पिण्याच्या पाण्याची चिंता वाढतेय

By Admin | Updated: July 2, 2016 02:42 IST2016-07-02T02:42:10+5:302016-07-02T02:42:10+5:30

तलाव क्षेत्रात अधूनमधून पाऊस डोकावत असल्याने गेल्या वर्षीच्या जून महिन्याच्या तुलनेत ५० टक्के कमी पाऊस पडला आहे़

Increasing anxiety about drinking water | पिण्याच्या पाण्याची चिंता वाढतेय

पिण्याच्या पाण्याची चिंता वाढतेय


मुंबई : मुंबईत सतत कोसळणाऱ्या पावसाने चाकरमान्यांना त्रास होत असला तरी तलाव क्षेत्रात अधूनमधून पाऊस डोकावत असल्याने गेल्या वर्षीच्या जून महिन्याच्या तुलनेत ५० टक्के कमी पाऊस पडला आहे़ त्यामुळे आवश्यक जलसाठ्याच्या आठ टक्केच साठा तलावांमध्ये जमा झाला आहे़
मान्सून यंदा मुंबईत विलंबानेच दाखल झाला़ गेल्या काही दिवसांत पावसाने विश्रांती घेतलेली नाही़ सतत कोसळणाऱ्या पावसाने मुंबईचे पाणी पाणी केले़, तरी तलाव क्षेत्र मात्र तहानलेलेच आहेत़ हा पाऊस गेल्या जून महिन्याच्या तुलनेत ५० टक्के कमीच आहे़ त्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये जेमतेम एक लाख १० हजार दशलक्ष लीटर जलसाठा असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली़
वर्षभर मुंबईला पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी १४ लाख दशलक्ष लीटर जलसाठा असणे आवश्यक आहे़ गेल्या वर्षी अपुरा पाऊस पडला होता, तरीही जून महिन्यात तलावांमध्ये तीन लाख ३८ हजार २१७ दशलक्ष लीटर जलसाठा होता़ मात्र यंदा मान्सूनच्या सुरुवातीलाच तलावांमध्ये पाऊस फिरकलेला नाही़ त्यामुळे पाण्याचे टेन्शन वाढले आहे़ (प्रतिनिधी)
मुंबईला दररोज ३७५०दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होतो़
गेल्या वर्षी आॅगस्ट महिन्यापासून २० टक्के पाणीकपात सुरू असल्याने ३२५० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा दररोज होत आहे़
मुंबईला वर्षभर पाणीपुरवठा होण्यासाठी तलावांमध्ये १ आॅक्टोबर रोजी १४ लाख दशलक्ष लीटर जलसाठा असणे अपेक्षित आहे़

Web Title: Increasing anxiety about drinking water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.