शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

"लोकसभेचे मुद्दे विधानसभेला चालणार नाहीत"; फडणवीस यांनी मुंबई, कोकणातील आमदारांना दिला विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2024 07:54 IST

फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर मंगळवारी रात्री उशिरापर्यंत ही बैठक झाली. लोकसभा निवडणुकीत कोकणात महायुतीला चांगले यश मिळाले. मुंबई तुलनेने कमी यश का मिळाले, याविषयीचे चिंतन बैठकीत करण्यात आले. 

मुंबई : लोकसभा निवडणुकीचे मुद्दे विधानसभा निवडणुकीत चालणार नाहीत. विरोधकांनी भाजप आणि मित्र पक्षांबद्दल जे फेक नरेटिव्ह चालविले, त्यातील फोलपणा आता लोकांना समजला आहे. त्यामुळे विधानसभेला विजय आपलाच होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या  मुंबई आणि कोकणातील आमदारांच्या बैठकीत व्यक्त केला.

फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर मंगळवारी रात्री उशिरापर्यंत ही बैठक झाली. लोकसभा निवडणुकीत कोकणात महायुतीला चांगले यश मिळाले. मुंबई तुलनेने कमी यश का मिळाले, याविषयीचे चिंतन बैठकीत करण्यात आले. 

मोदी सरकार पुन्हा सत्तेत आले, तर संविधान बदलले जाईल, तसेच आरक्षण संपुष्टात येईल, असा अपप्रचार महाविकास आघाडीतर्फे करण्यात आला. त्याचा मोठा फटका मुंबईत बसला, असे मत आमदारांनी व्यक्त केले. मुस्लीम समाजाने मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मते दिली. संविधान बदलाच्या अफवांमुळे दलित मतदारदेखील त्यांच्याभोवतीच एकवटला. मात्र, लोकसभा निवडणुकीत असलेले हे मुद्दे आता विधानसभा निवडणुकीत नसतील, असे मत आमदारांनी व्यक्त केले. फडणवीस यांनी या भूमिकेला दुजोरा दिला, पण त्याच वेळी महाविकास आघाडीकडून आणखी काही फेक  नरेटिव्ह पसरविले जातील; त्यांचा यशस्वीपणे मुकाबला करा,  असे ते म्हणाले.

१९९८च्या निवडणुकीचा दाखला  लोकसभा निवडणुकीत आपल्याला अपयश आले, याचा अर्थ विधानसभेलाही येईल, असे मानण्याचे काहीही कारण नाही. १९९८ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेला महाराष्ट्रात १४ जागा मिळाल्या होत्या. आपल्या विरोधकांना ३४ जागा मिळाल्या होत्या. मात्र, त्यानंतर एकच वर्षात झालेल्या विधानसभा निवडणुकीत आपल्या युतीला सव्वाशे पेक्षा अधिक जगा मिळाल्या होत्या. पुन्हा सत्ता स्थापन करण्याच्या जवळपास आपण पोहोचलो होतो, याकडे फडणवीस यांनी आमदारांचे लक्ष वेधले. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री मंगलप्रभात लोढा, रवींद्र चव्हाण, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार, माजी मंत्री गणेश नाईक आदी उपस्थित होते.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाMLAआमदारvidhan sabhaविधानसभा