शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

ई-पीक नाेंदणी केली तरच मिळेल विमा दावा; विमा कंपन्यांच्या मनमानीलाही बसणार चाप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2022 07:46 IST

राज्य सरकारने याबाबत १ जुलै रोजी शासन निर्णय जारी केला आहे. त्यानुसार यंदाच्या खरीप हंगामात प्रथमच अशा पद्धतीचे बंधन घालण्यात आले आहे

 नितीन चौधरी

पुणे : शेतकऱ्यांच्या विमा दाव्यांना नाकारणाऱ्या विमा कंपन्यांच्या मनमानीला चाप बसावा तसेच बोगस शेतकऱ्यांकडून दाखल होणाऱ्या विमा दाव्यांना आळा बसावा, या हेतूने राज्य सरकारने आता पीक विमा घेण्यासाठी त्या पिकांची ई-पीक पाहणीअंतर्गत नोंदणी बंधनकारक केली आहे, त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात पीक विमा घेणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला ही नोंदणी असल्याशिवाय दावा करता येणार नाही.

राज्य सरकारने याबाबत १ जुलै रोजी शासन निर्णय जारी केला आहे. त्यानुसार यंदाच्या खरीप हंगामात प्रथमच अशा पद्धतीचे बंधन घालण्यात आले आहे. नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी, दुष्काळ यामुळे पिकांच्या नुकसानभरपाईसाठी पीकविमा उतरवला जातो. नुकसानीचे निकष ठरविताना जिल्हा, तालुका, मंडळ व ग्रामस्तरावर पीक कापणी उत्पादन अहवाल महत्त्वाचा ठरतो. त्यावरच नुकसानीची टक्केवारी किती आहे, हे कळते. विमा कंपन्या या अहवालानुसार तसेच शेतकऱ्यांच्या पिकाची सातबारा उतारावरील नोंद, पिकाचे झालेले नुकसान यावरून विमा दावे निकाली काढतात.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना विमा कंपन्यांनी दावे नाकारण्यावरून राज्य सरकारमध्ये सहभागी असतानाही शिवसेनेने विमा कंपन्यांवर हल्ले केले होते. त्यानंतर विमा कंपन्यांनी माघार घेत अनेक शेतकऱ्यांना विमा दावा दिला होता. मात्र, यात कंपन्यांचीही लबाडी उघड झाली होती. नोंदणी असतानाही कंपन्यांनी दावा नाकारल्याची अनेक प्रकरणे न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाने शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल दिला आहे.

नाेंदणीचा दुहेरी फायदाया अडचणीतून मार्ग काढण्यासाठी राज्य सरकारने आता पीकविमा काढताना त्या पिकाची नोंदणी ई-पीक पाहणी ॲपवरूनच करावी, असे निर्देश दिले आहेत. ही नोंदणी बंधनकारक आहे. याचा फायदा राज्य सरकारला पिकाखालील क्षेत्र किती आहे, किती शेतकऱ्यांनी पीकविमा उतरवला आहे, संभाव्य उत्पादन किती असेल, याचा अंदाज घेण्यासाठी होणार आहे. ई-पीक नाेंदणीमुळे शेतकऱ्यांना आपण नोंदणी केलेल्या पिकाचा विमा मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही. त्याच्या पिकाची नोंदणी थेट शासकीय यंत्रणेकडेच उपलब्ध होणार असल्याने विमा कंपनीला दावा नाकारता येणार नाही. त्यामुळे शेतकऱ्याला नुकसानभरपाई मिळण्यास मदत होईल. 

शेतकऱ्यांना पिकाची नोंदणी ई-पीक पाहणी ॲपवर करता यावी, यासाठी १५ ऑक्टोबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर खरीप पिकासाठी नोंदणी करता येणार नाही. याचा फायदा पीकविमा दाव्यांमध्ये होईल. - बालाजी शेवाळे, राज्य उपसमन्वयक, ई-पीक पाहणी