शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

जलयुक्त शिवार योजनेत गैरव्यवहार झाला ; जलसंधारण मंत्र्यांची कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2019 15:44 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वाकांक्षी योजनांपैकी एक असलेल्या जलयुक्त शिवार योजनेतून झालेल्या कामात गैरव्यवहार झाले असल्याचे सिद्ध झाले आहे.

मुंबई : जलयुक्त शिवार योजनेत गैरव्यवहार झाल्याचे अनेकदां विरोधी पक्षाच्यावतीने आरोप करण्यात आले आहे. मात्र पहिल्यांदाच सरकारने या योजनेत गैरव्यवहार झाले असल्याचे मान्य केलं आहे. जलयुक्त शिवार योजनेत भ्रष्टाचार झाला असल्याची कबुली खुद्द जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी दिली आहे. विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी जलसंधारणासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सावंत यांनी ही माहिती दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वाकांक्षी योजनांपैकी एक असलेल्या जलयुक्त शिवार योजनेतून झालेल्या कामात गैरव्यवहार झाले असल्याचे सिद्ध झाले आहे. पुण्यातल्या पुरंदर तालुक्यातील जलयुक्त शिवाराच्या कामात गैरव्यवहार झाल्याचे जलसंधारण विभागाने मान्य केलं आहे. तसेच या प्रकरणाची लाचलुचपत प्रतिबंध विभागाने गुप्त चौकशी सुद्धा केली असल्याची माहिती, तानाजी सावंत यांनी प्रश्नोत्तराच्या तासात धनंजय मुंडे यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिली.

राज्यात सूर असलेल्या जलयुक्ताच्या कामांबद्दल जिथे जिथे भ्रष्टाचार होत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत, अशा १३०० जलयुक्त शिवाराच्या कामांची विभागीय चौकशी सुरु केली असल्याचा खुलासा सावंत यांनी केला. तसेच याबाबतचा तांत्रिक अहवाल आल्यावर या प्रकरणात एसीबी चौकशी करायची की नाही याचा सिद्ध निर्णय घेऊ, असे सावंत म्हणाले.

राज्यात जलयुक्त शिवाराच्या कामात गैरव्यवहार झाला असून या प्रकरणातील तत्कालीन कृषी आयुक्तांना वाचवण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात असल्याचा आरोप धनंजय मुंडेंनी केला होता. गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी दिरंगाई का केली जात आहे असा प्रश्न सुद्धा त्यांनी उपस्थित केला होता. पुढे बोलताना मुंडे यांनी, गैरव्यवहारात सहभागी कर्मचाऱ्यांविरोधात एसीबी मार्फत चौकशी करण्याची मागणी सभागृहात केली होती. यालाच उत्तर देताना सावंत यांनी वरील खुलासा केलं आहे.