शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

"शिवसेना, राष्ट्रवादी संपवण्यासाठी न्यायालयाची मदत घेतली जातेय का?", राऊतांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2024 12:39 IST

Sanjay Raut on PM Modi And CJI Chandrachud : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या घरी जाऊन गणपतीचे दर्शन घेतले. यावर विरोधकांकडून टीका होत असून, संजय राऊतांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

Sanjay Raut, PM Modi And CJI Chandrachud : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या घरी जाऊन गणपतीची आरती केली आणि दर्शन घेतले. याचा व्हिडीओही पंतप्रधानांनी पोस्ट केला. पंतप्रधान मोदी सरन्यायाधीशांच्या घरी गेल्याने विरोधकांकडून टीका केली जात आहे. शिवसेनेचे (यूबीटी) खासदार संजय राऊत यांनी भेटीबद्दल शंका उपस्थित केल्या आहेत. 

माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले, "चंद्रचूड देशाचे सरन्यायाधीश आहेत. नोव्हेंबर महिन्यात ते निवृत्त होताहेत. पंतप्रधान किती जणांच्या घरी गणेशोत्सवासाठी गेले, ही काय माहिती माझ्याकडे नाही. पण, काल सर्वत्र सरन्यायाधीशांच्या घरी पंतप्रधान आले. दोघे आरती करताहेत. त्या दोघांचा संवाद हा पाहण्यात आला. धर्मनिरपेक्ष म्हणून घेणाऱ्या राष्ट्रात एक छान चित्र आम्हाला पाहायला मिळाले." 

आम्हाला न्याय का मिळत नाही? संजय राऊतांचा सवाल

"सरन्यायाधीश आणि पंतप्रधान, खरे म्हणजे हे संविधानाला किंवा प्रोटोकॉलला धरून आहे का? त्याच्याविषयी लोकांमध्ये आणि घटनातज्ज्ञांमध्ये चर्चा सुरू आहे. आमच्या सारख्यांच्या मनात प्रश्न आला, पंतप्रधानांशी इतकी जवळीक असलेले न्यायाधीश, कुणीही असतील, ते महाराष्ट्रातील घटनाबाह्य सरकारच्या बाबतीत आम्ही जी लढाई करतोय, त्यात आम्हाला न्याय का मिळत नाही? तारखांवर तारखा का पडताहेत? अशा आमच्या लोकांच्या मनात शंका आहेत", असे प्रश्न संजय राऊतांनी उपस्थित केले. 

खासदार संजय राऊत याच मुद्द्यावर बोलताना म्हणाले, "सरन्यायाधीश चंद्रचूडांसारखी व्यक्ती त्या पदावर असताना, तीन वर्ष एक बेकायदेशीर सरकार बसवले जाते. घटनाबाह्य पद्धतीने सरकार पाडले जाते. हे सरकार घटनाबाह्य आहे, असे स्वतः सरन्यायाधीश वारंवार सांगत राहिले. तरीही निर्णय आणि निकाल होत नाही. ते निवृत्तीला आलेत. काल त्यांच्या घरी पंतप्रधान पोहोचले." 

लोकांच्या मनातील शंका घट्ट झाल्या -संजय राऊत

"याच्यामागे काही वेगळे घडतेय का? हे सरकार वाचवण्यासाठी किंवा शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस सारखे महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष पूर्णपणे संपवायचे आणि त्यासाठी न्यायालयाची मदत घेतली जातेय का? या लोकांच्या मनातील शंका काल घट्ट झाल्या, पक्क्या झाल्या", असे मोठे विधान संजय राऊत यांनी केले.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतNarendra Modiनरेंद्र मोदीSupreme Courtसर्वोच्च न्यायालयShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारण