शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, वाघा बॉर्डरवर रांगा...
4
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
5
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
6
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
7
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
8
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
9
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
10
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
11
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
12
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
13
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
14
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
15
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
16
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
17
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
18
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
19
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
20
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?

सिंचन क्षेत्र ‘जैसे थे’च!

By admin | Updated: April 17, 2016 02:42 IST

सध्या राज्याचे पाणी व शेतीचे अधिकार जळगावकडे आहेत. राज्यकर्त्यांनी पाण्यासंबंधीच्या धोरणाला पहिल्या क्रमांकाचे प्राधान्य देणे गरजेचे आहे. परंतु मागील दीड वर्ष सिंचन प्रकल्पांसाठी

जळगाव : सध्या राज्याचे पाणी व शेतीचे अधिकार जळगावकडे आहेत. राज्यकर्त्यांनी पाण्यासंबंधीच्या धोरणाला पहिल्या क्रमांकाचे प्राधान्य देणे गरजेचे आहे. परंतु मागील दीड वर्ष सिंचन प्रकल्पांसाठी गुंतवणूक झाली नाही. राज्याचे एक टक्का सिंचन क्षेत्रही वाढले नाही. मराठवाडा, खान्देशात बिकट स्थिती आहे. ही राज्यासाठी अशोभनीय बाब असल्याची टीका माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी येथे केली. जैन हिल्सवर आयोजित राष्ट्रीय डाळिंब परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.राज्याचे कृषी व महसूलमंत्री एकनाथराव खडसे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यासह माजी मंत्री पतंगराव कदम, कविवर्य ना.धों. महानोर, राज्याचे कृषी आयुक्त विकास देशमुख, राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथ, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्यासह आमदार, खासदार उपस्थित होते. या वेळी ‘डाळिंब रत्न’ व ‘हिरालाल जैन डाळिंब नव तंत्र’ पुरस्काराने शेतकऱ्यांना गौरविण्यात आले. शरद पवार म्हणाले, पाण्याची समस्या गंभीर बनली आहे. टीव्ही सुरू केला की पाणीप्रश्नाचीच चर्चा सुरू असते. सत्ता येते व जाते. सत्ता हा मुद्दा नाही. परंतु जनतेशी बांधिलकी महत्त्वाची आहे. प्रत्येक शेतकऱ्याला पाणी मिळायला हवे. या प्रश्नासाठी आम्ही सर्व प्रकारची मदत, सहकार्य करायला तयार आहोत. पंजाब, हरियाणा, महाराष्ट्र, पश्चिम उत्तर प्रदेश, दाक्षिणात्य राज्यातील काही भागांमध्ये जास्त पाण्याची आवश्यकता असणारीकेळी व ऊस ही पिके घेणे बंद केले पाहिजे.गव्हासारखी पिके वर्षभरात दोनदा घ्यावीत, असा सल्लाही त्यांनी दिला. ज्यांना अधिक वेळ शेतीसाठी द्यायचा नाही त्यांनी ऊस लावावा. पण ज्यांना पैसे हवे आहेत त्यांनी डाळिंब लावायला हवे. पण शेती करताना सोसायट्या, ग्रा.पं. निवडणुकीच्या भानगडीत पडू नका, असेही पवार यांनी सांगितले. जैन हिल्स शेतकऱ्यांची पंढरीराज्यात चांगली शेती करणारे लोक जळगावात आहेत. भागवत पाटील, वसंतराव महाजन, डी.के. महाजन अशी अनेक नावे पवार यांनी आपल्या भाषणात घेतली. जळगाव शेतीचे केंद्र बनत आहे, त्यातच जैन हिल्स शेतकऱ्यांची पंढरी आहे. स्व. भंवरलाल जैन यांनी शेतीसंबंधी केलेल्या कार्याचा देशाला लाभ होत असल्याचेही पवार म्हणाले.