंय. ठाकरे सेनेला दत्तक घेतलं आहे. जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष उघडपणे राष्ट्रवादी शिवसेना असल्याचं विधान केले आहे. ठाकरे सेनेला कुणाचा तरी आधार घ्यावा लागतोय. ज्या बाळासाहेबांनी इतरांना आधार दिला त्यांच्या मुलाला आणि नातवाला त्यांच्या चुकीच्या धोरणांमुळे इतरांचा आधार घ्यावा लागतो ही खरी शोकांतिका आहे अशा शब्दात मंत्री शंभुराज देसाई यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे. 

मंत्री शंभुराज देसाई म्हणाले की, दिशा सालियान प्रकरणी जेव्हा चर्चा सभागृहात सुरू होती. तेव्हा या प्रकरणात जी नवीन माहिती समोर आली आहे. पूर्वीच्या तपासात ज्या बाबी समोर आल्या नव्हत्या किंवा जाणीवपूर्वक आणल्या नाहीत. त्या माहितीची चौकशी करणार असल्याचं गृहमंत्र्यांनी म्हटलं. तपासून घ्यायच्या अगोदरच नाना पटोले कुठल्या आधारे माहिती खोटी असल्याचा दावा करतात. तपास यंत्रणेचा अहवाल पुढे आल्यावर त्यावर भाष्य करता येईल असं प्रत्युत्तर त्यांनी नाना पटोलेंना दिलं. 

तर चिखलफेक तुमचे तीन पक्ष करतायेत. तुमचीच महाविकास आघाडी आहे. धोरणात्मक, राजकीय विषयांवर सभागृहात चर्चा करायची असेल. काही सकारात्मक विषय मांडायचे असतील. सकाळी ८ वाजल्यापासून रोज टीव्हीवर येऊन बोलतात. साडेतीन महिन्याचा कालावधी सोडला तर रोज त्याच विषयांवर बोलतात. लोकं राऊतांचे एका कानाने ऐकतात अन् दुसऱ्या कानानं सोडून देतात असा टोला शंभुराज देसाईंनी संजय राऊतांना लगावला.  

दरम्यान, २ वर्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विदर्भात आले नाही. विदर्भ, मराठवाड्याचे प्रश्नावर सभागृहात चर्चा सुरू आहे परंतु विरोधक चर्चेत सहभागी होत नाही. पहिला आठवडा पार पडला. समर्पक उत्तरे सगळ्यांना दिली. सभागृह सुरू झाल्यापासून संपेपर्यंत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सभागृहात असतात. आम्हाला प्रश्न सोडवायचे आहेत. आम्ही आमचे काम करू असंही शंभुराज देसाई म्हणाले. 

काय म्हणाले संजय राऊत?अधिवेशनात काहीही गाजत नाही. केवळ चिखलफेक केली जात आहे. भ्रष्टाचार दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे हे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला काळिमा फासणारे आहे. कुठलेही सरकार इतक्या सूडबुद्धीने वागले नाही. या प्रकरणात भाजपाला जे हवे तेच घडलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाचा मुद्दा मागे पडला. मंत्र्यांविरोधात SIT स्थापन करा ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला असं संजय राऊतांनी म्हटलं.  

टॅग्स :Shambhuraj Desaiशंभूराज देसाईUddhav Thackerayउद्धव ठाकरेSanjay Rautसंजय राऊत