शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

भुजबळांनी छातीवर हात ठेऊन सांगावं, खरोखरच संपूर्ण मराठा...; विनोद पाटलांचा थेट सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2024 17:40 IST

ज्यांच्या नोंदी नसेल अशा सर्वांसाठी मी शेवटच्या श्वासापर्यंत न्यायालयीन लढाई लढेल हा माझा मराठा समाजाला शब्द आहे असं आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी म्हटलं.

छत्रपती संभाजीनगर - मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात सुरु असलेले आंदोलन अखेर स्थगित झाले आहे. सरकारने कुणबी नोंद प्रमाणपत्राबाबत सगेसोयरे यांचा उल्लेख असलेली अधिसूचना जारी केली आहे. मात्र आता यावरून छगन भुजबळांसह ओबीसी नेत्यांनी टीका केली आहे. त्यावर भुजबळांनी छातीवर हात ठेऊन सांगावे, खरोखरच संपूर्ण मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळालंय का असा थेट सवाल मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी केला आहे. 

गरज भासल्यास न्यायालयीन लढाई लढू असं विधान छगन भुजबळ यांनी केले. त्यावर विनोद पाटील म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सगेसोयरे याबाबत परिपत्रक काढलंय त्याबाबत सरकारचे स्वागत करतो. माझे सहकारी मनोज जरांगे पाटील यांचेही अभिनंदन करतो. परंतु भुजबळांचे विधान पाहिले. त्यांना विचारतो, तुम्ही छातीवर हात ठेऊन सांगावे, खरोखर संपूर्ण मराठा समाजाला आरक्षण मिळालंय का?, ५४ लाख गुणिले ४ इतक्या लोकांना याचा फायदा होणार आहे का?.या निर्णयाने फार मोठा अमूलाग्र बदल होणार आहे का? तुम्हाला हकीकत माहिती आहे. मग जबाबदार मंत्री असताना तुम्ही कशाला विनाकारण तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहात. मराठा समाजाला ओबीसीत समाविष्ट करून घेण्याचा कुठलाच निर्णय झालेला नाही मग कशासाठी न्यायालयीन लढाईची भाषा करता असं त्यांनी विचारले. 

तसेच ज्यांच्या नोंदी नसेल अशा सर्वांसाठी मी शेवटच्या श्वासापर्यंत न्यायालयीन लढाई लढेल हा माझा मराठा समाजाला शब्द आहे. क्युरेटिव्ह पिटिशनचा निर्णय हा मराठा समाजाच्या बाजूने येणार असा माझा विश्वास आहे. त्यानंतर जो राहिलेला समाज आहे ज्याच्या कुणबी नोंदी सापडल्या नाही अशा सर्व समाजाला आरक्षण दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. आगमी शिवजयंती ही मराठा आरक्षणाने साजरी होईल असंही याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी सांगितले आहे. 

काय म्हणाले छगन भुजबळ?

मराठा समाजाच्या दबावाला बळी पडून सरकारने आज काही बेकायदेशीर आणि ओबीसींवर अन्याय करणारे निर्णय जाहीर केले. सरकार जरी दबावाला बळी पडले असले तरी आम्ही गप्प बसणार नाही. ओबीसी समाजावरील या अन्यायाविरोधात आम्ही जोरदार आवाज उठवणार आहोत. लवकरच ओबीसींच्या पुढील संघर्षाची दिशा ठरवली जाईल. गरज भासल्यास आम्ही न्यायालयीन लढाई लढू असं विधान मंत्री छगन भुजबळ यांनी केले. 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलChhagan Bhujbalछगन भुजबळMaratha Reservationमराठा आरक्षण