शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

I.N.D.I.A आघाडीचं संयोजकपद पक्षप्रमुखांना नको; ठाकरे गटाच्या बैठकीत सूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2023 17:44 IST

मुंबईत होणाऱ्या बैठकीत इंडिया आघाडीच्या संयोजकपदाची नावे घोषित होणार आहे. त्याआधी ठाकरे गटाने हे मत मांडले आहे.

मुंबई – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २६ विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडीची स्थापना केली आहे. भाजपाचा पराभव करून देशात परिवर्तन आणण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. त्यासाठी बिहारच्या पाटणा, कर्नाटकच्या बंगळुरूनंतर आता इंडिया आघाडीतील पक्षांची तिसरी महत्त्वपूर्ण बैठक मुंबईत होणार आहे. या बैठकीचं आयोजन ठाकरे गटाकडून केले जात आहे. तत्पूर्वी इंडिया आघाडीचे संयोजक पक्षप्रमुखांना बनवू नये असा सूर ठाकरे गटाच्या बैठकीत निघाला.

मुंबईत होणाऱ्या बैठकीत इंडिया आघाडीच्या संयोजकपदाची नावे घोषित होणार आहे. त्याआधी ठाकरे गटाने हे मत मांडले आहे. याबाबत खासदार संजय राऊत म्हणाले की, पक्षप्रमुखांनी संयोजकपद स्वीकारू नये अशी कुठलीही अधिकृत माहिती अथवा निर्णय झाला नाही. मुंबईच्या बैठकीत संयोजकपदाबाबत निर्णय होणार आहे. २६ पक्षाचे प्रमुख नेते मुंबईत येत आहे. मुंबईच्या बैठकीत सर्व गोष्टीचा विचार होईल. त्यानंतर सर्वांना विचारात घेऊन एकमत होईल असं त्यांनी सांगितले.

तसेच विरोधात पहिली फळी, दुसरी फळी असे काही नाही. सगळे प्रमुख नेते आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जी, नितीश कुमार, अरविंद केजरीवाल हे सगळे आपापल्या पक्षाचे प्रमुख आहेत. उद्याच्या निवडणुकीत हे सगळे आपल्या पक्षाच्या प्रचारात अडकले असतील. संयोजकपद हे निरोप देणे-घेणे एवढ्यापुरते मर्यादीत नाही. एनडीएचे संयोजक जॉर्ज फर्नांडिस असतील आम्ही त्यांच्या कामाचा आवाका पाहिला आहे. इतक्या पक्षांना एकत्र ठेवणे, सांभाळणे, विविध विचारांचे पक्ष आहेत त्यांना एकत्र आणणे हे सोपे काम नसते. त्यामुळे ज्याच्यावर पक्षाची जबाबदारी नाही. तो पूर्णवेळ काम करू शकेल असा नेता यापदासाठी हवा असं आमचे मत आहे. त्याच्यावर इंडिया आघाडीच्या बैठकीत काय चर्चा होईल त्यावर निर्णय घेतला जाईल असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलं.

दरम्यान, ममता बॅनर्जी, नितीश कुमार यांच्यात स्पर्धा नाही. आधी एकत्रित निवडणूक लढणे गरजेचे आहे. कुठलेही मतभेद असता कामा नये हे सगळ्यांचे मत आहे. संयोजक हा तांत्रिक भाग आहे. ३ बैठका झाल्या कोण संयोजक आहे कुणी नाही. प्रत्येक पक्ष आम्हाला जबाबदारी द्या असं म्हणत पुढे येतोय. सर्वांना सामावून घेऊन पुढे चाललोय. अहंकार बाजूला ठेऊन आम्ही पुढे आलोय. नेत्यांच्या मनात कुठलीही अहंकाराची भावना नाही. कदाचित संयोजकपदाची गरज भासणार नाही. सामुहिक निमंत्रक नेमले जातील. परंतु हे माझे मत आहे. इंडिया आघाडीच्या बैठकीत अंतिम निर्णय होईल असंही संजय राऊतांनी स्पष्ट केले. मुंबईत ३१ ऑगस्ट, १ सप्टेंबर रोजी इंडिया आघाडीची बैठक पार पडणार आहे. 

टॅग्स :INDIA Opposition Allianceइंडिया आघाडीSanjay Rautसंजय राऊत