शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हमाले उमर अब्दुल्ला?
3
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
4
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
5
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
6
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
7
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
8
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
9
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
10
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
11
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
12
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
13
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
14
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
15
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
16
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
17
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
18
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
19
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
20
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
Daily Top 2Weekly Top 5

मिठी नदी आणि नालेसफाईच्या 650 कोटी रुपयांच्या कामाची एसआयटी चौकशी करा: राधाकृष्ण विखे पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2017 16:41 IST

मुंबई येथील अल हुसैनी इमारत दुर्घटना आणि पावसामुळे पाणी साचून घडलेल्या घटनांना मुंबई मनपा आणि तेथील सत्ताधारी असलेली शिवसेनाच जबाबदार असल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज नाशिकमध्ये केला.

ठळक मुद्देमिठी नदीच्या आणि नालेसफाईच्या कामावर झालेल्या 650 कोटी रुपयांच्या कामाची एसआयटीमार्फत चौकशी करामुंबई महापालिकेचे पहारेकरी म्हणवून घेणारी भाजपा आता निद्रिस्त

नाशिक, दि. 1 -  मुंबई येथील अल हुसैनी इमारत दुर्घटना आणि पावसामुळे पाणी साचून घडलेल्या घटनांना मुंबई मनपा आणि तेथील सत्ताधारी असलेली शिवसेनाच जबाबदार असल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज नाशिकमध्ये केला. मिठी नदीच्या आणि नालेसफाईच्या कामावर झालेल्या 650 कोटी रुपयांच्या कामाची एसआयटीमार्फत चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. 

नाशिकच्या शासकीय विश्रामगृहावर आज दुपारी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी शिवसेना-भाजपावर टीका केली. मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार झालेला असतानाही नालेसफाईच्या कामांचा अहवाल विधी मंडळात सरकारने जाणीवपूर्वक मांडला नाही असे सांगतानाच मुंबई महापालिकेचे पहारेकरी म्हणवून घेणारी भाजपा आता निद्रिस्त असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, न्यायव्यवस्थेवर अविश्वास दाखविण्यापर्यंत सरकारची मजल गेली असून आता माफी मागण्याची नामुष्की आल्याने मुख्यमंत्री आणि महाधिवकता यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही विखे पाटील यांनी केली. 

