शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा-शिंदेसेनेच्या बैठकीत 'ठिणगी'? १५ मिनिटांत वातावरण तापले अन् मंत्री ताडकन् बाहेर पडले
2
Gold Silver Price Today: चांदी एका झटक्यात ₹१५,३७९ नं महागली, सोनंही नव्या उच्चांकी स्तरावर; पटापट चेक करा १८, २२ आणि २४ कॅरेटचा भाव
3
कुलदीप सेंगरचा जामीन स्थगित; उन्नाव बलात्कार प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
4
अहिल्यानगरमध्ये उद्धवसेनेला हादरा, पक्षात अंतर्गत मतभेद; तेजस्विनी राठोडांनी भरला अपक्ष अर्ज
5
स्मार्टफोन बाजारात मोठा उलटफेर.! भारतीयांनी २०२५ मध्ये या मॉडेलचे ५६ लाख स्मार्टफोन खरेदी केले; ठरला भारताचा नंबर १ 
6
Travel : स्वप्नातलं शहर की वास्तवातली जादू? पाण्यावर तरंगणाऱ्या वेनिस शहरात 'असा' करा स्वस्तात प्रवास!
7
Thane Politics: शिंदे-चव्हाण स्वतःचे बालेकिल्ले राखण्यासाठी 'ठाणे, कडोंम'मध्ये एकत्र; मीरा-भाईंदर, नवी मुंबईचं काय?
8
जागावाटपाचे घोडे अडलेलेच! काँग्रेस-राष्ट्रवादी (शरद पवार) आघाडीचा दावा, जागा गुलदस्त्यात
9
अजित पवारांची वसंतदादा शुगरच्या बैठकीला दांडी! पुण्यात राजकीय खलबतं; निवडणुकीच्या रणधुमाळीमुळे काकांनी बोलावलेली बैठक चुकवली?
10
आता १२५ दिवस रोजगाराची गॅरेंटी! पाहा G RAM G विधेयकामुळे ग्रामीण भागात कसा होणार फायदा?
11
मराठीच्या मुद्द्याला हिंदुत्वाने पलटवार! ठाकरे बंधूंच्या रणनीतीला शह देणार, भाजपानं आखला प्लॅन
12
“मुंबईसाठी अदानी अन् आमची नैतिक लढाई सुरूच राहणार, ती थांबवणार नाही”: संजय राऊत
13
Nagpur Municipal Election: महाविकास आघाडीचं अखेर ठरलं! काँग्रेस १२९, राष्ट्रवादी १२ जागा; उद्धवसेनेला किती जागा?
14
टीम इंडियाविरुद्ध चुलत भाऊ कॅप्टन झाला; दुसरीकडे संधी मिळेना म्हणून स्टार ऑलराउंडरनं क्रिकेट सोडलं
15
Health Tips: गुडघेदुखीने त्रस्त आहात? मग 'रिव्हर्स वॉकिंग' करून पहा; २ मिनिटांत मिळेल आराम!
16
भाजपविरोधात शिंदेसेना-अजित पवार गटाची युती, महापालिकेसाठी तिरंगी लढत होण्याची शक्यता
17
FD-RD काहीच नाही! एलआयसीच्या 'या' योजनेत २४३ रुपयांची गुंतवणूक करा, मिळेल ५४ लाखांचा फंड
18
आता PF च्या कामासाठी कार्यालयांचे उंबरठे झिजवण्याची गरज नाही; 'पासपोर्ट केंद्रां'प्रमाणे मिळणार सेवा
19
कुलदीप सेंगर पुन्हा तुरुंगात जाणार? स्थगित शिक्षेविरुद्धच्या याचिकेवर सुनावणी करणार सर्वोच्च न्यायालय
20
'ऑपरेशन सिंदूर'यशस्वी! पाकिस्तानने सात महिन्यानंतर कबूल केले; ब्रह्मोसचा जबरदस्त निशाणा, नूर खान एअरबेसवर विध्वंस
Daily Top 2Weekly Top 5

साखर उत्पादनात भारताने ब्राझीलला टाकले मागे, जगात पहिल्या क्रमांकावर; देशात महाराष्ट्र अव्वल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2022 06:23 IST

यंदाच्या गाळप हंगामात भारताने साखर उत्पादनात ब्राझीलला मागे टाकत जगात पहिला क्रमांक मिळवला.

पुणे :

यंदाच्या गाळप हंगामात भारताने साखर उत्पादनात ब्राझीलला मागे टाकत जगात पहिला क्रमांक मिळवला. भारतात महाराष्ट्र अव्वल ठरला असून उत्तर प्रदेश पीछाडीवर गेला आहे. देशात यंदा ३५७ लाख टन साखर उत्पादन झाले असून महाराष्ट्राचा त्यातील वाटा १३८ लाख टनांचा आहे. साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी ही माहिती दिली. 

देशाचे व देशात महाराष्ट्राचे हे साखरेचे विक्रमी उत्पादन आहे. ब्राझीलने त्यांचे साखर उत्पादन इथेनॉलकडे वळवल्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखर कमी पडली व ती पोकळी भारताने तसेच महाराष्ट्राने भरून काढली. भारतामधून झालेल्या ९० लाख टन साखरेपैकी ५६ टक्के साखर एकट्या महाराष्ट्राने निर्यात केली आहे. साखरेबरोबरच यंदा इथेनॉल उत्पादनातही राज्यातील साखर क्षेत्राने आघाडी घेतली आहे. २०० कोटी लीटर इथेनॉल तयार करण्याची क्षमता राज्याने प्राप्त केली आहे. त्यापैकी ११२ कोटी लीटर इथेनॉलचे करार राज्यातील साखर कारखान्यांनी वेगवेगळ्या ऑइल कंपन्यांबरोबर केले आहेत.प्रशासनाने काही कठोर निर्णय घेतल्यामुळेही साखर उद्योगात शिस्त आली, असे मत गायकवाड यांनी व्यक्त केले. संपूर्ण एफआरपी दिल्याशिवाय गाळपासाठी परवानगी दिली गेली नाही, एफआरपी देणाऱ्या कारखान्यांची टक्केनिहाय नावे जाहीर केल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस कुठे टाकायचा याचा निर्णय घेता आला. गुणपत्रकात तळाला गेले की बँकेकडून कर्ज मिळण्यात अडचणी येणार असल्याने कारखान्यांनीही वरच राहण्याचा प्रयत्न केला, असे काही निर्णय उपयोगी ठरले असे ते म्हणाले.

- यंदा १९९ कारखान्यांनी १३२०.३१ लाख टन उसाचे गाळप केले. त्यातून १३८ लाख टन साखर निर्माण झाली. सरासरी ऊस उतारा १०.४० असा होता. - २४० दिवस हंगाम झाला. त्यातील सरासरी १७३ दिवस गाळप झाले. सहवीज निर्मिती मधून कारखान्यांना अडीच हजार कोटी रुपये मिळाले. - विक्रमी गाळप होऊनही कारखान्यांना इथेनॉलचे, निर्यातीचे सहवीज निर्मितीचे पैसे लगेचच मिळत असल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही आतापर्यंत एफआरपीचे (उसाची रास्त किफायतशीर किंमत) ९६ टक्के पैसे मिळाले. - त्यामुळे आर्थिक स्तरावर कारखाने, शेतकरी अशा दोन्ही घटकांना यंदाचा गाळप हंगाम दिलासा देणारा ठरला असे गायकवाड यांनी सांगितले.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेIndiaभारत