शहरं
Join us  
Trending Stories
1
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
2
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
3
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
5
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
6
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
7
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
8
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
9
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
10
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
11
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
12
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
13
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
14
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
15
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
16
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
17
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
18
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
19
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
20
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती

IPL : मुंबईतील शेवटचा सामना हाऊस फूल

By admin | Published: April 28, 2016 5:38 PM

महाराष्ट्रातील मुंबई, पुणे आणि नागपूरातील सामने महाराष्ट्राबाहेर हालवण्यात आले आहेत. आज मुंबई इंडियन्स संघाचा वानखेडे मैदानरील शेवटचा सामना आहे.

ऑनलइन लोकमत
मुंबई, दि. २८ : वानखेडे स्टेडियमवरील आयपीएलच्या शेवटच्या सामन्यासाठी तुम्ही एका तिकिटाला हजारो रुपये मोजण्याची तयारी ठेवलीत, तरीही तुमची निराशा होईल. कारण एकच, शेवटचा सामना बघण्यासाठी प्रेक्षकांनी केलेली तुंडुंब गर्दी. मुंबई इंडियन्स सध्या वाईट कामगिरी करत असली तरी, आज वानखेडेवर हा संघ घरच्या मैदानावर चांगली कामगिरी करेल आणि विजयी होऊन होम ग्राउंडला निरोप देईल अशी आशा मुंबईकरांना आहे, त्यामुळे एक ते दीड हजार रुपयांचे तिकिट पाच हजार रुपये मोजूनही मिळत नसल्याचे चित्र आहे.
तीव्र पाणीटंचाई आणि भीषण दुष्काळ असलेल्या महाराष्ट्रात, कडक निर्बंध घालून, इंड़ियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) क्रिकेट सामने खेळविण्यापेक्षा, हे अन्य राज्यांत खेळवण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला. परिणामी मे पासूनचे मुंबईतले सामने महाराष्ट्राबाहेर हलविण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशावर शिक्कामोर्तब झाले. त्यामुळे महाराष्ट्रातील मुंबई, पुणे आणि नागपूरातील सामने महाराष्ट्राबाहेर हलवण्यात आले आहेत. आज मुंबई इंडियन्स संघाचा वानखेडे मैदानावरील शेवटचा सामना आहे. आपल्या आवडत्या खेळाडूंना पाहण्यासाठी चाहत्यांनी तुडंब गर्दी केली आहे. वानखेडे परिसरात कडेकोट पोलिस व्यवस्था करण्यात आली आहे.
आयपीलएच्या यंदाच्या सत्रात धडाकेबाज कामगिरीसह विजयी लाटेवर स्वार झालेल्या कोलकाता नाईट रायडर्सला चढउताराचा सामना करीत असलेल्या मुंबई इंडियन्सविरुद्ध आज गुरुवारी वानखेडेवर विजयाची आस लागली आहे. गुणांचा विचार केला, तर कोलकाता अव्वल व मुंबई पाचव्या स्थानावर आहे.
दोन्ही संघांनी प्रत्येकी दोनदा आयपीएलचे जेतेपद पटकविले आहे. त्यामुळे उभय संघ तुल्यबळ वाटतात. पण पाचपैकी चार सामने जिंकणाऱ्या कोलकाताचे पारडे सध्यातरी जड वाटते. मुंबईच्या कामगिरीत सातत्य नाही. त्यांना सातपैकी तीनच विजय शक्य झाले तर चार सामन्यांत पराभवाला तोंड द्यावे लागले.