शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

भाजपसोबत गेलेल्या अपक्षांना खुणावतेय महाविकास आघाडी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2019 12:41 IST

दोन वर्षांपूर्वीच राऊत यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र जागा वाटपात ही जागा शिवसेनेकडे गेली होती. त्यामुळे त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करत विजय मिळवला. मात्र आता ते राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचे सांगण्यात येते. 

मुंबई - सत्तेसमोर सर्वकाही शून्य असं समिकरणच नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर स्थापन झालेल्या सरकारवरून स्पष्ट झाले आहे. भाजप सत्तेवर येणार या विचाराने अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तर अनेकनेते भाजपच्या छुप्या पाठिंब्यावर अपक्ष निवडून आले आणि भाजपसोबत राहिले. मात्र राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर या अपक्षांना सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीचे वेध लागल्याचे दिसून येत आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडून आलेले संजयमामा शिंदे यांनी भाजप सत्तास्थापन हे दिसताच आपला पाठिंबा जाहीर करून टाकला होता. त्यावेळी सर्वांना आश्चर्य व्यक्त केले. मात्र राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होताच, संजयमामा यांनी निर्णय बदलत राष्ट्रवादीला पाठिंबा दर्शविला. मतदार संघातील कामं करायची तर सत्तेसोबत जाणे आवश्यक आहे. या विचाराने भाजपसोबत गेलेले आमदार महाविकास आघाडीकडे वळण्याची शक्यता आहे. 

संजयमामा यांच्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत देखील राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे. विधानसभेतील महाविकास आघाडीच्या बहुमताच्या वेळी राजेंद्र राऊत हे गैरजहर होते. त्यामुळे ते भाजपमध्येच जाणार हे स्पष्ट झाले होते. मात्र पाच वर्षे विरोधात बसावे लागणार आणि त्यामुळे मतदार संघातील कामं होणार नाही, या उद्देशाने राऊत राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्यासोबत लोहा-कंधारचे आमदार श्यामसुंदर शिंदेही असल्याचे सांगण्यात जाते.

दोन वर्षांपूर्वीच राऊत यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र जागा वाटपात ही जागा शिवसेनेकडे गेली होती. त्यामुळे त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करत विजय मिळवला. मात्र आता ते राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचे सांगण्यात येते.