शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
2
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
3
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
4
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
5
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
6
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
7
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
8
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
9
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
10
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
11
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
12
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
13
Ahmedabad Plane Crash Live Updates: विमान अपघातातील १०० जणांचे मृतदेह मिळाले, २५ जखमींवर उपचार सुरू
14
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
15
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
16
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
17
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
18
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
19
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
20
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो

आधीच भाजपला पाठिंबा देणाऱ्या अपक्ष आमदारांची गोची !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2019 15:41 IST

ज्या पक्षाची सत्ता असेल त्या पक्षाला आपला पाठिंबा राहिल, असं त्यांनी म्हटलं आहे. मग तो पक्ष भाजप किंवा शिवसेना कोणीही असू शकतो, असंही त्यांनी नमूद केले. एकूणच सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाल्याने भाजप-शिवसेनेसह अपक्षांचीही गोची झाल्याचे दिसून येत आहे. 

मुंबई - विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून दहा दिवस उलटून गेले. मात्र अद्याप कोणत्याही पक्षाने सत्ता स्थापनेचा दावा केला नाही. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होते की, काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. मात्र शिवसेनेच्या आक्रमक भूमिकेमुळे भाजपची कोंडी झाली आहे. तर भाजपला पाठिंबा देणाऱ्या अपक्षांची देखील गोची झाली आहे. 

विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला 105 जागा मिळाल्या. तर शिवसेनेला 56 जागांवर विजय मिळाला. तर 15 हून अधिक अपक्ष निवडून आले. या अपक्ष आमदारांनी सोईस्कर आणि सत्तेसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार अपक्षांनी भाजप किंवा शिवसेनेला पाठिंबा दिला. राज्यात युतीचं सरकार येईल या आशेवर अपक्षांनी आपला पाठिंबा दर्शविला. मात्र आता सत्तेच्या चाव्या कोणाच्या हातात जाणार हे सांगणे कठीण झाले आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडून आलेले बडनेऱ्याचे आमदार रवी राणा आणि करमाळ्याचे आमदार संजय शिंदे यांनी भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. मात्र शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस सत्ता स्थापन करणार, अशी स्थिती निर्माण झाल्यामुळे या अपक्षांसमोर आधीच पाठिंबा जाहीर केलेल्या भाजपसोबत राहायचं की, सत्ता स्थापन करणाऱ्या पक्षांसोबत जायचं असा पेच निर्माण झाला आहे. 

दरम्यान संजयमामा शिंदे यांनी भाजपला पाठिंबा दिल्यानंतर आता भूमिका बदलली आहे. ते करमाळ्यातून राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर निवडून आलेले आहे. ज्या पक्षाची सत्ता असेल त्या पक्षाला आपला पाठिंबा राहिल, असं त्यांनी म्हटलं आहे. मग तो पक्ष भाजप किंवा शिवसेना कोणीही असू शकतो, असंही त्यांनी नमूद केले. एकूणच सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाल्याने भाजप-शिवसेनेसह अपक्षांचीही गोची झाल्याचे दिसून येत आहे.