शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

३७० कलम हटवून भारताचा जगाला दिला प्रखर संदेश : विनय सहस्त्रबुद्धे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2019 14:18 IST

अणुचाचण्यांप्रमाणे ३७० कलमाविषयीचा संदेश जगाला गेला आहे...

ठळक मुद्देडॉ. राजागोपाला चिदंबरम यांना ‘थोरले बाजीराव पेशवे शौर्य पुरस्कार’ प्रदान

पुणे : भारताने  १९७४ मध्ये इंदिरा गांधींच्या कार्यकाळात आणि १९९८ मध्ये अटबिहारी वाजपेयींच्या कार्यकाळात अणुचाचणी करून जगाला संदेश दिला होता. त्यानंतर आता २०१९ मध्ये नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात ३७० कलम हटवून जागाला प्रखर संदेश दिला आहे. अणुचाचण्यांप्रमाणे ३७० कलमाविषयीचा संदेश जगाला गेला आहे. स्वदेश रक्षण हाच बाजीराव पेशव्यांप्रमाणे आपला उद्देश होता, असे मत भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी व्यक्त केले.  थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानतर्फे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या ३१९ व्या जयंतीनिमित्त देण्यात येणारा ‘थोरले बाजीराव पेशवे शौर्य पुरस्कार’हिंदुस्थान सरकारचे माजी मुख्य वैज्ञानिक सल्लागार पद्मविभूषण डॉ. राजागोपाला चिदंबरम यांना खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते प्रदान केला. खासदार गिरीष बापट, आमदार मेधा कुलकर्णी, उदय सिंह पेशवा, अनिरुद्ध देशपांडे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले, सचिव कुंदनकुमार साठे, अनिल गानू उपस्थित होते. सहस्त्रबुद्धे म्हणाले, परदेशात बाजीराव पेशवे यांच्या युद्धनितीचा अभ्यास केला जातो. मात्र, आपल्याकडे वीरांची उपेक्षा होत असून ती थांबविणे गरजेचे आहे. वीरांचे स्मारक होणे, आठवण ठेवण्याकरीता कार्यक्रम करणे आवश्यक असले, तरी बाजीराव पेशवे यांच्या रणनिती अभ्यासाविषयी साक्षरता होणे आवश्यक आहे.डॉ. चिदंबरम म्हणाले, कोणत्याही देशाचा विकास हा संरक्षणाविना आणि संरक्षण हे विकासाविना होणे अर्थहिन आहे. आपल्या देशाचा विकास झपाटयाने होत असला, तरी देखील सुरक्षेच्या दृष्टीने आपण सर्तक असणे आवश्यक आहे. केवळ शस्त्रास्त्र संपन्न किंवा संरक्षण शास्त्रापुरते नाही, तर उर्जा, पाणी व वातावरणाविषयी संरक्षण असणे गरजेचे आहे. आजच्या काळात सायबर सिक्युरिटी देखील अत्यावश्यक आहे. हिंदुस्थान संरक्षणासोबतच विकासही करीत असून नव्या तंत्रज्ञानाची ओळख देशाला करुन देणारा आपला देश असावा, ही आपली इच्छाशक्ती प्रबळ असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी उदयसिंग पेशवा, खासदार गिरीष बापट, भूषण गोखले यांनीही आपले विचार व्यक्त केले. रवींद्र खरे यांनी सूत्रसंचालन केले. श्रीकांत नगरकर यांनी आभार मानले. 

टॅग्स :PuneपुणेBJPभाजपाJammu Kashmirजम्मू-काश्मीरGovernmentसरकार