शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणं युद्धासारखंच!
2
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
3
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
4
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
5
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
6
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
7
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
8
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
9
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
10
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
11
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
12
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
13
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
14
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
15
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
16
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
17
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
18
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
19
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
20
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान

भुजबळांनी छातीवर हात ठेऊन सांगावं, खरोखरच संपूर्ण मराठा...; विनोद पाटलांचा थेट सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2024 17:40 IST

ज्यांच्या नोंदी नसेल अशा सर्वांसाठी मी शेवटच्या श्वासापर्यंत न्यायालयीन लढाई लढेल हा माझा मराठा समाजाला शब्द आहे असं आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी म्हटलं.

छत्रपती संभाजीनगर - मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात सुरु असलेले आंदोलन अखेर स्थगित झाले आहे. सरकारने कुणबी नोंद प्रमाणपत्राबाबत सगेसोयरे यांचा उल्लेख असलेली अधिसूचना जारी केली आहे. मात्र आता यावरून छगन भुजबळांसह ओबीसी नेत्यांनी टीका केली आहे. त्यावर भुजबळांनी छातीवर हात ठेऊन सांगावे, खरोखरच संपूर्ण मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळालंय का असा थेट सवाल मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी केला आहे. 

गरज भासल्यास न्यायालयीन लढाई लढू असं विधान छगन भुजबळ यांनी केले. त्यावर विनोद पाटील म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सगेसोयरे याबाबत परिपत्रक काढलंय त्याबाबत सरकारचे स्वागत करतो. माझे सहकारी मनोज जरांगे पाटील यांचेही अभिनंदन करतो. परंतु भुजबळांचे विधान पाहिले. त्यांना विचारतो, तुम्ही छातीवर हात ठेऊन सांगावे, खरोखर संपूर्ण मराठा समाजाला आरक्षण मिळालंय का?, ५४ लाख गुणिले ४ इतक्या लोकांना याचा फायदा होणार आहे का?.या निर्णयाने फार मोठा अमूलाग्र बदल होणार आहे का? तुम्हाला हकीकत माहिती आहे. मग जबाबदार मंत्री असताना तुम्ही कशाला विनाकारण तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहात. मराठा समाजाला ओबीसीत समाविष्ट करून घेण्याचा कुठलाच निर्णय झालेला नाही मग कशासाठी न्यायालयीन लढाईची भाषा करता असं त्यांनी विचारले. 

तसेच ज्यांच्या नोंदी नसेल अशा सर्वांसाठी मी शेवटच्या श्वासापर्यंत न्यायालयीन लढाई लढेल हा माझा मराठा समाजाला शब्द आहे. क्युरेटिव्ह पिटिशनचा निर्णय हा मराठा समाजाच्या बाजूने येणार असा माझा विश्वास आहे. त्यानंतर जो राहिलेला समाज आहे ज्याच्या कुणबी नोंदी सापडल्या नाही अशा सर्व समाजाला आरक्षण दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. आगमी शिवजयंती ही मराठा आरक्षणाने साजरी होईल असंही याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी सांगितले आहे. 

काय म्हणाले छगन भुजबळ?

मराठा समाजाच्या दबावाला बळी पडून सरकारने आज काही बेकायदेशीर आणि ओबीसींवर अन्याय करणारे निर्णय जाहीर केले. सरकार जरी दबावाला बळी पडले असले तरी आम्ही गप्प बसणार नाही. ओबीसी समाजावरील या अन्यायाविरोधात आम्ही जोरदार आवाज उठवणार आहोत. लवकरच ओबीसींच्या पुढील संघर्षाची दिशा ठरवली जाईल. गरज भासल्यास आम्ही न्यायालयीन लढाई लढू असं विधान मंत्री छगन भुजबळ यांनी केले. 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलChhagan Bhujbalछगन भुजबळMaratha Reservationमराठा आरक्षण