शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

Virar Covid hospital Fire: दुर्घटनेसंदर्भातील चौकशी समितीच्या सूचना अमलात आणल्या जाणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2021 05:17 IST

Virar Covid hospital Fire: महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कवसई : विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयामध्ये झालेल्या दुर्दैवी घटनेसंदर्भातील चौकशी समिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नेमली असून त्या चौकशी समितीने केलेल्या शिफारशी अमलात आणल्या जाणार असल्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.विरार येथील विजय वल्लभ रुग्णालयाच्या आयसीयू कक्षाला लागलेल्या आगीची पाहणी शुक्रवारी संध्याकाळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली. त्या वेळी पत्रकारांशी झालेल्या चर्चेवेळी महसूलमंत्री थोरात बोलत होते.जिल्हा प्रशासन सतर्क असून पूर्ण क्षमतेने काम करत आहे. जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा कोरोनाशी दिवस-रात्र लढत आहे. प्रशासनावर या काळात प्रचंड ताण असला तरी भविष्यात अशा दुर्घटना घडणार नाहीत याची काळजी जिल्हा प्रशासन घेईल, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. झालेली दुर्घटना अत्यंत दुर्दैवी असून अशा घटना भविष्यात घडू नयेत, यासाठी प्रशासन नियोजनबद्ध काम करेल, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

अशी आहे चौकशी समितीविजय वल्लभ रुग्णालयातील आगीच्या घटनेच्या चौकशीसाठी समिती नेमण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ अध्यक्ष असलेल्या या समितीत महापालिका आयुक्त गंगाथरन डी., जिल्हा वैद्यकीय अधिकारी दयानंद सूर्यवंशी, पोलीस उपायुक्त संजय पाटील आणि वसई-विरार महापालिका अग्निशमन अधिकारी दिलीप पालव यांचा समावेश आहे. समितीने १५ दिवसांत चौकशी अहवाल सादर करायचा आहे.

पंतप्रधानांकडून तीव्र दु:खपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अग्नितांडव घटनेची माहिती घेऊन तीव्र दुःख व्यक्त केले असून मृतांना दोन लाख व जखमींसाठी ५० हजार रुपयांची मदत ट्विटरवरून जाहीर केली.

गृहमंत्र्यांकडून शोक व्यक्तदेशाचे गृहमंत्री अमित शहा यांनीही विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयात घडलेल्या आगीच्या दुर्घटनेची आणि त्यात १५ जणांच्या झालेल्या मृत्यू बाबतीत तीव्र शोक व्यक्त केला आहे. 

जखमींची योग्य काळजी प्रशासन घेतेय - पालकमंत्री 

वसई : विरार येथील विजय वल्लभ रुग्णालयातील घटना अत्यंत दुर्दैवी असून, अशा घटना भविष्यात यापुढे घडू नयेत, यासाठी ठोस उपाययोजना करण्यात येणार आहेत, तसेच या घटनेतील जखमींची जिल्हा प्रशासन योग्य काळजी घेत आहे, असे कृषी, माजी सैनिक कल्‍याणमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी विरार येथे घटनास्थळी भेटी वेळी ‘लोकमत’ला सांगितले.

वसई-विरार शहर महानगरपालिका हद्दीतील विजय वल्लभ हॉस्पिटल, तिरुपती फेज-१, विरार (प.) या ४ मजली रुग्णालयामध्ये रात्री ३:१३च्या सुमारास शॉर्टसर्किट होऊन आग लागून १३ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच तातडीने पालकमंत्री भुसे घटनास्थळी दाखल झाले.विरार येथील विजय वल्लभ रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जात होते. सदर रुग्णालयात एकूण ९० कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत होते. इतर रुग्णांनादुसऱ्या रुग्णालयांमध्ये तत्काळ हलविण्यात आले असून, प्रशासन त्यांची काळजी घेत आहे, असे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.

टॅग्स :Balasaheb Thoratबाळासाहेब थोरातfireआगcorona virusकोरोना वायरस बातम्या