शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
2
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
3
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
4
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
5
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
6
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
7
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
8
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
9
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
10
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
11
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
12
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
13
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
14
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
15
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
16
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
17
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
18
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
19
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
20
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”

भारताकडून समूह पध्दतीने संकटाचा सामना - मोहन भागवत

By admin | Updated: June 26, 2016 13:26 IST

नैसर्गिक असो अथवा अस्मानी संकट असो़ या संकटांचा सामना भारतीय नागरिक समूह पध्दतीने करुन हिमतीने उभे राहतात़ जगामध्ये मात्र असे दिसत नाही़

ऑनलाइन लोकमतलातूर, दि. २६  : नैसर्गिक असो अथवा अस्मानी संकट असो़ या संकटांचा सामना भारतीय नागरिक समूह पध्दतीने करुन हिमतीने उभे राहतात़ जगामध्ये मात्र असे दिसत नाही़ जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेतील लोक सप्टेंबर महिन्यात घराबाहेर पडत नाहीत़ कारण या महिन्यात वर्ल्डट्रेड सेंटरवर हल्ला झाला होता़ या हल्ल्याची भिती आजही त्यांच्या मनात आहे़ आपण बाँम्बस्फोट झाला तरी दुसऱ्या दिवशी घराबाहेर पडून परिस्थितीला सामोरे जातो, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी येथे रविवारी व्यक्त केले़

जलयुक्त लातूर उपक्रमातंर्गत मांजरा नदीच्या १८ किमीचे पुनरुज्जीवन करण्यात आले आहे़ या नदीपात्रात स्थिरावलेल्या पाण्याचे कलशपूजन सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते झाले़ याप्रसंगी ते बोलत होते़ यावेळी जलयुक्त लातूरचे मार्गदर्शक डॉ़ अशोक कुकडे, अ‍ॅड़ मनोहर गोमारे, अ‍ॅड़ त्र्यंबकदास झंवर, मकरंद जाधव, सुनील देशपांडे, अरुण डंके, निलेश ठक्कर आदींची उपस्थिती होती़

सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले, पर्यावरणाची जूनी दृष्टी आपणाला आहे़ पण, जून्या परंपरागत ज्ञानाची किंमत आपण केली नाही़ त्यामुळे समस्या निर्माण झाल्या आहेत़ जूने ज्ञान टाकाऊ नसते़ या ज्ञानाची परीक्षा घेऊन नवे ज्ञान स्विकारले पाहिजे़ लातूरकरांनी जलयुक्तचा प्रयोग राबवून हाच आदर्श घालून दिला आहे़ शासनावर अवलंबून न राहता स्वत:च मार्ग शोधला आहे़ शासनावर अवलंबून असणारा समाज हा शासन व समाजाला वळण लावू शकत नाही़ शासन आपण निर्माण केलेली प्रणाली आहे़ या प्रणालीवर समाज म्हणून आपला धाक असला पाहिजे़

आपला देश निसर्ग समृध्द आहे़ निसर्गाशी कसे वागावे, याचे ज्ञान आपणाला आहे़ त्यामुळे जगात सुजलाम्- सुफलाम् असलेली आपली ख्याती अद्याप डागाळलेली नाही़ शेतीचे शास्त्र आपण अनुभवातून विकसित केले आहे़ उद्भवलेल्या परिस्थितीमुळे हार पत्कारुन पळून जाणे आपला धर्म नाही़ परिस्थितीशी दोन हात करुन मार्ग शोधणे आणि हिम्मत दाखवून उभे राहणे हा आपल्या देशाचा स्वभाव आहे़ लातूरच्या पाणीटंचाईची देशभरात चर्चा झाली़ जोधपूरमध्येही लातूरची चर्चा होती़ जोधपूरवासियांनी पाण्याच्या दुर्भिक्षावर हिमतीने मार्ग शोधला़ तसाच मार्ग जलयुक्त लातूरच्या माध्यमातून लातूरकरांनी शोधला आहे़ परिस्थितीवर मात करुन उभे राहण्याचा आपला स्वभाव सिध्द केला आहे़.

मराठवाड्यात लातूर आणि देशात महाराष्ट्र अशी आपली एकसंघता आहे़ त्यातून बंधूभाव व मानवता हा विचार येतो़ देशात विविधता आणि वेगवेगळी विचारसरणी असली तरी बंधूभाव आहे़ त्यामुळेच आपण संकटाचा सामना करतो़ जलयुक्त लातूरच्या चळवळीत अशीच वेगवेगळ्या विचारधारेची माणसं एकत्र येऊन पाणी संकटाचा सामना करीत आहेत़ लातूरचे हे उदाहरण देशाला प्रेरणादायी ठरेल, असेही ते म्हणाले़

विज्ञानाच्या अंहकारामुळे परंपरागत चांगल्या ज्ञानाकडे दुर्लक्ष होत आहे़ परंतु, जुन्या ज्ञानाची परीक्षा करुन त्यातील योग्य ज्ञान स्विकारायला हवे़ परंपरागत जूनी दृष्टी टाकाऊ नसते़ याकडे लक्ष देण्याची गरज आहे़ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यावरच काम करीत असून संघ लातूरच्या जलयुक्त चळवळीसोबत आहे़ लातूरने पाणीटंचाईवर मात करणारे एक सुंदर चित्र उभे केले आहे़ हे चित्र देशाला आदर्श ठरेल, असेही मोहन भागवत म्हणाले़.प्रास्ताविक जलयुक्त चळवळीचे मुख्य मार्गदर्शक डॉ़ अशोक कुकडे यांनी केले़ सूत्रसंचालन प्राचार्य डॉ़ जोगेंद्रसिंह बिसेन यांनी केले़ आभार सुनील देशपांडे यांनी मानले़