शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

आधीच भाजपला पाठिंबा देणाऱ्या अपक्ष आमदारांची गोची !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2019 15:41 IST

ज्या पक्षाची सत्ता असेल त्या पक्षाला आपला पाठिंबा राहिल, असं त्यांनी म्हटलं आहे. मग तो पक्ष भाजप किंवा शिवसेना कोणीही असू शकतो, असंही त्यांनी नमूद केले. एकूणच सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाल्याने भाजप-शिवसेनेसह अपक्षांचीही गोची झाल्याचे दिसून येत आहे. 

मुंबई - विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून दहा दिवस उलटून गेले. मात्र अद्याप कोणत्याही पक्षाने सत्ता स्थापनेचा दावा केला नाही. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होते की, काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. मात्र शिवसेनेच्या आक्रमक भूमिकेमुळे भाजपची कोंडी झाली आहे. तर भाजपला पाठिंबा देणाऱ्या अपक्षांची देखील गोची झाली आहे. 

विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला 105 जागा मिळाल्या. तर शिवसेनेला 56 जागांवर विजय मिळाला. तर 15 हून अधिक अपक्ष निवडून आले. या अपक्ष आमदारांनी सोईस्कर आणि सत्तेसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार अपक्षांनी भाजप किंवा शिवसेनेला पाठिंबा दिला. राज्यात युतीचं सरकार येईल या आशेवर अपक्षांनी आपला पाठिंबा दर्शविला. मात्र आता सत्तेच्या चाव्या कोणाच्या हातात जाणार हे सांगणे कठीण झाले आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडून आलेले बडनेऱ्याचे आमदार रवी राणा आणि करमाळ्याचे आमदार संजय शिंदे यांनी भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. मात्र शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस सत्ता स्थापन करणार, अशी स्थिती निर्माण झाल्यामुळे या अपक्षांसमोर आधीच पाठिंबा जाहीर केलेल्या भाजपसोबत राहायचं की, सत्ता स्थापन करणाऱ्या पक्षांसोबत जायचं असा पेच निर्माण झाला आहे. 

दरम्यान संजयमामा शिंदे यांनी भाजपला पाठिंबा दिल्यानंतर आता भूमिका बदलली आहे. ते करमाळ्यातून राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर निवडून आलेले आहे. ज्या पक्षाची सत्ता असेल त्या पक्षाला आपला पाठिंबा राहिल, असं त्यांनी म्हटलं आहे. मग तो पक्ष भाजप किंवा शिवसेना कोणीही असू शकतो, असंही त्यांनी नमूद केले. एकूणच सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाल्याने भाजप-शिवसेनेसह अपक्षांचीही गोची झाल्याचे दिसून येत आहे.