शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये संशयित ४०० बँक खाती तपासली; जम्मू आणि काश्मीरमधील डॉक्टरांचे  लागेबांधे
2
गौरी पालवे मृत्यू प्रकरण: पंकजा मुंडेचे PA अनंत गर्जे यांना अटक, आज कोर्टात हजर करणार !
3
Sangli Accident: नशेत राँग साईडने निघाला, ६ गाड्या उडवल्या, अनेक जखमी; संतप्त लोकांनी स्कोडा कार फोडली
4
"मुंबई महापालिकेची ही शेवटची निवडणूक असेल, त्यानंतर..."; राज ठाकरेंचा 'मराठी माणसा'ला सावध राहण्याचा इशारा
5
"उदयपूरमध्येच आमची लव्हस्टोरी...", रणवीर सिंहने दीपिकासोबतच्या आठवणींना दिला उजाळा
6
म्युच्युअल फंडावर टॅक्स कसा लागतो? इक्विटी आणि डेट फंडसाठीचे नियम काय, टॅक्स वाचवण्याचे मार्ग जाणून घ्या
7
कोण होणार नवीन पोलिस महासंचालक?; सदानंद दाते यांच्या नावाची चर्चा, केंद्राकडे नावे पाठवली
8
आजचे राशीभविष्य, २४ नोव्हेंबर २०२५: मन आनंदी राहील, आर्थिक लाभ होतील, नोकरीत लाभ होतील !
9
'बिग बॉस मराठी ६' लवकरच? कलर्स मराठीने शेअर केला 'धमाकेदार' प्रोमो, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
10
अनंतच्या अनैतिक संबंधाची खात्री झाल्याने ‘ती’  खचली; एकदा अचानक आई वडील घरी पोहचले, तेव्हा...
11
१५ दिवसांपूर्वी साखरपुडा झाला होता, २ डिसेंबरला लग्न पण त्याआधीच मयुरेशवर काळाने घाला घातला
12
वयाच्या ४१ व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्रीने केलं लग्न, वृंदावन मंदिरात अभिनेत्यासोबत अडकली विवाहबंधनात
13
"टर्मिनेटरसारखी फिरतेय..." श्रद्धा कपूरच्या पायाला दुखापत, स्वत: व्हिडीओ शेअर करत दिली माहिती
14
‘टीईटी’चा पेपर ३ लाखांत, शिक्षकांची टोळीच जेरबंद; कोल्हापुरात शिक्षकी पेशाला काळीमा
15
बिना ड्रायव्हरच्या कारपेक्षा त्याची टेक्नॉलॉजी भारतासाठी महत्त्वाची; इस्रायली उद्योगपतींशी चर्चा
16
पाक खोटे बोलतोय...फ्रान्सने केला पर्दाफाश; जगाकडूनही खावी लागली चपराक, काय केला खोटा दावा?
17
कमळावर जाे उभा त्याला मतदान करा; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे स्वबळाचे संकेत?
18
मुंबईत तब्बल ११ लाख दुबार नावे आढळली; मतदार याद्यांमध्ये प्रचंड घाेळ, BMC कडे तक्रारींचा पाऊस
19
गुरुवारी दत्त जयंती २०२५: ११ दिवस सेवा करा, नक्की फल मिळेल; काळजी सोडा, स्वामी शुभच करतील!
20
संतापजनक! सोयाबीनची भाजी केली म्हणून पतीने पत्नीचे डोके फोडले; सिद्धार्थनगरमध्ये हादरवणारी घटना
Daily Top 2Weekly Top 5

मान्यवरांना निमंत्रित करण्याचे काम आयोजकांचे, राज्य शासनाचा संबंध नाही - विनोद तावडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2019 16:25 IST

यवतमाळला होणाऱ्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासंदर्भात सध्या सुरु असलेल्या वादामध्ये काहीजण अनावश्यकपणे शासनाला खेचण्याचा प्रयत्न करीत आहेत.

मुंबई - यवतमाळला होणाऱ्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासंदर्भात सध्या सुरु असलेल्या वादामध्ये काहीजण अनावश्यकपणे शासनाला खेचण्याचा प्रयत्न करीत आहे. पण यामध्ये राज्य शासनाचा काहीही संबंध नाही, असे मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांनी आज प्रसिध्दी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना स्पष्ट केले.

यवतमाळ येथे आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये कोणाला उद्घाटक म्हणून निमंत्रण द्यायचे, संमेलनात कोणती सत्र असावीत, कोणाची भाषणे व्हावीत, संमेलनामध्ये कोणती कवी संमेलन व्हावीत आदी सर्व विषय हा साहित्य महामंडळ आणि त्यांच्या समित्या ठरवित असतात. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला अनुदान देणे वगळता यामध्ये शासनाचीही कोणतीही भूमिका नसते आणि संमेलनाच्या कुठल्याही निर्णयामध्ये राज्य शासन हस्तक्षेप करत नाही. संमेलनाचे संपूर्ण वेळापत्रक हे आयोजकामार्फत ठरविण्यात येते. त्यामुळे विनाकारण संमेलनाच्या सध्याच्या वादात राज्य सरकारला खेचण्याचा प्रयत्न करु नये, असे मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केले.  

यवतमाळ येथे आयोजित करण्यात आलेल्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला उदघाटक म्हणून निमंत्रण देण्याचा आणि नंतर ते परत घेण्यावरुन वाद सध्या सुरु आहेत. यासंदर्भात कालपासून विविध माध्यमांमध्ये उलटसुलट चर्चा होत आहे. यासंदर्भात राज्य शासनाची भूमिका श्री. तावडे यांनी स्पष्ट केली.

टॅग्स :Vinod Tawdeविनोद तावडेMarathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलन