शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

अखेर 'त्या' वादावर पडदा कसा पडला?; एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस बैठकीतील इनसाईड स्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2023 18:26 IST

युतीतील वादानंतर पहिल्यांदाच पालघरमध्ये शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री एकत्र आले होते.

मुंबई - राज्यात शिंदे-फडणवीस सरकार येऊन आता १ वर्ष उलटला आहे. परंतु मागील काही दिवसांपासून शिवसेना-भाजपा यांच्यातील वाद उघडपणे चव्हाट्यावर येताना दिसले. या वादाला सुरुवात झाली ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे हे ज्या कल्याण लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात त्या जागेवरून. कल्याणमध्ये स्थानिक भाजपा नेत्यांनी श्रीकांत शिंदेंविरोधात नाराजी व्यक्त केली. त्यानंतर श्रीकांत शिंदेंनीही माझ्यामुळे युतीत बिघाड होत असेल तर मी राजीनामा द्यायला तयार आहे असं स्पष्ट विधान केले. 

श्रीकांत शिंदे यांच्या या विधानानंतर युतीत बेबनाव असल्याचे चित्र महाराष्ट्रासमोर आले. कल्याण डोंबिवलीतील भाजपाचे नेते मंत्री रवींद्र चव्हाण यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात विधाने केली. त्यानंतर लगेच प्रमुख वृत्तपत्रात एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदासाठी सर्वाधिक पसंती मिळाल्याची जाहिरात प्रसिद्ध झाली. त्यात देवेंद्र फडणवीसांना शिंदेपेक्षा कमी मते मिळाल्याचे दाखवले. त्यामुळे ही नाराजी आणखी वाढली. भाजपा-शिवसेना नेत्यांमध्ये उघडपणे एकमेकांविरोधी वक्तव्ये येऊ लागली. युतीतील हा वाढता तणाव पाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या वादावर तोडगा काढण्यासाठी बैठक घेतली. 

युतीतील वादानंतर पहिल्यांदाच पालघरमध्ये शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री एकत्र आले होते. शिंदे-फडणवीस यांच्या देहबोलीवरून दोघांमध्ये वाद गंभीर असल्याचे दिसून आले. परंतु कुठेतरी विरोधकांना आयती संधी मिळू नये त्यासाठी वादावर तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे होते. त्यामुळे पालघरमध्ये मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री आणि भाजपा मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यात बैठक झाली. त्यात कल्याण डोंबिवलीतील वादावर मुख्यमंत्री शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली. तेव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सामंजस्याची भूमिका घेत युतीत अशाप्रकारे एकमेकांविरोधी विधाने करणे योग्य नाही. आपल्याला मिळून सरकार चालवायचे आहे अशी भूमिका घेतली. रवींद्र चव्हाण यांना फडणवीस यांनी योग्य सूचना दिल्या त्यानंतर कल्याण डोंबिवली वादावर पडदा पडला. 

त्यानंतर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री मुंबईच्या दिशेने आले. तेव्हा मुख्यमंत्र्यांच्या सल्लागारांनी जाहिरातीच्या विषयावर उपमुख्यमंत्र्याशी बोलले पाहिजे. त्यांच्या मनातील प्रश्नांना उत्तरे दिली पाहिजे असा सल्ला दिला. त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी होकार देत तात्काळ श्रीकांत शिंदे यांना सह्याद्री अतिथीगृहावर बोलावले. सह्याद्रीवर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री आणि श्रीकांत शिंदे यांच्यात बैठक झाली. जाहिरातीवर जी नाराजी होती त्यावर उपमुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर दोन्ही प्रमुख नेत्यांनी आपापल्या टीमवर नियंत्रण ठेवले पाहिजे. एखादी भूमिका मांडायच्यापूर्वी चर्चा करायला हवी. एकमेकांविरोधी वक्तव्ये दोन्ही पक्षातील नेत्यांनी टाळावेत. जर एखादी भूमिका घ्यायची असेल तर दोन्ही नेत्यांचा ग्रीन सिग्नल हवा. निवडणुकीत कुठेही दगाफटका होणार नाही यासाठी दोन्ही पक्षांनी काळजी घेतली पाहिजे. महाविकास आघाडीला तडे जाताना दिसतायेत त्यात आपल्या भांडणाचा विरोधकांना फायदा होऊ नये अशी सामंजस्याची भूमिका एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस या दोन्ही नेत्यांनी घेत युतीतील वादावर पडदा टाकला. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv SenaशिवसेनाBJPभाजपा