शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईच्या बाबतीत काहीतरी डाव नक्कीच शिजतोय..."; राज ठाकरेंचे 'बॉम्बे' वादावर रोखठोक मत
2
"…तर मी अनंत गर्जेच्या दोन कानाखाली लावल्या असत्या"; पंकजा मुंडेंनी गौरी पालवेंच्या आईवडिलांना काय सांगितलं?
3
"प्रभू श्रीराम सगळ्यांचे... मी दलित म्हणून मला बोलवलं नाही"; अयोध्या खासदाराचा नाराजीचा सूर
4
व्यवहारच अपूर्ण, मुद्रांक शुल्क का भरावे? दंड टाळण्यासाठी ‘अमेडिया’ची पळवाट 
5
Ahilyanagar: मॉर्निंग वॉकला गेलेल्या काँग्रेस जिल्हाध्यक्षाचे अपहरण करून बेदम मारहाण!
6
Apple नंतर ही कम्प्युटर बनवणारी 'ही' दिग्गज कंपनी ६००० कर्मचाऱ्यांची कपात करणार, का घेतला हा मोठा निर्णय?
7
१० वर्षांत १ कोटींचा टप्पा गाठायचा आहे? SIP द्वारे कोणत्या फंडात आणि किती गुंतवणूक करणे फायदेशीर!
8
महालक्ष्मी व्रतकथा: महालक्ष्मी व्रत कथेशिवाय पूजा अपूर्ण; पती-पत्नीने मिळून वाचल्यास मिळते अधिक फळ!
9
घटस्फोट, कौटुंबिक हिंसाचार प्रकरणानंतर सेलिना जेटलीची पहिली पोस्ट; म्हणाली, "माझी मुलं..."
10
मुंबईत थरकाप उडवणारी घटना! अंडी फेकली आणि पाच जणांनी मित्रालाच पेट्रोल टाकून पेटवलं; घटनेचा सीसीटीव्ही व्हायरल
11
पगार ५० हजार...तर तुम्हाला किती मिळेल ग्रॅच्युइटी?; जाणून घ्या, नवीन नियम अन् सोपा फॉर्म्युला
12
मार्गशीर्षातला पहिला गुरुवार, महालक्ष्मी व्रताची तयारी झाली का? वाचा साहित्य आणि पूजाविधी
13
गरिबांसाठीच्या योजनांवर १ लाख कोटी रुपयांचा खर्च; लोककल्याणाचा उदात्त हेतू, पण सरकारी तिजोरीवर वाढता ताण
14
Stock Market: ३ दिवसांच्या घसरणीनंतर शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स २४५ अंकांनी वधारला; गुंतवणूकदारांमध्ये उत्साह
15
टीम इंडियाची लाजिरवाणी कामगिरी! स्टार क्रिकेटर म्हणाला, 'ही' आमच्यासाठी विन-विन सिच्युएशन ठरेल!
16
आजचे राशीभविष्य, २६ नोव्हेंबर २०२५: 'या' राशींसाठी आहे धनलाभाचा योग; वाचा आपले आजचे राशीभविष्य!
17
पेन्शन, टॅक्स पासून एलपीजी पर्यंत; १ डिसेंबरपासून बदलणार हे महत्त्वाचे नियम, तुमच्यावर थेट होणार परिणाम
18
स्मृती मानधनाच्या वडिलांना रुग्णालयातून डिस्चार्ज; पलाश मुच्छलसोबत लग्न अद्यापही लांबणीवरच!
19
देशाच्या माजी राष्ट्रपतींनाच सुनावली २७ वर्षांची शिक्षा, कुठे घडला प्रकार? काय आहे गुन्हा?
20
धर्मेंद्र यांचा 'हा' सिनेमा आता कधीच चाहत्यांच्या भेटीला येणार नाही; दिग्दर्शकाचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

"कामगार उपायुक्तांना धमकावणे, कायदा-सुव्यवस्था पायदळी तुडविणे अशोभनीय"

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2021 18:44 IST

Subhash Desai : औरंगाबादची एकूण कामगिरी उजवी ठरली व त्यामुळे प्रादुर्भाव कमी झालेल्या जिल्ह्यांमध्ये आपल्याला स्थान लाभले. अजूनही रुग्णसंख्या वाढत असलेल्या १८ जिल्ह्यांप्रमाणे औरंगाबादमध्ये लॉकडाऊन वाढवावा लागला नाही, असे राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी म्हटले आहे.

