शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

मान्यवरांना निमंत्रित करण्याचे काम आयोजकांचे, राज्य शासनाचा संबंध नाही - विनोद तावडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2019 16:25 IST

यवतमाळला होणाऱ्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासंदर्भात सध्या सुरु असलेल्या वादामध्ये काहीजण अनावश्यकपणे शासनाला खेचण्याचा प्रयत्न करीत आहेत.

मुंबई - यवतमाळला होणाऱ्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासंदर्भात सध्या सुरु असलेल्या वादामध्ये काहीजण अनावश्यकपणे शासनाला खेचण्याचा प्रयत्न करीत आहे. पण यामध्ये राज्य शासनाचा काहीही संबंध नाही, असे मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांनी आज प्रसिध्दी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना स्पष्ट केले.

यवतमाळ येथे आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये कोणाला उद्घाटक म्हणून निमंत्रण द्यायचे, संमेलनात कोणती सत्र असावीत, कोणाची भाषणे व्हावीत, संमेलनामध्ये कोणती कवी संमेलन व्हावीत आदी सर्व विषय हा साहित्य महामंडळ आणि त्यांच्या समित्या ठरवित असतात. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला अनुदान देणे वगळता यामध्ये शासनाचीही कोणतीही भूमिका नसते आणि संमेलनाच्या कुठल्याही निर्णयामध्ये राज्य शासन हस्तक्षेप करत नाही. संमेलनाचे संपूर्ण वेळापत्रक हे आयोजकामार्फत ठरविण्यात येते. त्यामुळे विनाकारण संमेलनाच्या सध्याच्या वादात राज्य सरकारला खेचण्याचा प्रयत्न करु नये, असे मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केले.  

यवतमाळ येथे आयोजित करण्यात आलेल्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला उदघाटक म्हणून निमंत्रण देण्याचा आणि नंतर ते परत घेण्यावरुन वाद सध्या सुरु आहेत. यासंदर्भात कालपासून विविध माध्यमांमध्ये उलटसुलट चर्चा होत आहे. यासंदर्भात राज्य शासनाची भूमिका श्री. तावडे यांनी स्पष्ट केली.

टॅग्स :Vinod Tawdeविनोद तावडेMarathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलन