शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आधीच भाजपला पाठिंबा देणाऱ्या अपक्ष आमदारांची गोची !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2019 15:41 IST

ज्या पक्षाची सत्ता असेल त्या पक्षाला आपला पाठिंबा राहिल, असं त्यांनी म्हटलं आहे. मग तो पक्ष भाजप किंवा शिवसेना कोणीही असू शकतो, असंही त्यांनी नमूद केले. एकूणच सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाल्याने भाजप-शिवसेनेसह अपक्षांचीही गोची झाल्याचे दिसून येत आहे. 

मुंबई - विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून दहा दिवस उलटून गेले. मात्र अद्याप कोणत्याही पक्षाने सत्ता स्थापनेचा दावा केला नाही. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होते की, काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. मात्र शिवसेनेच्या आक्रमक भूमिकेमुळे भाजपची कोंडी झाली आहे. तर भाजपला पाठिंबा देणाऱ्या अपक्षांची देखील गोची झाली आहे. 

विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला 105 जागा मिळाल्या. तर शिवसेनेला 56 जागांवर विजय मिळाला. तर 15 हून अधिक अपक्ष निवडून आले. या अपक्ष आमदारांनी सोईस्कर आणि सत्तेसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार अपक्षांनी भाजप किंवा शिवसेनेला पाठिंबा दिला. राज्यात युतीचं सरकार येईल या आशेवर अपक्षांनी आपला पाठिंबा दर्शविला. मात्र आता सत्तेच्या चाव्या कोणाच्या हातात जाणार हे सांगणे कठीण झाले आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडून आलेले बडनेऱ्याचे आमदार रवी राणा आणि करमाळ्याचे आमदार संजय शिंदे यांनी भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. मात्र शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस सत्ता स्थापन करणार, अशी स्थिती निर्माण झाल्यामुळे या अपक्षांसमोर आधीच पाठिंबा जाहीर केलेल्या भाजपसोबत राहायचं की, सत्ता स्थापन करणाऱ्या पक्षांसोबत जायचं असा पेच निर्माण झाला आहे. 

दरम्यान संजयमामा शिंदे यांनी भाजपला पाठिंबा दिल्यानंतर आता भूमिका बदलली आहे. ते करमाळ्यातून राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर निवडून आलेले आहे. ज्या पक्षाची सत्ता असेल त्या पक्षाला आपला पाठिंबा राहिल, असं त्यांनी म्हटलं आहे. मग तो पक्ष भाजप किंवा शिवसेना कोणीही असू शकतो, असंही त्यांनी नमूद केले. एकूणच सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाल्याने भाजप-शिवसेनेसह अपक्षांचीही गोची झाल्याचे दिसून येत आहे.