शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मुख्यमंत्रीपदावरून भाजप-शिवसेनेत पडद्याआड खदखद

By अतुल कुलकर्णी | Updated: June 11, 2019 20:17 IST

महाराष्ट्रात अजूनही आम्हीच मोठे भाऊ आहोत हे भाजपने विसरु नये, अशा शब्दात शिवसेनेच्या जेष्ठ नेत्याने आपली खदखद बोलून दाखवली आहे.

 - अतुल कुलकर्णी मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजप सेना युती करताना राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर उपमुख्यमंत्रीपद निर्माण करायचे आणि ज्याचे सदस्य जास्त त्याने पहिली अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद घ्यायचे, नंतरची अडीचवर्षे दुस-या पक्षाकडे हे पद जाईल, असे ठरलेले असताना भाजपचे मंत्री विनाकारण वेगवेगळे मुद्दे पुढे करत आहेत, मात्र महाराष्ट्रात  अजूनही आम्हीच मोठे भाऊ आहोत हे भाजपने विसरु नये, अशा शब्दात शिवसेनेच्या जेष्ठ नेत्याने आपली खदखद बोलून दाखवली आहे.भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी मुख्यमंत्री भाजपचाच असेल, असे जाहीर केल्यानंतर वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही तीच री नाशिकला ओढली. त्याआधी बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी १३५/१३५ जागा दोघांनी लढवायच्या व बाकीच्या जागा मित्रपक्षांना द्यायच्या असा फॉर्म्युला जाहीर केला. त्यावर युवा सेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई यांनी ट्विट   करत यात भर घातली आहे. ते म्हणतात, ‘‘शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या बैठकीत अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला ठरला आहे. या बैठकीत हजर नसणा-यांनी व्यक्तिगत स्वार्थासाठी युतीतील वातावरण बिघडवू नये.’’ याचे शिवसेनेकडून कोणीही खंडन केलेले नाही. सरदेसाई हे रश्मी ठाकरे यांच्या बहिणीचे चिरंजीव आहेत व युवा नेते आदित्य ठाकरेच्या अत्यंत जवळचे आहेत. त्यामुळे शिवसेनेने असे टष्ट्वीट करुन त्याची काय प्रतिक्रिया येते हे पाहण्याचा प्रयत्न केल्याचे समजते. या सगळ्यात दोन्ही पक्षात पडद्याआड खदखद असल्याचे समोर आले आहे.दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपला स्पष्ट बहूमत मिळेल याचे नियोजन केल्याचे त्यांचे नजीकचे सांगतात. भाजपला विजय मिळू शकणा-या पण शिवसेनेकडे असलेल्या जागांवर अपक्ष म्हणून किंवा मित्र पक्षाच्या नावाखाली अन्य उमेदवारांना निवडून आणायचे व नंतर त्यांना भाजपमध्ये घ्यायचे, असे नियोजन करणे सुरु झाले आहे. काहीही करुन भाजपने १४५ च्या पुढे एकट्याच्या बळावर जायचे जेणे करून शिवसेना सोबत असल्या नसल्याचा फरकच पडणार नाही, अशी रणनीती आखण्यात आली आहे. या सगळ्या प्रकारात शिवसेनेची अवस्था ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’ अशी झाली आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रShiv SenaशिवसेनाBJPभाजपा