शहरं
Join us  
Trending Stories
1
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
2
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
3
तिच्यासोबतच लग्न करायचंय! तरुणाचं शोलेस्टाईल आंदोलन, पण प्रेयसीचं सत्य समजताच पायाखालची वाळू सरकली
4
'ऑपरेशन सिंदूर' नंतर भारताची पहिल्यांदाच पाकिस्तानला मदत! दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी एकमेकांशी संपर्क साधला
5
Gold Silver Price 25 August: सोन्याच्या दरात बंपर तेजी, एका दिवसात चांदी २६२७ रुपयांनी महागली; पाहा काय आहेत नवे दर?
6
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
7
'तुमच्या यूट्यूब चॅनेल्सवर माफी मागा', दिव्यांगांची खिल्ली उडवल्याप्रकरणी SC चे समय रैनासह ५ जणांना आदेश
8
काय आहे 'सलवा जुडूम' ?; ज्यावरून अमित शाहांनी विरोधकांच्या उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला घेरले
9
जाऊ डबलसीट रे लांब लांब... पण हे असं?; 'लव्ह बर्ड्स'चा आणखी एक Video तुफान व्हायरल
10
आता फक्त ३ मिनिटांत भरा ITR! 'या' कंपनीने लॉन्च देशातील पहिला AI प्लॅटफॉर्म; अंतिम मुदतही वाढली
11
Nikki Murder Case : "दोन्ही जावई मुलींच्या पार्लरमधून पैसे चोरायचे, काहीच काम करत नव्हते"; ढसाढसा रडले वडील
12
AI ची कमाल, आता म्हातारपणही रोखणार, राहाल "चिरतरुण"! काय आहे चॅटबॉट रिव्हर्स एजिंग? जाणून घ्या
13
Ola Electric Share Price: ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी; नीति आयोगाच्या वृत्ताचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?
14
गणेश चतुर्थी २०२५: राहु काळ कधी? ‘या’ शुभ मुहूर्तावर स्थापन करा गणपती; पाहा, चंद्रास्त वेळ
15
Pune: सिंहगडावरून बेपत्ता झालेला गौतम गायकवाड पाच दिवसांनी सापडला; कुठे होता, पोलिसांनी काय सांगितलं?
16
"मी कुणाच्या वाट्याला जात नाही आणि..." अजित पवारांनी घेतली संकर्षण कऱ्हाडेची फिरकी
17
अमेरिका ७, चीन ४, भारत १.., ही कोणती यादी, जिथे फक्त दोनच दिग्गजांचं आहे वर्चस्व; यातून काय मिळताहेत संकेत?
18
लहान गुंतवणुकीतून कोट्यधीश होण्यासाठी SIP का आहे बेस्ट? 'हे' ८ मुद्दे ठरतात गेमचेंजर
19
गर्लफ्रेंडशी शरीरसंबंध प्रस्थापित करताना पुरूषाचा मृत्यू, कोर्टाने प्रेमिकेला ठोठवला दंड
20
वराह म्हणजे डुक्कर नाही, तर ते यज्ञरूप आहे; वराह जयंतीनिमित्त जाणून घ्या विष्णूंचे अवतारकार्य

साखरउतारा वाढल्याने एफआरपी बेस रेट बदलला- केंद्र सरकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2018 02:08 IST

साखर उताऱ्याच्या टक्केवारीमध्ये मोठी वाढ झाल्याने उसाचा रास्त आणि किफायतशीर दर (एफआरपी) ठरविताना आकारण्यात येणाऱ्या मूळ दरात (बेस रेट) बदल केल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयाने दिली आहे.

पुणे : साखर उताऱ्याच्या टक्केवारीमध्ये मोठी वाढ झाल्याने उसाचा रास्त आणि किफायतशीर दर (एफआरपी) ठरविताना आकारण्यात येणाऱ्या मूळ दरात (बेस रेट) बदल केल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयाने दिली आहे. तसेच शेतकºयांचे हित लक्षात घेऊन साडेनऊ टक्क्यांच्या खाली साखरउतारा असल्यास शेतकºयांना साडेनऊ टक्केवारीनुसारच एफआरपीची रक्कम दिली जाईल, असेही कृषी मंत्रालयाने पत्रात म्हटले आहे.केंद्र सरकारने चालू ऊस गाळप हंगामासाठी (२०१८-१९) एफआरपीच्या बेसरेटमध्ये साडेनऊ टक्क्यांवरून दहा टक्के करण्याचा निर्णय केंद्र सरकारने दिला आहे. त्या विरोधात खासदार राजू शेट्टी यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. केंद्र सरकारने यंदाच्या गाळप हंगामात उसाचे दर प्रतिटन २ हजार ५५० वरून २ हजार ७५० रुपये केले. मात्र अशी वाढ करताना एफआरपी ठरविण्याच्या बेस रेटमधे ९.५ वरून दहा टक्के असा बदल केला. या बदलामुळे शेतकºयांना १३०० कोटी रुपयांचा फटका बसणार आहे. त्यामुळे बेसरेटमध्ये कोणत्या आधारावर बदल केला, अशी विचारणा शेट्टी यांनी सप्टेंबर २०१८ मध्ये केंद्रीय कृषी मंत्रालयाकडे केली होती. मात्र, सरकारकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने स्वाभिमानीने अ‍ॅड. योगेश पांडे, अ‍ॅड. संदीप कोरेगावे यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने राजू शेट्टी यांच्या पत्रास चार आठवड्यांत उत्तर देण्याचे आदेश नुकतेच दिले होते. त्यानुसार केंद्रीय कृषी मंत्रालयाने ७ डिसेंबरला शेट्टी यांना एफआरपीच्या बेस रेटबाबत खुलासा करणारे पत्र दिले आहे.साखरउतारा वाढला म्हणून एफआरपीचा बेस रेट साडेनऊवरून दहा टक्के केल्याचे सरकार सांगते. यामुळे तब्बल १३०० कोटी रुपयांचा फटका केवळ महाराष्ट्रातील शेतकºयांना बसेल. तसेच, साडेनऊ टक्क्यांखाली आणि दहा टक्के व त्यावरील साखरउतारा असे गट पाडण्यात आले आहे. पूर्वी एफआरपीची दुहेरी आकारणी होत नव्हती. याशिवाय साखरउतारा वाढला असेल, तर उत्पादनखर्च वाढला नाही का? कायदा सांगतो उत्पादनखर्चावर आधारित एफआरपी असावी. त्याचेदेखील पालन झाल्याचे दिसत नाही. केंद्र सरकारने एफआरपी बेस रेट वाढविण्यासाठी दिलेले कारण अशास्त्रीय आहे. शेतकºयांनी चांगले उत्पादन घेणे त्यामुळे गुन्हा ठरेल. सरकारच्या या भूमिकेविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात येईल.- खासदार राजू शेट्टी

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेRaju Shettyराजू शेट्टीNarendra Modiनरेंद्र मोदी