शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
4
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
5
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
6
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
7
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
8
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
9
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
10
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
11
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
12
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
13
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
14
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
15
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
16
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
17
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
18
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
19
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
20
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

महाराष्ट्रातील भाजपच्या यशाचा अन्वयार्थ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2019 05:14 IST

केंद्राच्या कामगिरीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचीही जोरकस साथ मिळाली.

- माधव भंडारीकेंद्राच्या कामगिरीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचीही जोरकस साथ मिळाली. शेती व ग्रामीण भागातील गंभीर समस्या हाताळण्यात देवेंद्रजींनी कौशल्य व समंजसपणाचे दर्शन घडवले त्यास मतदारांनी पसंती दिली. भाजप २०१४ च्या यशाची पुनरावृत्ती अजिबात करू शकणार नाही, असेही बहुतेकांना वाटत होते. हे सर्व अंदाज मतदारांनी साफ खोटे पाडले आणि युतीच्या पदरात यशाचे माप भरभरून टाकले.या निवडणुकीतील भाजपचे यश निर्विवाद आहे. पक्षाने लढवलेल्या २५ पैकी २३ जागा जिंकल्या. त्या २३ मधील चार जागांवर (जळगाव, पुणे, उत्तर मुंबई व रावेर) भाजपला मिळालेल्या मतांचे प्रमाण ६१ टक्क्यांच्या वर आहे. बारा जागांवर भाजपने ५२ टक्क्यांपेक्षा जास्त मते घेतली आहेत. केवळ सात जागांवर भाजपला ५० टक्क्यांपेक्षा कमी मते पडली आहेत. बारामती व चंद्रपूर या दोन्ही पराभूत झालेल्या जागांवरही भाजपला ४० टक्क्यांपेक्षा अधिक मते आहेत. लढवलेल्या २५ जागांवर मिळून भाजपला मिळालेल्या मतांची टक्केवारी ५२ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. राज्यात युतीच्या मतांचे प्रमाणही ५० टक्क्यांवर पोहोचले आहे. १९५२ नंतर असे निर्विवाद यश आम्हाला पहिल्यांदाच मिळाले. १९७२ च्या निवडणुकीत काँग्रेसने ७० टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळवली होती. पण त्यानंतर झालेल्या सर्व निवडणुकांमध्ये विखुरलेला कौल असेच चित्र राज्यात बघायला मिळाले होते. त्या पार्श्वभूमीवर या यावेळचा कौल समजून घेतला पाहिजे.सर्व घटकांनी - शहरी, ग्रामीण, जाती, धर्म, पंथ, भाषा वगैरे - भाजपवर पसंतीचा शिक्का मारला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व हा अर्थातच या यशामागचा सर्वात मोठा घटक ! त्यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने केलेली कामगिरी जनतेला विश्वासार्ह वाटली; त्यांचे नेतृत्व आश्वासक वाटले. भारत जागतिक महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करतो आहे असे चित्र या पाच वर्षांत निर्माण झाले. त्यांचे सरकार दहशतवाद व भ्रष्टाचार सहन करत नाही हे स्पष्ट झाले. मोदी सरकारने १३४ लोककल्याणकारी योजना हाती घेतल्या व त्यांचा लाभ कोणताही भेदभाव न करता वंचित, गरीब आणि निम्न मध्यमवर्गातील गरजूंंपर्यंत पोहोचवल्या.केंद्राच्या या कामगिरीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारचीही तेवढीच जोरकस साथ मिळाली. शेती व ग्रामीण भागातील गंभीर समस्या हाताळण्यात मुख्यमंत्री या नात्याने देवेंद्रजींनी जे कौशल्य व समंजसपणाचे दर्शन घडवले त्यास मतदारांनी पसंती दिली. जलयुक्त शिवार, शेतकरी यांची कर्जमाफी, पीकविमा, सर्व घरांना वीजपुरवठा, ग्रामसडक योजना, प्रधानमंत्री आवास अशा वेगवेगळ्या योजना फडणवीस सरकारने यशस्वीपणे राबवल्या. त्याचा सकारात्मक परिणाम मतदानात दिसला.केंद्र, राज्य सरकारच्या कामगिरीला पक्षसंघटनेची सार्थ साथ मिळाली. राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी साडेचार वर्षे अत्यंत बारकाईने नियोजन करून उभारणी केली, सर्व कार्यकर्त्यांना लोकांपर्यंत पोहोचून काम करायला उद्युक्त केले. त्या प्रेरणेतून राज्यभरात अक्षरश: लाखो कार्यकर्त्यांनी जीवाचे रान केले. त्यातून सरकारचे काम जनतेपर्यंत पोहोचत राहिले. शहा यांना प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची तोलामोलाची साथ मिळाली. सरकार व संघटना यांच्या या संयुक्त कामगिरीला योग्य पद्धतीने केलेली युती व जोडलेले मित्रपक्ष यांची चांगली जोड मिळाली. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून भाजपला मिळालेले यश महत्त्वाचे आहे.(मुख्य प्रवक्ते, महाराष्ट्र प्रदेश भाजप)

टॅग्स :BJPभाजपा