शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
3
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
4
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
5
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
6
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
7
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
8
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
9
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
10
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
11
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
12
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
13
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
15
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
16
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
17
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
18
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
19
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
20
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

बोंडू काजूच्या खाली असतो की वर? शेतीतले काय कळतेवरून शेलार आणि थोरातांमध्ये 'जुंपली'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2023 15:36 IST

पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे, राज्यातील शेती प्रश्नावर बाळासाहेब थोरांनी म्हणणे मांडले. मुंडे साहेब तुम्ही शेवटपर्यंत मंत्री रहा, आमचे काही म्हणणे नाही, असे थोरात म्हणाले. 

काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात हे सभागृहात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलणार होते. परंतू, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हजर नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. मुंबईतील, कोकणातील  मंत्री शेती प्रश्न काय जाणून घेणार, अशा शब्दांत थोरात यांनी नाराजी व्यक्त केली. 

यावर भाजपा आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी तुमचे प्रश्न ऐकण्याची जबाबदारी आमच्यावर दिली आहे. मंत्री उपस्थित आहेत. तुम्ही आंब्याविषयी सांगू शकता काय? बोंडू काजूच्या खाली असतो की वर? हे सांगू शकता का, असा सवाल करत सभागृहात प्रश्न मांडण्याची विनंती केली. तसेच स्वत: कृषीमंत्री इथे आहेत, असे मुंडेंकडे हात दाखवून सांगितले. 

यावर थोरात यांनी शेलार यांना टोला लगावला. शेलार जर आज मंत्री असते तर त्यांनी असा हलगर्जीपणा केला नसता. ते खुप सिन्सिअर आहेत, म्हणून त्यांना मंत्री केले जात नाही हा आमचा आक्षेप आहे, असे थोरात म्हणाले. याचवेळी थोरातांनी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनादेखील टोला लगावला. वर्षभरात कृषीमंत्री बदलला, आता धनंजय मुंडेंकडे आहे. युतीच्या काळात पाच वर्षांत चार मंत्री पाहिलेले. कृषीखात्याकडे पाहण्याचा दृष्टीकोण युतीचा कसा आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. मुंडे साहेब तुम्ही शेवटपर्यंत मंत्री रहा, आमचे काही म्हणणे नाही, असे थोरात म्हणाले. 

टॅग्स :Balasaheb Thoratबाळासाहेब थोरातAshish Shelarआशीष शेलारvidhan sabhaविधानसभा