शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

I.N.D.I.A आघाडीचं संयोजकपद पक्षप्रमुखांना नको; ठाकरे गटाच्या बैठकीत सूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2023 17:44 IST

मुंबईत होणाऱ्या बैठकीत इंडिया आघाडीच्या संयोजकपदाची नावे घोषित होणार आहे. त्याआधी ठाकरे गटाने हे मत मांडले आहे.

मुंबई – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २६ विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडीची स्थापना केली आहे. भाजपाचा पराभव करून देशात परिवर्तन आणण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. त्यासाठी बिहारच्या पाटणा, कर्नाटकच्या बंगळुरूनंतर आता इंडिया आघाडीतील पक्षांची तिसरी महत्त्वपूर्ण बैठक मुंबईत होणार आहे. या बैठकीचं आयोजन ठाकरे गटाकडून केले जात आहे. तत्पूर्वी इंडिया आघाडीचे संयोजक पक्षप्रमुखांना बनवू नये असा सूर ठाकरे गटाच्या बैठकीत निघाला.

मुंबईत होणाऱ्या बैठकीत इंडिया आघाडीच्या संयोजकपदाची नावे घोषित होणार आहे. त्याआधी ठाकरे गटाने हे मत मांडले आहे. याबाबत खासदार संजय राऊत म्हणाले की, पक्षप्रमुखांनी संयोजकपद स्वीकारू नये अशी कुठलीही अधिकृत माहिती अथवा निर्णय झाला नाही. मुंबईच्या बैठकीत संयोजकपदाबाबत निर्णय होणार आहे. २६ पक्षाचे प्रमुख नेते मुंबईत येत आहे. मुंबईच्या बैठकीत सर्व गोष्टीचा विचार होईल. त्यानंतर सर्वांना विचारात घेऊन एकमत होईल असं त्यांनी सांगितले.

तसेच विरोधात पहिली फळी, दुसरी फळी असे काही नाही. सगळे प्रमुख नेते आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जी, नितीश कुमार, अरविंद केजरीवाल हे सगळे आपापल्या पक्षाचे प्रमुख आहेत. उद्याच्या निवडणुकीत हे सगळे आपल्या पक्षाच्या प्रचारात अडकले असतील. संयोजकपद हे निरोप देणे-घेणे एवढ्यापुरते मर्यादीत नाही. एनडीएचे संयोजक जॉर्ज फर्नांडिस असतील आम्ही त्यांच्या कामाचा आवाका पाहिला आहे. इतक्या पक्षांना एकत्र ठेवणे, सांभाळणे, विविध विचारांचे पक्ष आहेत त्यांना एकत्र आणणे हे सोपे काम नसते. त्यामुळे ज्याच्यावर पक्षाची जबाबदारी नाही. तो पूर्णवेळ काम करू शकेल असा नेता यापदासाठी हवा असं आमचे मत आहे. त्याच्यावर इंडिया आघाडीच्या बैठकीत काय चर्चा होईल त्यावर निर्णय घेतला जाईल असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलं.

दरम्यान, ममता बॅनर्जी, नितीश कुमार यांच्यात स्पर्धा नाही. आधी एकत्रित निवडणूक लढणे गरजेचे आहे. कुठलेही मतभेद असता कामा नये हे सगळ्यांचे मत आहे. संयोजक हा तांत्रिक भाग आहे. ३ बैठका झाल्या कोण संयोजक आहे कुणी नाही. प्रत्येक पक्ष आम्हाला जबाबदारी द्या असं म्हणत पुढे येतोय. सर्वांना सामावून घेऊन पुढे चाललोय. अहंकार बाजूला ठेऊन आम्ही पुढे आलोय. नेत्यांच्या मनात कुठलीही अहंकाराची भावना नाही. कदाचित संयोजकपदाची गरज भासणार नाही. सामुहिक निमंत्रक नेमले जातील. परंतु हे माझे मत आहे. इंडिया आघाडीच्या बैठकीत अंतिम निर्णय होईल असंही संजय राऊतांनी स्पष्ट केले. मुंबईत ३१ ऑगस्ट, १ सप्टेंबर रोजी इंडिया आघाडीची बैठक पार पडणार आहे. 

टॅग्स :INDIA Opposition Allianceइंडिया आघाडीSanjay Rautसंजय राऊत