शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

मुंबईतील परिस्थितीचं खापर शिवसेना किंवा महापालिकेवर फोडणं हा अन्याय; सामनातून टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2017 08:23 IST

मंगळवारी मुंबईत आलेल्या या परिस्थितीवरून शिवसेना आणि महापालिकेवर चौफेर टीका होत असताना आता सामनातून शिवसेनेने बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

ठळक मुद्दे मुंबई आता हळूहळू पूर्वपदावर येत असताना सोशल मीडिया, राजकारणी आणि सगळीकडे मुंबईवर अशी परिस्थिती नेमकी का आली? याचीच चर्चा सुरू आहे.मुंबईवर आलेल्या या संकटाबद्दल प्रत्येक ठिकाणी विविध चर्चा ऐकायला मिळतात. मंगळवारी मुंबईत आलेल्या या परिस्थितीवरून शिवसेना आणि महापालिकेवर चौफेर टीका होत असताना आता सामनातून शिवसेनेने बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे. मुंबईमध्ये उद्भवलेल्या परिस्थितीचं शिवसेना किंवा महापालिकेवर खापर फोडणं हा अन्याय असल्याचं सामनामध्ये म्हंटलं गेलं आहे.

मुंबई, दि. 31-  मुंबई आता हळूहळू पूर्वपदावर येत असताना सोशल मीडिया, राजकारणी आणि सगळीकडे मुंबईवर अशी परिस्थिती नेमकी का आली? याचीच चर्चा सुरू आहे. मुंबईवर आलेल्या या संकटाबद्दल प्रत्येक ठिकाणी विविध चर्चा ऐकायला मिळतात. मंगळवारी मुंबईत आलेल्या या परिस्थितीवरून शिवसेना आणि महापालिकेवर चौफेर टीका होत असताना आता सामनातून शिवसेनेने बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे.  मुंबईमध्ये उद्भवलेल्या परिस्थितीचं शिवसेना किंवा महापालिकेवर खापर फोडणं हा अन्याय असल्याचं सामनामध्ये म्हंटलं गेलं आहे. तसंच मुंबईसारख्या शहरांना जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देणे हे राज्य सरकारचे काम नाही का?, असा सवालही सामानातून विचारण्यात आला आहे.

सामनामध्ये गुरूवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या लेखात म्हंटलं आहे,मुंबईत मुसळधार पाऊस झाला व मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनाची दैना उडाली असे चित्र निर्माण केले जात आहे. सव्वीस जुलैनंतरचा सर्वाधिक पाऊस पडला व तो फक्त मुंबईतच पडला असे नाही, ज्या महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता नाही तेथेही तो पडला आहे. मुंबई-नाशिक महामार्ग या काळात कोलमडून गेला. मुंबई-पुणे एक्प्रेस वेवरची वाहतूक बंद ठेवण्यात आली; कारण शेवटी सुरक्षेचा व लोकांच्या जीविताचा प्रश्न होता. मुसळधार पाऊस पडत असल्याने लोकांनी उगाच घराबाहेर पडू नये अशी आवाहने करणे सोपे असते, पण ज्यांचे पोटच हातावर आहे व रोज बाहेर पडल्याशिवाय चूल पेटत नाही त्यांना तर बाहेर पडावेच लागेल. नोकरदार वर्गास बाहेर पडू नका, असे सांगणे म्हणजे त्यांच्यावर अन्यायच ठरतो. तरीही जीव धोक्यात घालू नका. घरी तुमची बायको-मुले वाट पाहात आहेत, असे एका माणुसकीच्या नात्याने सांगावे लागते. त्यात मुंबई म्हटले की, पालिकेवर ठपका ठेवण्याची आता एक फॅशनच झाली आहे. मग मुंबईसारख्या शहरांना जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देणे हे राज्य सरकारचे काम नाही काय? की तुम्ही फक्त मुंबईची आर्थिक लुटच करणार आहात. खरे म्हणजे मुंबईची नालेसफाई चोख झाल्यामुळेच चोवीस तासांत पाण्याचा निचरा झाला. मुंबई सात बेटांची बनली आहे व समुद्राने मुंबईस वेढले आहे. भरती-ओहोटीचे प्रकार असतातच. पुन्हा त्या एमएमआरडीएने जे रस्ते खणून ठेवले व जागोजागी ढिगारे केले त्याचे खापर तुम्ही शिवसेना किंवा महापालिकेवर फोडताय हा अन्याय आहे. जे स्वयंभू शहाणे असे आरोप करीत आहेत त्यांच्या ‘कौन्सिलिंग’ची गरज असून पालिका आयुक्तांनी हे प्रयोगही आता जरूर करावेत.

टॅग्स :Mumbai Floodedमुंबईत पावसाचा हाहाकारUddhav Thackerayउद्धव ठाकरेMumbai Municipal Corporationमुंबई महानगरपालिका