शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
2
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
6
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
7
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
8
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
9
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
10
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
11
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
12
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
13
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
14
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
15
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
16
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
17
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
18
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
19
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
20
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार

मुंबईतील परिस्थितीचं खापर शिवसेना किंवा महापालिकेवर फोडणं हा अन्याय; सामनातून टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2017 08:23 IST

मंगळवारी मुंबईत आलेल्या या परिस्थितीवरून शिवसेना आणि महापालिकेवर चौफेर टीका होत असताना आता सामनातून शिवसेनेने बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

ठळक मुद्दे मुंबई आता हळूहळू पूर्वपदावर येत असताना सोशल मीडिया, राजकारणी आणि सगळीकडे मुंबईवर अशी परिस्थिती नेमकी का आली? याचीच चर्चा सुरू आहे.मुंबईवर आलेल्या या संकटाबद्दल प्रत्येक ठिकाणी विविध चर्चा ऐकायला मिळतात. मंगळवारी मुंबईत आलेल्या या परिस्थितीवरून शिवसेना आणि महापालिकेवर चौफेर टीका होत असताना आता सामनातून शिवसेनेने बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे. मुंबईमध्ये उद्भवलेल्या परिस्थितीचं शिवसेना किंवा महापालिकेवर खापर फोडणं हा अन्याय असल्याचं सामनामध्ये म्हंटलं गेलं आहे.

मुंबई, दि. 31-  मुंबई आता हळूहळू पूर्वपदावर येत असताना सोशल मीडिया, राजकारणी आणि सगळीकडे मुंबईवर अशी परिस्थिती नेमकी का आली? याचीच चर्चा सुरू आहे. मुंबईवर आलेल्या या संकटाबद्दल प्रत्येक ठिकाणी विविध चर्चा ऐकायला मिळतात. मंगळवारी मुंबईत आलेल्या या परिस्थितीवरून शिवसेना आणि महापालिकेवर चौफेर टीका होत असताना आता सामनातून शिवसेनेने बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे.  मुंबईमध्ये उद्भवलेल्या परिस्थितीचं शिवसेना किंवा महापालिकेवर खापर फोडणं हा अन्याय असल्याचं सामनामध्ये म्हंटलं गेलं आहे. तसंच मुंबईसारख्या शहरांना जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देणे हे राज्य सरकारचे काम नाही का?, असा सवालही सामानातून विचारण्यात आला आहे.

सामनामध्ये गुरूवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या लेखात म्हंटलं आहे,मुंबईत मुसळधार पाऊस झाला व मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनाची दैना उडाली असे चित्र निर्माण केले जात आहे. सव्वीस जुलैनंतरचा सर्वाधिक पाऊस पडला व तो फक्त मुंबईतच पडला असे नाही, ज्या महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता नाही तेथेही तो पडला आहे. मुंबई-नाशिक महामार्ग या काळात कोलमडून गेला. मुंबई-पुणे एक्प्रेस वेवरची वाहतूक बंद ठेवण्यात आली; कारण शेवटी सुरक्षेचा व लोकांच्या जीविताचा प्रश्न होता. मुसळधार पाऊस पडत असल्याने लोकांनी उगाच घराबाहेर पडू नये अशी आवाहने करणे सोपे असते, पण ज्यांचे पोटच हातावर आहे व रोज बाहेर पडल्याशिवाय चूल पेटत नाही त्यांना तर बाहेर पडावेच लागेल. नोकरदार वर्गास बाहेर पडू नका, असे सांगणे म्हणजे त्यांच्यावर अन्यायच ठरतो. तरीही जीव धोक्यात घालू नका. घरी तुमची बायको-मुले वाट पाहात आहेत, असे एका माणुसकीच्या नात्याने सांगावे लागते. त्यात मुंबई म्हटले की, पालिकेवर ठपका ठेवण्याची आता एक फॅशनच झाली आहे. मग मुंबईसारख्या शहरांना जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देणे हे राज्य सरकारचे काम नाही काय? की तुम्ही फक्त मुंबईची आर्थिक लुटच करणार आहात. खरे म्हणजे मुंबईची नालेसफाई चोख झाल्यामुळेच चोवीस तासांत पाण्याचा निचरा झाला. मुंबई सात बेटांची बनली आहे व समुद्राने मुंबईस वेढले आहे. भरती-ओहोटीचे प्रकार असतातच. पुन्हा त्या एमएमआरडीएने जे रस्ते खणून ठेवले व जागोजागी ढिगारे केले त्याचे खापर तुम्ही शिवसेना किंवा महापालिकेवर फोडताय हा अन्याय आहे. जे स्वयंभू शहाणे असे आरोप करीत आहेत त्यांच्या ‘कौन्सिलिंग’ची गरज असून पालिका आयुक्तांनी हे प्रयोगही आता जरूर करावेत.

टॅग्स :Mumbai Floodedमुंबईत पावसाचा हाहाकारUddhav Thackerayउद्धव ठाकरेMumbai Municipal Corporationमुंबई महानगरपालिका