शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
3
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
4
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
5
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
6
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
7
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
8
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
9
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
10
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
11
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
12
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
13
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
14
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
15
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
16
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
17
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
18
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
19
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
20
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना

ई-पीक नाेंदणी केली तरच मिळेल विमा दावा; विमा कंपन्यांच्या मनमानीलाही बसणार चाप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2022 07:46 IST

राज्य सरकारने याबाबत १ जुलै रोजी शासन निर्णय जारी केला आहे. त्यानुसार यंदाच्या खरीप हंगामात प्रथमच अशा पद्धतीचे बंधन घालण्यात आले आहे

 नितीन चौधरी

पुणे : शेतकऱ्यांच्या विमा दाव्यांना नाकारणाऱ्या विमा कंपन्यांच्या मनमानीला चाप बसावा तसेच बोगस शेतकऱ्यांकडून दाखल होणाऱ्या विमा दाव्यांना आळा बसावा, या हेतूने राज्य सरकारने आता पीक विमा घेण्यासाठी त्या पिकांची ई-पीक पाहणीअंतर्गत नोंदणी बंधनकारक केली आहे, त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात पीक विमा घेणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला ही नोंदणी असल्याशिवाय दावा करता येणार नाही.

राज्य सरकारने याबाबत १ जुलै रोजी शासन निर्णय जारी केला आहे. त्यानुसार यंदाच्या खरीप हंगामात प्रथमच अशा पद्धतीचे बंधन घालण्यात आले आहे. नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी, दुष्काळ यामुळे पिकांच्या नुकसानभरपाईसाठी पीकविमा उतरवला जातो. नुकसानीचे निकष ठरविताना जिल्हा, तालुका, मंडळ व ग्रामस्तरावर पीक कापणी उत्पादन अहवाल महत्त्वाचा ठरतो. त्यावरच नुकसानीची टक्केवारी किती आहे, हे कळते. विमा कंपन्या या अहवालानुसार तसेच शेतकऱ्यांच्या पिकाची सातबारा उतारावरील नोंद, पिकाचे झालेले नुकसान यावरून विमा दावे निकाली काढतात.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना विमा कंपन्यांनी दावे नाकारण्यावरून राज्य सरकारमध्ये सहभागी असतानाही शिवसेनेने विमा कंपन्यांवर हल्ले केले होते. त्यानंतर विमा कंपन्यांनी माघार घेत अनेक शेतकऱ्यांना विमा दावा दिला होता. मात्र, यात कंपन्यांचीही लबाडी उघड झाली होती. नोंदणी असतानाही कंपन्यांनी दावा नाकारल्याची अनेक प्रकरणे न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाने शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल दिला आहे.

नाेंदणीचा दुहेरी फायदाया अडचणीतून मार्ग काढण्यासाठी राज्य सरकारने आता पीकविमा काढताना त्या पिकाची नोंदणी ई-पीक पाहणी ॲपवरूनच करावी, असे निर्देश दिले आहेत. ही नोंदणी बंधनकारक आहे. याचा फायदा राज्य सरकारला पिकाखालील क्षेत्र किती आहे, किती शेतकऱ्यांनी पीकविमा उतरवला आहे, संभाव्य उत्पादन किती असेल, याचा अंदाज घेण्यासाठी होणार आहे. ई-पीक नाेंदणीमुळे शेतकऱ्यांना आपण नोंदणी केलेल्या पिकाचा विमा मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही. त्याच्या पिकाची नोंदणी थेट शासकीय यंत्रणेकडेच उपलब्ध होणार असल्याने विमा कंपनीला दावा नाकारता येणार नाही. त्यामुळे शेतकऱ्याला नुकसानभरपाई मिळण्यास मदत होईल. 

शेतकऱ्यांना पिकाची नोंदणी ई-पीक पाहणी ॲपवर करता यावी, यासाठी १५ ऑक्टोबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर खरीप पिकासाठी नोंदणी करता येणार नाही. याचा फायदा पीकविमा दाव्यांमध्ये होईल. - बालाजी शेवाळे, राज्य उपसमन्वयक, ई-पीक पाहणी