ठळक मुद्देनिर्बंध पाळणारे नागरिक व यंत्रणा राबविणारे अधिकारी-कर्मचारी यांच्यामुळेच करोनाची लाट आपण थोपवू शकलो. आणि पुढेही ही एकजूटच आपल्याला सुरक्षित ठेवील, असा विश्वास सुभाष देसाई यांनी व्यक्त केला.

मुंबई :  राज्यात ‘ब्रेक द चेन अंतर्गंत लावण्यात आलेले निर्बंध १ जूनपासून शिथिल करण्यात आले. औरंगाबाद शहरात देखील सकाळी सात ते २ वाजेपर्यंत सर्व आस्थापना खुल्या करण्याचे जिल्हा प्रशासनाने आदेश दिले आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेप्रमाणेच दुसरी लाट थोपवण्यातही प्रशासनाच्या चोख कामगिरीमुळे व जनतेच्या उत्स्फूर्त सहकार्यामुळे यश आले. औरंगाबादची एकूण कामगिरी उजवी ठरली व त्यामुळे प्रादुर्भाव कमी झालेल्या जिल्ह्यांमध्ये आपल्याला स्थान लाभले. अजूनही रुग्णसंख्या वाढत असलेल्या १८ जिल्ह्यांप्रमाणे औरंगाबादमध्ये लॉकडाऊन वाढवावा लागला नाही, असे राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी म्हटले आहे. (It is indecent to intimidate the Deputy Commissioner of Labor, to trample on law and order - Subhash Desai)

अशात नियम ढाब्यावर बसविणाऱ्या काही व्यापाऱ्यांनी व त्यांच्या समर्थकांनी कामगार उपायुक्तांना धमकावणे व कायदा सुव्यवस्था पायदळी तुडविणे अशोभनीय असल्याचे सांगत जिल्ह्यातील २ लोख ९६ हजार ७५६ दुकाने व आस्थापनांपैकी ८२ आस्थापनांनी शासनाच्या निर्बंधांना झुगारून प्रतिबंधीत कालावधीत आपली दुकाने उघडी ठेवली. ८२ पैकी ४६ प्रकरणाची सुनावणी घेऊन त्यांचे सील उघडण्यास मान्यता दिली. उर्वरित ३६ आस्थपानांची सुनावणी प्रलंबित आहे. त्यांच्यावर टाळेबंदीची कारवाई होणे क्रमप्राप्त होते. त्यामुळे उर्वरित ९९ टक्क्यांहून अधिक नियम पाळणाऱ्या व्यापाऱ्यांप्रति आदर व्यक्त करण्यात आला, असे सुभाष देसाई यांनी सांगितले.

याचबरोबर,  सर्व मान्यवरांनी नियम व कायदे पाळणाऱ्याचा सन्मान करायचे सोडून कायद्याची पायमल्ली करणाऱ्यांची पाठराखण करावी, हे अनाकलनीय म्हटले पाहिजे. निर्बंध पाळणारे नागरिक व यंत्रणा राबविणारे अधिकारी-कर्मचारी यांच्यामुळेच करोनाची लाट आपण थोपवू शकलो. आणि पुढेही ही एकजूटच आपल्याला सुरक्षित ठेवील, असा विश्वास सुभाष देसाई यांनी व्यक्त केला.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याSubhash Desaiसुभाष देसाईAurangabadऔरंगाबादCorona vaccineकोरोनाची लस