शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

"लोकसभेचे मुद्दे विधानसभेला चालणार नाहीत"; फडणवीस यांनी मुंबई, कोकणातील आमदारांना दिला विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2024 07:54 IST

फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर मंगळवारी रात्री उशिरापर्यंत ही बैठक झाली. लोकसभा निवडणुकीत कोकणात महायुतीला चांगले यश मिळाले. मुंबई तुलनेने कमी यश का मिळाले, याविषयीचे चिंतन बैठकीत करण्यात आले. 

मुंबई : लोकसभा निवडणुकीचे मुद्दे विधानसभा निवडणुकीत चालणार नाहीत. विरोधकांनी भाजप आणि मित्र पक्षांबद्दल जे फेक नरेटिव्ह चालविले, त्यातील फोलपणा आता लोकांना समजला आहे. त्यामुळे विधानसभेला विजय आपलाच होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या  मुंबई आणि कोकणातील आमदारांच्या बैठकीत व्यक्त केला.

फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर मंगळवारी रात्री उशिरापर्यंत ही बैठक झाली. लोकसभा निवडणुकीत कोकणात महायुतीला चांगले यश मिळाले. मुंबई तुलनेने कमी यश का मिळाले, याविषयीचे चिंतन बैठकीत करण्यात आले. 

मोदी सरकार पुन्हा सत्तेत आले, तर संविधान बदलले जाईल, तसेच आरक्षण संपुष्टात येईल, असा अपप्रचार महाविकास आघाडीतर्फे करण्यात आला. त्याचा मोठा फटका मुंबईत बसला, असे मत आमदारांनी व्यक्त केले. मुस्लीम समाजाने मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मते दिली. संविधान बदलाच्या अफवांमुळे दलित मतदारदेखील त्यांच्याभोवतीच एकवटला. मात्र, लोकसभा निवडणुकीत असलेले हे मुद्दे आता विधानसभा निवडणुकीत नसतील, असे मत आमदारांनी व्यक्त केले. फडणवीस यांनी या भूमिकेला दुजोरा दिला, पण त्याच वेळी महाविकास आघाडीकडून आणखी काही फेक  नरेटिव्ह पसरविले जातील; त्यांचा यशस्वीपणे मुकाबला करा,  असे ते म्हणाले.

१९९८च्या निवडणुकीचा दाखला  लोकसभा निवडणुकीत आपल्याला अपयश आले, याचा अर्थ विधानसभेलाही येईल, असे मानण्याचे काहीही कारण नाही. १९९८ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेला महाराष्ट्रात १४ जागा मिळाल्या होत्या. आपल्या विरोधकांना ३४ जागा मिळाल्या होत्या. मात्र, त्यानंतर एकच वर्षात झालेल्या विधानसभा निवडणुकीत आपल्या युतीला सव्वाशे पेक्षा अधिक जगा मिळाल्या होत्या. पुन्हा सत्ता स्थापन करण्याच्या जवळपास आपण पोहोचलो होतो, याकडे फडणवीस यांनी आमदारांचे लक्ष वेधले. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री मंगलप्रभात लोढा, रवींद्र चव्हाण, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार, माजी मंत्री गणेश नाईक आदी उपस्थित होते.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाMLAआमदारvidhan sabhaविधानसभा