मुंबईत झालेल्या मुसळधार पावसात घडलं माणुसकीचे दर्शन-मुसळधार पावसानं मंगळवारी ( 29 ऑगस्ट ) मुंबईला अक्षरशः झोडपून काढले. मात्र भर पावसातही माणुसकीला पूर आला होता.  मुंबईकरांनी एकमेकांना सहकार्याचा हात पुढे करत मुंबई स्पिरीटचं दर्शन घडवलं. कुर्ला पश्चिम येथील एलबीएस मार्गावरही माणुसकीचे उत्तम उदाहरण पाहायला मिळालं. ऑडी कारचे वायपर नीट सुरू नव्हते, त्यामुळे मुसळधार पावसात कार चालकाला गाडी चालवणे कठीण झाले. यावेळी एक व्यक्ती त्या कारचालकाच्या मदतीला धावून आला व  स्वतः गाडीवर बसून तो गाडीची काच हातानं पुसू लागला शिवाय कारचालकाला गाडी कशी वळवावी, याचे मार्गदर्शनही केली.दरम्यान, अतिवृष्टीने मुंबई आणि परिसरातील जनजीवन ठप्प झाले असताना अनेक ठिकाणी  ‘मुंबई स्पिरीट’चे दर्शन घडविले. अनेक संस्था, संघटना, गणेशोत्सव मंडळांच्या जोडीला सामान्य मुंबईकरांनीही आपापल्या क्षमतेनुसार मदतकार्यात सहभाग घेतला. अनेक मुंबईकरांनी फेसबुक, व्हॉटस्अ‍ॅप आदी सोशल मीडियावर स्वत:चा मोबाइल नंबर, घरचा पत्ता देत अडकलेल्या प्रवाशांसाठी स्वत:च्या घराचे दरवाजे उघडे केले.अतिवृष्टीमुळे सायंकाळपर्यंत लोकल आणि बेस्ट बसेसची वाहतूक ठप्प झाली होती. शिवाय ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे ओला, उबेर आणि टॅक्सीही निरुपयोगी ठरत होत्या. पावसात अडकून पडलेल्या या मंडळीना मदतीचा हात देण्यासाठी अनेकांनी पुढाकार घेतला. सोशल मीडियावर स्वत:चा पत्ता आणि फोन नंबर टाकून विनसंकोच घरी येण्याचे निमंत्रण दिले. दादर येथील पोर्तुगीज चर्चजवळ राहणारे संतोष पावसकर यांनी फेसबुक तसेच व्हॉटस्अपवर मसेज टाकून आसपास अडकलेल्या लोकांना आपल्या घरी येण्याचे निमंत्रण दिले. दादर, लोअर परळ, प्रभादेवी, एलफिन्स्टन परिसरातील अनेक कार्यालयांनी अर्ध्या दिवसाची सुट्टी दिली. मात्र, ऑफीसबाहेर पडलेली मंडळी पावसातच अडकली.गुरूद्वारासह जैन संघ व मशिदींचा आधारगणेशोत्सव मंडळांसह येथील गुरूद्वारा, मशिद आणि जैन संघांनी महापुरात अडकलेल्या मुंबईकरांसाठी जेवणासह राहण्याची व्यवस्था केली. दादर गुरुद्वारामध्ये लंगरची व्यवस्था केली होती. फोर्ट भागात अडकलेल्या व्यक्तींसाठी सीएसएमटीजवळील बोरा बाजार मार्गावर श्री फोर्ट जैन संघामध्ये लोकांच्या जेवणाची व्यवस्था होती.उत्सव मंडपे रिकामी, भाविकांचा पूर ओसरलासतत कोसळणा-या पावसाचा फटका भाविकांनाही बसला. सकाळी उत्साहात भाविक गणपती दर्शनासाठी घरातून बाहेर पडले होते. पण, दुपारपर्यंत पावसाचा वाढता जोर पाहून भाविकांनी घरी परतण्यास पसंती दिली. लालबाग, परळ, दादर भागात पाणी साचायला लागल्याने येथील प्रसिद्ध मंडळांमध्येही भाविकांची गर्दी दुपारनंतर कमी झाल्याचे दिसून आले. परळ येथील तेजुकाया सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्टच्या गणेशमूर्तीसमोरील सजावटीचा काही भाग दुपारी साडेबाराच्या सुमारास कोसळला. यात हानी झाली नाही. अग्निशमन दलाच्या मदतीने सजावटीचा कोसळलेला भाग बाजूला करण्यात आल्याची माहिती मंडळाकडून देण्यात आली. मंगळवारी पाच दिवसांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन होते. रस्त्यांवर पाणी साचल्याने विसर्जनासाठी कसे जायचे? असा प्रश्न अनेक भाविकांना भेडसावत होता. मुसळधार पावसामुळे गणपती विसर्जनासाठी अनेक विघ्न आली. तरीही जमेल तसा भाविकांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. गणपती विसर्जनासाठी येणाºया भाविकांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून मुंबईतील चौपाट्यांवर पोलीस तैनात करण्यात आले होते.पोलीस आणि सुरक्षा रक्षकांनी विसर्जनसाठी चौपाट्यांवर तसेच कृत्रिम तलावाकडे आलेल्या भाविकांना मदत केली. दुपारी साडेचारच्या सुमारास भरती असल्यामुळे त्यावेळी भाविक विसर्जनासाठी बाहेर पडले नाहीत. त्यानंतर सायंकाळी गणपती विसर्जनासाठी गर्दी होत होती.  

टॅग्स :Mumbai Floodedमुंबईत पावसाचा हाहाकारMumbai Municipal Corporationमुंबई महानगरपालिका