शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

सीईटी परीक्षेत चुकीचे पर्सेंटाईल मिळालेल्या विद्यार्थ्यांची शिक्षण विभाग घेणार दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 12:07 IST

एमएचटी- सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर करताना विद्यार्थ्यांवर अन्याय झाला असल्याचे मत अभ्यासकांनी व्यक्त केले आहे..

ठळक मुद्देपरीक्षेचा निकाल जाहीर करताना काही विद्यार्थ्यांना चुकीचे पर्सेंटाईलपरीक्षा कक्षाकडे याबाबत तक्रार करूनही त्यांची दखल नाही राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने एमएचटी-सीईटी परीक्षा घेऊन निकाल जाहीर इंजिनिअरिंग,फार्मसी अभ्यासक्रमाच्या प्रवेशापासून या विद्यार्थ्यांना वंचित रहावे लागणार

पुणे: राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे एमएचटी सीईटी परीक्षा घेण्यात आली,मात्र,परीक्षेचा निकाल जाहीर करताना काही विद्यार्थ्यांना चुकीचे पर्सेंटाईल दिले असून प्रवेश परीक्षा कक्षाकडे याबाबत तक्रार करूनही त्यांची दखल घेतली जात नाही. त्यामुळे विद्यार्थी व पालकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.परंतु, तंत्र शिक्षण विभागाकडून संबंधित विद्यार्थ्यांची दखल घेतली जाईल,असे विभागाच्या वरिष्ठ अधिका-यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.पर्सेंटाईल पध्दत तांत्रिक दृष्ट्या बरोबर असली तरी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे एमएचटी- सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर करताना पीसीएम ग्रुप मधील विद्यार्थ्यांवर अन्याय झाला असल्याचे मत प्रवेश पूर्व परीक्षांच्या अभ्यासकांनी व्यक्त केले आहे.त्यातच आता काही विद्यार्थ्यांना 2 पर्सेंटाईल,32 पर्सेंटाईल गुण मिळाल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत प्रवेश परीक्षा कक्षाकडे तक्रार करूनही विद्यार्थी व पालकांना दाद मिळत नाही.त्यामुळे इंजिनिअरिंग,फार्मसी अभ्यासक्रमाच्या प्रवेशापासून या विद्यार्थ्यांना वंचित रहावे लागणार आहे.विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षा कक्षाकडे चुकीचे पर्सेंटाईल मिळाल्याबाबत तक्रार देण्याचा प्रयत्न केला. मात्र,कक्षाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप विद्यार्थी व पालकांकडून केला आहे. पर्सेंटाईलवर विद्यार्थ्यांना प्रवेश देणार की गुणांच्या आधारे प्रवेश देणार याबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याचे कक्षातील कर्मचा-यांकडून पालकांना सांगितले जात आहे. विद्यार्थ्यांना 2 किंवा 31 पर्सेंटाईल मिळूच शकत नाही. विद्यार्थ्यांनी परीक्षेत 100 ते 125 पेक्षा अधिक गुण मिळवले आहेत. त्यामुळे प्रवेश परीक्षा कक्षाने दिलेले पर्सेंटाईल चूकीचे आहेत,असाही दावा पालक करत आहेत.----------------------राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने एमएचटी-सीईटी परीक्षा घेऊन निकाल जाहीर केला आहे.तंत्र शिक्षण विभागाने कोणताही हस्तक्षेप केलेला नाही. तसेच विद्यार्थ्यांना चुकीचे पर्सेंटाईल मिळाल्याची कोणतीही तक्रार विभागाकडे प्राप्त झालेली नाही. तक्रार प्रात्र झाल्यास त्याची दखल घेवून प्रवेश परीक्षा कक्षाकडे संबंधित तक्रार पाठविली जाईल.तसेच कक्षाकडेही अशा तक्रारी प्राप्त झाल्या असतील तर त्या निश्चितच निकाली काढल्या जातील. एकाही विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही,याची काळजी विभागाकडून घेतली जाईल. - अभय वाघ,संचालक ,तंत्र शिक्षण विभाग,महाराष्ट्र राज्य 

टॅग्स :PuneपुणेEducationशिक्षणexamपरीक्षाStudentविद्यार्थी