शहरं
Join us  
Trending Stories
1
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
5
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
6
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
7
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
8
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
9
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
10
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
11
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
12
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
13
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
14
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
15
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
16
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
17
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
18
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
19
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
20
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?

जलयुक्त शिवार योजनेत गैरव्यवहार झाला ; जलसंधारण मंत्र्यांची कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2019 15:44 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वाकांक्षी योजनांपैकी एक असलेल्या जलयुक्त शिवार योजनेतून झालेल्या कामात गैरव्यवहार झाले असल्याचे सिद्ध झाले आहे.

मुंबई : जलयुक्त शिवार योजनेत गैरव्यवहार झाल्याचे अनेकदां विरोधी पक्षाच्यावतीने आरोप करण्यात आले आहे. मात्र पहिल्यांदाच सरकारने या योजनेत गैरव्यवहार झाले असल्याचे मान्य केलं आहे. जलयुक्त शिवार योजनेत भ्रष्टाचार झाला असल्याची कबुली खुद्द जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी दिली आहे. विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी जलसंधारणासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सावंत यांनी ही माहिती दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वाकांक्षी योजनांपैकी एक असलेल्या जलयुक्त शिवार योजनेतून झालेल्या कामात गैरव्यवहार झाले असल्याचे सिद्ध झाले आहे. पुण्यातल्या पुरंदर तालुक्यातील जलयुक्त शिवाराच्या कामात गैरव्यवहार झाल्याचे जलसंधारण विभागाने मान्य केलं आहे. तसेच या प्रकरणाची लाचलुचपत प्रतिबंध विभागाने गुप्त चौकशी सुद्धा केली असल्याची माहिती, तानाजी सावंत यांनी प्रश्नोत्तराच्या तासात धनंजय मुंडे यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिली.

राज्यात सूर असलेल्या जलयुक्ताच्या कामांबद्दल जिथे जिथे भ्रष्टाचार होत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत, अशा १३०० जलयुक्त शिवाराच्या कामांची विभागीय चौकशी सुरु केली असल्याचा खुलासा सावंत यांनी केला. तसेच याबाबतचा तांत्रिक अहवाल आल्यावर या प्रकरणात एसीबी चौकशी करायची की नाही याचा सिद्ध निर्णय घेऊ, असे सावंत म्हणाले.

राज्यात जलयुक्त शिवाराच्या कामात गैरव्यवहार झाला असून या प्रकरणातील तत्कालीन कृषी आयुक्तांना वाचवण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात असल्याचा आरोप धनंजय मुंडेंनी केला होता. गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी दिरंगाई का केली जात आहे असा प्रश्न सुद्धा त्यांनी उपस्थित केला होता. पुढे बोलताना मुंडे यांनी, गैरव्यवहारात सहभागी कर्मचाऱ्यांविरोधात एसीबी मार्फत चौकशी करण्याची मागणी सभागृहात केली होती. यालाच उत्तर देताना सावंत यांनी वरील खुलासा केलं आहे.