‘मागास अधिकाऱ्यांवर बदल्यांमध्ये अन्याय’
By Admin | Updated: April 30, 2016 04:34 IST2016-04-30T04:34:23+5:302016-04-30T04:34:23+5:30
बदल्यांमध्ये मागासवर्गीय अधिकाऱ्यांवर अन्याय झाला असल्याचा आरोप कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष कृष्णा इंगळे यांनी केला

‘मागास अधिकाऱ्यांवर बदल्यांमध्ये अन्याय’
मुंबई : आयएएस अधिकाऱ्यांच्या अलीकडे झालेल्या बदल्यांमध्ये मागासवर्गीय अधिकाऱ्यांवर अन्याय झाला असल्याचा आरोप कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष कृष्णा इंगळे यांनी केला असून, हा अन्याय दूर करण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
सरकार कोणतेही असले तरी विशिष्ट अधिकाऱ्यांना महत्त्वाच्याच जागा दिल्या जातात. हे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५व्या जयंतीचे वर्ष असूनही एकही विभागीय आयुक्तपद मागासवर्गीय अधिकाऱ्यास मिळू नये, ही अन्यायकारक बाब असल्याचे इंगळे यांनी म्हटले आहे.