शहरं
Join us  
Trending Stories
1
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
2
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
3
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
4
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
6
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
7
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
8
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
9
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
10
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
11
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
12
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
13
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
14
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
15
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
16
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
17
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
18
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
19
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
20
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!

India China FaceOff: सणांवरील चिनी आक्रमणाला प्रत्युत्तर हवे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2020 04:30 IST

सजावटीच्या वस्तू, फटाके, पतंग, मांजा यांचा प्रामुख्याने समावेश आहे.

मोरेश्वर मानापुरे नागपूर : चायनीज वस्तूंनी केवळ भारतीय बाजारपेठांवरच नव्हे तर आपल्या पारंपरिक सणांवरही आक्रमण केले आहे. सणांमुळे होणाऱ्या स्थानिक उलाढालीला यामुळे फटका बसत असून, जागोजागी चायनीज उत्पादनेच दिसून येतात. यात सजावटीच्या वस्तू, फटाके, पतंग, मांजा यांचा प्रामुख्याने समावेश आहे.भारतीय सणांचे आपल्या जीवनातील एकूण महत्त्व लक्षात घेता चिनी हल्ल्याला स्वदेशीच्या शस्राने प्रत्युत्तर देण्याची गरज आहे. विशेषत: समाज व सरकारी पातळीवर स्थानिक उत्पादकांना बळ देण्याचा संकल्प सोडण्याची आवश्यकता आहे, असा सूर देशाच्या सर्वच भागांमधून उमटताना दिसत आहे. भारतीय सणांच्या काळात देशात मोठी आर्थिक उलाढाल होते. चीनमधून येणाºया ‘रेडिमेड’ मालाची किंमत कमी असल्याने विक्रेते व ग्राहक आकर्षित होतात. आपल्या देशातच सजावटीची बाजारपेठ दहा हजार कोटींहून अधिक आहे. यात गणेशोत्सव, दुर्गोत्सव, लग्नसमारंभ यांच्याबरोबरच दिवाळी, दसरा, होळी यासारखे सणही आहेत. याशिवाय दिवाळीचे फटाके, होळीचे रंग, संक्रांतीच्या काळातील पतंग व मांजा चीनमधून येत आहेत. केवळ मुंबई, कोलकाता, दिल्ली ही मोठी शहरेच नव्हेत, लहान शहरांचे मार्केटही या वस्तूंनी काबीज केल्याचे चित्र आहे.>उत्सवांमध्ये नकोच चिनी मालचीनमधून येणाºया वस्तू या टिकाऊ नसतात. शिवाय त्यांची ‘गॅरंटी’ही नसते व पर्यावरणाच्या दृष्टीनेदेखील त्या धोकादायक असतात. विविध माध्यमांतून सुरू असलेल्या जागृतीमुळे बाजारात चिनी मालावरील भारतीयांचा विश्वास कमी होत असल्याचे विक्रेते मान्य करीत आहेत; परंतु चिनी मालाला १०० टक्के हद्दपार करण्यासाठी व्यापक प्रयत्नांची गरज आहे.>चिनी फटाके जीवघेणेचचिनी फटाक्यांमुळे शिवकाशीतील कारखान्यांना फटका बसला. मात्र, केंद्र सरकारच्या नियमावलीनंतर ‘नीरी’सारख्या संस्थेने स्वदेशी ‘ग्रीन क्रॅकर्स’ तयार केले. त्यामुळे आता लोक चिनी फटाक्यांकडे पाठ फिरवू लागले आहेत. देशातील फटाक्यांमुळे भारतातून दहा हजार कोटींचा निधी चिनी उत्पादकांना मिळण्यापासून वाचेल.>केंद्राने कठोरधोरण आखावेचिनी वस्तूंच्या आयातीवर प्रतिबंध लावण्याची गरज आहे. याकरिता व्यापारी सज्ज आहेत. केंद्राने कठोर धोरण आखावे.- राजू माखिजा, माजी अध्यक्ष, जनरल मर्चण्ट असोसिएशन>विक्रेते दाखवूशकतात चीनला इंगा‘कॉन्फडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्स’ने मागील वर्षी केलेल्या सर्वेक्षणात लोक आता चिनी वस्तूंकडे पाठ फिरवीत असल्याचे समोर आले होते.या वस्तूंविरोधात प्रचार-प्रसार केल्यानंतर ८ हजार कोटींऐवजी तीन हजार २०० कोटींच्या सजावटीच्या चायनीज वस्तूंची विक्री होऊ शकली होती. याशिवाय फटाके, मांजा, पतंग इत्यादीच्या विक्रीतदेखील ३० टक्क्यांहून अधिक घट झाली, असे दिसून आले होते.केंद्र सरकारने मागे चिनी मालावरील सीमाशुल्क वाढविण्याचे सूतोवाच केले होते. सद्य:स्थितीत अनेक वस्तूंवर केवळ १५ ते २० टक्केच कर आकारला जातो. या करात मोठ्या प्रमाणात वाढ केल्याशिवाय चिनी माल हद्दपार होणे शक्य नाही, असे व्यापारी वर्गाचे म्हणणे आहे.

टॅग्स :chinaचीनIndiaभारत