शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

पायाभूत, नैदानिक चाचण्या रद्द होणार, शिक्षणमंत्र्यांचे आश्वासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 04:44 IST

गेल्या तीन वर्षांपासून राज्यातील शाळांमध्ये सुरू असलेल्या पायाभूत, नैदानिक चाचण्या बंद करण्याचे आश्वासन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले आहे. शिक्षक परिषदेने शिक्षणमंत्र्यांची भेट घेऊन, पायाभूत व नैदानिक चाचणी बंद करण्याची मागणी शुक्रवारी केली.

मुंबई - गेल्या तीन वर्षांपासून राज्यातील शाळांमध्ये सुरू असलेल्या पायाभूत, नैदानिक चाचण्या बंद करण्याचे आश्वासन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले आहे. शिक्षक परिषदेने शिक्षणमंत्र्यांची भेट घेऊन, पायाभूत व नैदानिक चाचणी बंद करण्याची मागणी शुक्रवारी केली. त्यावर शिक्षणमंत्र्यांनी तत्त्वत: मागणी मान्य केल्याचा दावा शिक्षक परिषदेने केला आहे.अप्रगत विद्यार्थी शोधून त्यांना प्रगत करणे या हेतूने गेल्या तीन वर्षांपासून शाळांमध्ये पायाभूत चाचण्यांचे आयोजन शिक्षण विभागाकडून होत आहे. मात्र, या चाचण्यांबाबत अनेक संभ्रम निर्माण झाले होते. त्या संदर्भात शिक्षक परिषदेचे अध्यक्ष वेणूनाथ कडू, आमदार नागो गाणार यांनी शुक्रवारी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेतली, तसेच अनेक शाळांमध्ये पायाभूत परीक्षांसोबतच शालेय स्तरावरच्या परीक्षांचे आयोजनही केल्यामुळे, विद्यार्थ्यांना दोन परीक्षांना सामोरे जावे लागत असल्याचे वास्तव मांडले. शिक्षकांना दोन्ही परीक्षांच्या उत्तरपत्रिका तपासण्याचा ताण सहन करावा लागत असल्याचेही निदर्शनास आणून दिले.प्रत्यक्ष अप्रगत विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून वाचन क्षमता कमी असणाºया विद्यार्थ्यांसाठी मूलभूत वाचन क्षमता सारखे प्रशिक्षण शिक्षण विभागाने सुरू केले आहे. यापुढेही या चाचण्यांच्या संकलित झालेल्या माहितीमुळे शिक्षण विभागाला अनेक उपक्रम, प्रशिक्षण हाती घेता येतील. त्यामुळे पायाभूत, नैदानिक चाचण्या रद्द केल्याने विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही, असा दावा शिक्षक परिषदेचे मुंबई विभागाचे अनिल बोरनारे यांनी केला आहे.

टॅग्स :educationशैक्षणिकEducation Sectorशिक्षण क्षेत्रVinod Tawdeविनोद तावडेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार