शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

मुख्यमंत्रीपदावरून भाजप-शिवसेनेत पडद्याआड खदखद

By अतुल कुलकर्णी | Updated: June 11, 2019 20:17 IST

महाराष्ट्रात अजूनही आम्हीच मोठे भाऊ आहोत हे भाजपने विसरु नये, अशा शब्दात शिवसेनेच्या जेष्ठ नेत्याने आपली खदखद बोलून दाखवली आहे.

 - अतुल कुलकर्णी मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजप सेना युती करताना राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर उपमुख्यमंत्रीपद निर्माण करायचे आणि ज्याचे सदस्य जास्त त्याने पहिली अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद घ्यायचे, नंतरची अडीचवर्षे दुस-या पक्षाकडे हे पद जाईल, असे ठरलेले असताना भाजपचे मंत्री विनाकारण वेगवेगळे मुद्दे पुढे करत आहेत, मात्र महाराष्ट्रात  अजूनही आम्हीच मोठे भाऊ आहोत हे भाजपने विसरु नये, अशा शब्दात शिवसेनेच्या जेष्ठ नेत्याने आपली खदखद बोलून दाखवली आहे.भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी मुख्यमंत्री भाजपचाच असेल, असे जाहीर केल्यानंतर वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही तीच री नाशिकला ओढली. त्याआधी बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी १३५/१३५ जागा दोघांनी लढवायच्या व बाकीच्या जागा मित्रपक्षांना द्यायच्या असा फॉर्म्युला जाहीर केला. त्यावर युवा सेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई यांनी ट्विट   करत यात भर घातली आहे. ते म्हणतात, ‘‘शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या बैठकीत अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला ठरला आहे. या बैठकीत हजर नसणा-यांनी व्यक्तिगत स्वार्थासाठी युतीतील वातावरण बिघडवू नये.’’ याचे शिवसेनेकडून कोणीही खंडन केलेले नाही. सरदेसाई हे रश्मी ठाकरे यांच्या बहिणीचे चिरंजीव आहेत व युवा नेते आदित्य ठाकरेच्या अत्यंत जवळचे आहेत. त्यामुळे शिवसेनेने असे टष्ट्वीट करुन त्याची काय प्रतिक्रिया येते हे पाहण्याचा प्रयत्न केल्याचे समजते. या सगळ्यात दोन्ही पक्षात पडद्याआड खदखद असल्याचे समोर आले आहे.दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपला स्पष्ट बहूमत मिळेल याचे नियोजन केल्याचे त्यांचे नजीकचे सांगतात. भाजपला विजय मिळू शकणा-या पण शिवसेनेकडे असलेल्या जागांवर अपक्ष म्हणून किंवा मित्र पक्षाच्या नावाखाली अन्य उमेदवारांना निवडून आणायचे व नंतर त्यांना भाजपमध्ये घ्यायचे, असे नियोजन करणे सुरु झाले आहे. काहीही करुन भाजपने १४५ च्या पुढे एकट्याच्या बळावर जायचे जेणे करून शिवसेना सोबत असल्या नसल्याचा फरकच पडणार नाही, अशी रणनीती आखण्यात आली आहे. या सगळ्या प्रकारात शिवसेनेची अवस्था ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’ अशी झाली आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रShiv SenaशिवसेनाBJPभाजपा