शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली मॅच जिंकली
6
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
7
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
8
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
9
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
10
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
11
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
12
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
13
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
14
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
15
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
16
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
17
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
20
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video

India China FaceOff: सणांवरील चिनी आक्रमणाला प्रत्युत्तर हवे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2020 04:30 IST

सजावटीच्या वस्तू, फटाके, पतंग, मांजा यांचा प्रामुख्याने समावेश आहे.

मोरेश्वर मानापुरे नागपूर : चायनीज वस्तूंनी केवळ भारतीय बाजारपेठांवरच नव्हे तर आपल्या पारंपरिक सणांवरही आक्रमण केले आहे. सणांमुळे होणाऱ्या स्थानिक उलाढालीला यामुळे फटका बसत असून, जागोजागी चायनीज उत्पादनेच दिसून येतात. यात सजावटीच्या वस्तू, फटाके, पतंग, मांजा यांचा प्रामुख्याने समावेश आहे.भारतीय सणांचे आपल्या जीवनातील एकूण महत्त्व लक्षात घेता चिनी हल्ल्याला स्वदेशीच्या शस्राने प्रत्युत्तर देण्याची गरज आहे. विशेषत: समाज व सरकारी पातळीवर स्थानिक उत्पादकांना बळ देण्याचा संकल्प सोडण्याची आवश्यकता आहे, असा सूर देशाच्या सर्वच भागांमधून उमटताना दिसत आहे. भारतीय सणांच्या काळात देशात मोठी आर्थिक उलाढाल होते. चीनमधून येणाºया ‘रेडिमेड’ मालाची किंमत कमी असल्याने विक्रेते व ग्राहक आकर्षित होतात. आपल्या देशातच सजावटीची बाजारपेठ दहा हजार कोटींहून अधिक आहे. यात गणेशोत्सव, दुर्गोत्सव, लग्नसमारंभ यांच्याबरोबरच दिवाळी, दसरा, होळी यासारखे सणही आहेत. याशिवाय दिवाळीचे फटाके, होळीचे रंग, संक्रांतीच्या काळातील पतंग व मांजा चीनमधून येत आहेत. केवळ मुंबई, कोलकाता, दिल्ली ही मोठी शहरेच नव्हेत, लहान शहरांचे मार्केटही या वस्तूंनी काबीज केल्याचे चित्र आहे.>उत्सवांमध्ये नकोच चिनी मालचीनमधून येणाºया वस्तू या टिकाऊ नसतात. शिवाय त्यांची ‘गॅरंटी’ही नसते व पर्यावरणाच्या दृष्टीनेदेखील त्या धोकादायक असतात. विविध माध्यमांतून सुरू असलेल्या जागृतीमुळे बाजारात चिनी मालावरील भारतीयांचा विश्वास कमी होत असल्याचे विक्रेते मान्य करीत आहेत; परंतु चिनी मालाला १०० टक्के हद्दपार करण्यासाठी व्यापक प्रयत्नांची गरज आहे.>चिनी फटाके जीवघेणेचचिनी फटाक्यांमुळे शिवकाशीतील कारखान्यांना फटका बसला. मात्र, केंद्र सरकारच्या नियमावलीनंतर ‘नीरी’सारख्या संस्थेने स्वदेशी ‘ग्रीन क्रॅकर्स’ तयार केले. त्यामुळे आता लोक चिनी फटाक्यांकडे पाठ फिरवू लागले आहेत. देशातील फटाक्यांमुळे भारतातून दहा हजार कोटींचा निधी चिनी उत्पादकांना मिळण्यापासून वाचेल.>केंद्राने कठोरधोरण आखावेचिनी वस्तूंच्या आयातीवर प्रतिबंध लावण्याची गरज आहे. याकरिता व्यापारी सज्ज आहेत. केंद्राने कठोर धोरण आखावे.- राजू माखिजा, माजी अध्यक्ष, जनरल मर्चण्ट असोसिएशन>विक्रेते दाखवूशकतात चीनला इंगा‘कॉन्फडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्स’ने मागील वर्षी केलेल्या सर्वेक्षणात लोक आता चिनी वस्तूंकडे पाठ फिरवीत असल्याचे समोर आले होते.या वस्तूंविरोधात प्रचार-प्रसार केल्यानंतर ८ हजार कोटींऐवजी तीन हजार २०० कोटींच्या सजावटीच्या चायनीज वस्तूंची विक्री होऊ शकली होती. याशिवाय फटाके, मांजा, पतंग इत्यादीच्या विक्रीतदेखील ३० टक्क्यांहून अधिक घट झाली, असे दिसून आले होते.केंद्र सरकारने मागे चिनी मालावरील सीमाशुल्क वाढविण्याचे सूतोवाच केले होते. सद्य:स्थितीत अनेक वस्तूंवर केवळ १५ ते २० टक्केच कर आकारला जातो. या करात मोठ्या प्रमाणात वाढ केल्याशिवाय चिनी माल हद्दपार होणे शक्य नाही, असे व्यापारी वर्गाचे म्हणणे आहे.

टॅग्स :chinaचीनIndiaभारत