शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
6
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
7
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
8
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
9
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
10
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
11
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
12
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
13
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
14
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
15
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
16
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
17
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
18
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
19
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
20
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
Daily Top 2Weekly Top 5

"शिवसेना, राष्ट्रवादी संपवण्यासाठी न्यायालयाची मदत घेतली जातेय का?", राऊतांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2024 12:39 IST

Sanjay Raut on PM Modi And CJI Chandrachud : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या घरी जाऊन गणपतीचे दर्शन घेतले. यावर विरोधकांकडून टीका होत असून, संजय राऊतांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

Sanjay Raut, PM Modi And CJI Chandrachud : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या घरी जाऊन गणपतीची आरती केली आणि दर्शन घेतले. याचा व्हिडीओही पंतप्रधानांनी पोस्ट केला. पंतप्रधान मोदी सरन्यायाधीशांच्या घरी गेल्याने विरोधकांकडून टीका केली जात आहे. शिवसेनेचे (यूबीटी) खासदार संजय राऊत यांनी भेटीबद्दल शंका उपस्थित केल्या आहेत. 

माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले, "चंद्रचूड देशाचे सरन्यायाधीश आहेत. नोव्हेंबर महिन्यात ते निवृत्त होताहेत. पंतप्रधान किती जणांच्या घरी गणेशोत्सवासाठी गेले, ही काय माहिती माझ्याकडे नाही. पण, काल सर्वत्र सरन्यायाधीशांच्या घरी पंतप्रधान आले. दोघे आरती करताहेत. त्या दोघांचा संवाद हा पाहण्यात आला. धर्मनिरपेक्ष म्हणून घेणाऱ्या राष्ट्रात एक छान चित्र आम्हाला पाहायला मिळाले." 

आम्हाला न्याय का मिळत नाही? संजय राऊतांचा सवाल

"सरन्यायाधीश आणि पंतप्रधान, खरे म्हणजे हे संविधानाला किंवा प्रोटोकॉलला धरून आहे का? त्याच्याविषयी लोकांमध्ये आणि घटनातज्ज्ञांमध्ये चर्चा सुरू आहे. आमच्या सारख्यांच्या मनात प्रश्न आला, पंतप्रधानांशी इतकी जवळीक असलेले न्यायाधीश, कुणीही असतील, ते महाराष्ट्रातील घटनाबाह्य सरकारच्या बाबतीत आम्ही जी लढाई करतोय, त्यात आम्हाला न्याय का मिळत नाही? तारखांवर तारखा का पडताहेत? अशा आमच्या लोकांच्या मनात शंका आहेत", असे प्रश्न संजय राऊतांनी उपस्थित केले. 

खासदार संजय राऊत याच मुद्द्यावर बोलताना म्हणाले, "सरन्यायाधीश चंद्रचूडांसारखी व्यक्ती त्या पदावर असताना, तीन वर्ष एक बेकायदेशीर सरकार बसवले जाते. घटनाबाह्य पद्धतीने सरकार पाडले जाते. हे सरकार घटनाबाह्य आहे, असे स्वतः सरन्यायाधीश वारंवार सांगत राहिले. तरीही निर्णय आणि निकाल होत नाही. ते निवृत्तीला आलेत. काल त्यांच्या घरी पंतप्रधान पोहोचले." 

लोकांच्या मनातील शंका घट्ट झाल्या -संजय राऊत

"याच्यामागे काही वेगळे घडतेय का? हे सरकार वाचवण्यासाठी किंवा शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस सारखे महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष पूर्णपणे संपवायचे आणि त्यासाठी न्यायालयाची मदत घेतली जातेय का? या लोकांच्या मनातील शंका काल घट्ट झाल्या, पक्क्या झाल्या", असे मोठे विधान संजय राऊत यांनी केले.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतNarendra Modiनरेंद्र मोदीSupreme Courtसर्वोच्च न्यायालयShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारण