शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
5
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
6
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
7
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
8
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
9
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
10
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
11
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
12
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
13
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
14
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
15
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
16
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
17
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
18
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
19
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
20
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी

भाजपसोबत गेलेल्या अपक्षांना खुणावतेय महाविकास आघाडी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2019 12:41 IST

दोन वर्षांपूर्वीच राऊत यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र जागा वाटपात ही जागा शिवसेनेकडे गेली होती. त्यामुळे त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करत विजय मिळवला. मात्र आता ते राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचे सांगण्यात येते. 

मुंबई - सत्तेसमोर सर्वकाही शून्य असं समिकरणच नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर स्थापन झालेल्या सरकारवरून स्पष्ट झाले आहे. भाजप सत्तेवर येणार या विचाराने अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तर अनेकनेते भाजपच्या छुप्या पाठिंब्यावर अपक्ष निवडून आले आणि भाजपसोबत राहिले. मात्र राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर या अपक्षांना सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीचे वेध लागल्याचे दिसून येत आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडून आलेले संजयमामा शिंदे यांनी भाजप सत्तास्थापन हे दिसताच आपला पाठिंबा जाहीर करून टाकला होता. त्यावेळी सर्वांना आश्चर्य व्यक्त केले. मात्र राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होताच, संजयमामा यांनी निर्णय बदलत राष्ट्रवादीला पाठिंबा दर्शविला. मतदार संघातील कामं करायची तर सत्तेसोबत जाणे आवश्यक आहे. या विचाराने भाजपसोबत गेलेले आमदार महाविकास आघाडीकडे वळण्याची शक्यता आहे. 

संजयमामा यांच्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत देखील राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे. विधानसभेतील महाविकास आघाडीच्या बहुमताच्या वेळी राजेंद्र राऊत हे गैरजहर होते. त्यामुळे ते भाजपमध्येच जाणार हे स्पष्ट झाले होते. मात्र पाच वर्षे विरोधात बसावे लागणार आणि त्यामुळे मतदार संघातील कामं होणार नाही, या उद्देशाने राऊत राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्यासोबत लोहा-कंधारचे आमदार श्यामसुंदर शिंदेही असल्याचे सांगण्यात जाते.

दोन वर्षांपूर्वीच राऊत यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र जागा वाटपात ही जागा शिवसेनेकडे गेली होती. त्यामुळे त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करत विजय मिळवला. मात्र आता ते राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचे सांगण्यात येते.