शहरं
Join us  
Trending Stories
1
Womens World Cup 2025 : W W W W..! श्रीलंकेच्या अटापट्टूनं शेवटच्या षटकात फिरवली मॅच! बांगलादेश स्पर्धेतून 'आउट'
2
उमेदवारी अर्ज दाखल करताच त्याच क्षणी २१ वर्ष जुन्या प्रकरणात RJD उमेदवाराला झाली अटक, कारण...
3
Asrani Death: 'अंग्रेजों के जमाने का जेलर' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचे निधन
4
अभिनेते असरानींची शेवटची पोस्ट, ७ दिवसांपूर्वी या अभिनेत्यासाठी इंस्टाग्रामवर लिहिले होते - "मिस यू..."
5
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
6
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
7
असरानी यांंचं महाराष्ट्राशी होतं विशेष नातं, वेळ मिळेल तेव्हा पुण्यात जाऊन करायचे 'ही' खास गोष्ट
8
'शोले'तील जेलरची भूमिका साकारण्यासाठी असरानींना हिटलरकडून कशी मिळालेली प्रेरणा? वाचा हा किस्सा
9
जवळच्या लोकांच्या उपस्थितीत असरानी यांच्यावर अंत्यसंस्कार, कुटुंबाने पूर्ण केली अभिनेत्याची 'ही' इच्छा
10
भारताचा 'छोटा पॅकेट' पुन्हा करणार 'बडा धमाका'! वैभव सूर्यवंशी आता 'या' स्पर्धेत खेळणार...
11
पुतिन-ट्रम्प यांच्या मोठी बैठक होणार; युक्रेनचे झेलेन्स्की म्हणतात- "मीही यायला तयार पण..."
12
ODI Cricket Record: चामारी अटापट्टूचा मोठा विक्रम; देशासाठी 'अशी' कामगिरी करणारी पहिलीच!
13
बिहारमध्ये महाआघाडीला आणखी एक धक्का, मित्रपक्षाची निवडणुकीतून माघार, आरजेडी- काँग्रेसवर केले गंभीर आरोप 
14
उपोषणकर्त्याला घरी का बोलवलं? संजय शिरसाट म्हणाले, "माझा आणि त्याचा प्रवासाचा वेळ सारखा होता"
15
"विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा, महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटला की..."; एकनाथ शिंदेंचा इशारा
16
LPG घेऊन जाणाऱ्या जहाजावर भीषण स्फोट; 23 भारतीयांना वाचवले, 2 बेपत्ता
17
Kawasaki: कावासाकीनं लॉन्च केली खतरनाक बाइक; किंमत महिंद्रा थारपेक्षाही जास्त!
18
21 वर्षे जुन्या दरोडा प्रकरणात RJD उमेदवाराला अटक; अर्ज दाखल करताच पोलिसांनी घेतले ताब्यात
19
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या कार्यक्रमात १० जण पडले आजारी, समोर आलं असं कारण
20
पुतण्याच्या प्रेमात आंधळी झाली दोन मुलांची आई; पोलीस ठाण्यातच कापली हाताची नस!

आधीच भाजपला पाठिंबा देणाऱ्या अपक्ष आमदारांची गोची !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2019 15:41 IST

ज्या पक्षाची सत्ता असेल त्या पक्षाला आपला पाठिंबा राहिल, असं त्यांनी म्हटलं आहे. मग तो पक्ष भाजप किंवा शिवसेना कोणीही असू शकतो, असंही त्यांनी नमूद केले. एकूणच सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाल्याने भाजप-शिवसेनेसह अपक्षांचीही गोची झाल्याचे दिसून येत आहे. 

मुंबई - विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून दहा दिवस उलटून गेले. मात्र अद्याप कोणत्याही पक्षाने सत्ता स्थापनेचा दावा केला नाही. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होते की, काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. मात्र शिवसेनेच्या आक्रमक भूमिकेमुळे भाजपची कोंडी झाली आहे. तर भाजपला पाठिंबा देणाऱ्या अपक्षांची देखील गोची झाली आहे. 

विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला 105 जागा मिळाल्या. तर शिवसेनेला 56 जागांवर विजय मिळाला. तर 15 हून अधिक अपक्ष निवडून आले. या अपक्ष आमदारांनी सोईस्कर आणि सत्तेसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार अपक्षांनी भाजप किंवा शिवसेनेला पाठिंबा दिला. राज्यात युतीचं सरकार येईल या आशेवर अपक्षांनी आपला पाठिंबा दर्शविला. मात्र आता सत्तेच्या चाव्या कोणाच्या हातात जाणार हे सांगणे कठीण झाले आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडून आलेले बडनेऱ्याचे आमदार रवी राणा आणि करमाळ्याचे आमदार संजय शिंदे यांनी भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. मात्र शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस सत्ता स्थापन करणार, अशी स्थिती निर्माण झाल्यामुळे या अपक्षांसमोर आधीच पाठिंबा जाहीर केलेल्या भाजपसोबत राहायचं की, सत्ता स्थापन करणाऱ्या पक्षांसोबत जायचं असा पेच निर्माण झाला आहे. 

दरम्यान संजयमामा शिंदे यांनी भाजपला पाठिंबा दिल्यानंतर आता भूमिका बदलली आहे. ते करमाळ्यातून राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर निवडून आलेले आहे. ज्या पक्षाची सत्ता असेल त्या पक्षाला आपला पाठिंबा राहिल, असं त्यांनी म्हटलं आहे. मग तो पक्ष भाजप किंवा शिवसेना कोणीही असू शकतो, असंही त्यांनी नमूद केले. एकूणच सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाल्याने भाजप-शिवसेनेसह अपक्षांचीही गोची झाल्याचे दिसून येत आहे.