शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

अखेर 'त्या' वादावर पडदा कसा पडला?; एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस बैठकीतील इनसाईड स्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2023 18:26 IST

युतीतील वादानंतर पहिल्यांदाच पालघरमध्ये शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री एकत्र आले होते.

मुंबई - राज्यात शिंदे-फडणवीस सरकार येऊन आता १ वर्ष उलटला आहे. परंतु मागील काही दिवसांपासून शिवसेना-भाजपा यांच्यातील वाद उघडपणे चव्हाट्यावर येताना दिसले. या वादाला सुरुवात झाली ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे हे ज्या कल्याण लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात त्या जागेवरून. कल्याणमध्ये स्थानिक भाजपा नेत्यांनी श्रीकांत शिंदेंविरोधात नाराजी व्यक्त केली. त्यानंतर श्रीकांत शिंदेंनीही माझ्यामुळे युतीत बिघाड होत असेल तर मी राजीनामा द्यायला तयार आहे असं स्पष्ट विधान केले. 

श्रीकांत शिंदे यांच्या या विधानानंतर युतीत बेबनाव असल्याचे चित्र महाराष्ट्रासमोर आले. कल्याण डोंबिवलीतील भाजपाचे नेते मंत्री रवींद्र चव्हाण यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात विधाने केली. त्यानंतर लगेच प्रमुख वृत्तपत्रात एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदासाठी सर्वाधिक पसंती मिळाल्याची जाहिरात प्रसिद्ध झाली. त्यात देवेंद्र फडणवीसांना शिंदेपेक्षा कमी मते मिळाल्याचे दाखवले. त्यामुळे ही नाराजी आणखी वाढली. भाजपा-शिवसेना नेत्यांमध्ये उघडपणे एकमेकांविरोधी वक्तव्ये येऊ लागली. युतीतील हा वाढता तणाव पाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या वादावर तोडगा काढण्यासाठी बैठक घेतली. 

युतीतील वादानंतर पहिल्यांदाच पालघरमध्ये शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री एकत्र आले होते. शिंदे-फडणवीस यांच्या देहबोलीवरून दोघांमध्ये वाद गंभीर असल्याचे दिसून आले. परंतु कुठेतरी विरोधकांना आयती संधी मिळू नये त्यासाठी वादावर तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे होते. त्यामुळे पालघरमध्ये मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री आणि भाजपा मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यात बैठक झाली. त्यात कल्याण डोंबिवलीतील वादावर मुख्यमंत्री शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली. तेव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सामंजस्याची भूमिका घेत युतीत अशाप्रकारे एकमेकांविरोधी विधाने करणे योग्य नाही. आपल्याला मिळून सरकार चालवायचे आहे अशी भूमिका घेतली. रवींद्र चव्हाण यांना फडणवीस यांनी योग्य सूचना दिल्या त्यानंतर कल्याण डोंबिवली वादावर पडदा पडला. 

त्यानंतर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री मुंबईच्या दिशेने आले. तेव्हा मुख्यमंत्र्यांच्या सल्लागारांनी जाहिरातीच्या विषयावर उपमुख्यमंत्र्याशी बोलले पाहिजे. त्यांच्या मनातील प्रश्नांना उत्तरे दिली पाहिजे असा सल्ला दिला. त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी होकार देत तात्काळ श्रीकांत शिंदे यांना सह्याद्री अतिथीगृहावर बोलावले. सह्याद्रीवर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री आणि श्रीकांत शिंदे यांच्यात बैठक झाली. जाहिरातीवर जी नाराजी होती त्यावर उपमुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर दोन्ही प्रमुख नेत्यांनी आपापल्या टीमवर नियंत्रण ठेवले पाहिजे. एखादी भूमिका मांडायच्यापूर्वी चर्चा करायला हवी. एकमेकांविरोधी वक्तव्ये दोन्ही पक्षातील नेत्यांनी टाळावेत. जर एखादी भूमिका घ्यायची असेल तर दोन्ही नेत्यांचा ग्रीन सिग्नल हवा. निवडणुकीत कुठेही दगाफटका होणार नाही यासाठी दोन्ही पक्षांनी काळजी घेतली पाहिजे. महाविकास आघाडीला तडे जाताना दिसतायेत त्यात आपल्या भांडणाचा विरोधकांना फायदा होऊ नये अशी सामंजस्याची भूमिका एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस या दोन्ही नेत्यांनी घेत युतीतील वादावर पडदा टाकला. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv SenaशिवसेनाBJPभाजपा