शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
4
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
5
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
6
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
7
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
8
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
9
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
10
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
11
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
12
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
13
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
14
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
15
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
16
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
17
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
18
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
19
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
20
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
Daily Top 2Weekly Top 5

ऐन तारुण्यात वाढतोय हृदयविकाराचा धोका

By admin | Updated: February 20, 2016 00:47 IST

वयाच्या अवघ्या २०-२५व्या वर्षी तरुणांना हृदयविकाराचा झटका येत आहे. त्याचबरोबर महिलांतही हृदयविकाराचा झटका येण्याच्या प्रमाणात अलीकडील काळात वाढ झाली आहे

पिंपरी : वयाच्या अवघ्या २०-२५व्या वर्षी तरुणांना हृदयविकाराचा झटका येत आहे. त्याचबरोबर महिलांतही हृदयविकाराचा झटका येण्याच्या प्रमाणात अलीकडील काळात वाढ झाली आहे. तरुणांची बदललेली जीवनशैली, कार्यरत असलेल्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी वाढलेली जीवघेणी स्पर्धा, खाद्यपदार्थांत झालेला बदल याचा एकत्रित परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. त्यातूनच हृदयविकाराचा झटका येण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. शहरातील क्रीडांगणे कमी झाली आहेत. क्रीडांगणे नसल्याने मुलांच्या खेळण्याच्या प्रमाणात घट झाली आहे. मैदानावरील खेळ खेळण्याचे प्रमाण कमी झाले आहे. वाढत्या तंत्रज्ञानाच्या प्रभावामुळे युवकांचा जास्तीत जास्त वेळ सोशल मीडियावर वाया जात आहे. युवक तासन्तास मोबाइल, संगणक, टीव्ही आणि व्हिडिओ गेम खेळत बसलेले दिसून येतात. खाण्याच्या पदार्थांत झालेला बदलही यामागील एक कारण ठरत आहे. दैनंदिन आहारात मोठ्या प्रमाणात फास्ट फूडचा समावेश होत आहे. मुलांवर शालेय जीवनापासून अपेक्षांचे मोठे ओझे लादले जात आहे. मुलांकडून पालकांच्या अपेक्षांत मोठी वाढ झाली आहे. पाश्चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण, अपेक्षित यश मिळविण्यासाठी सुरू असलेली जीवघेणी स्पर्धा, आहारात झालेला बदल, नोकरी - व्यवसायातील अस्थिरता याचाही परिणाम आरोग्यावर होत आहे. शिक्षण, नोकरी, व्यवसायानिमित्त तरुणांना घरापासून, कुटुंबांपासून दूर राहावे लागत आहे. त्यामुळे मानसिक व शारीरिक आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे. यातूनच हृदयरोग विकारांना आमंत्रण मिळत आहे. ग्रामीण भागातही आता हृदयविकाराच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. शहरीकरणाचा परिणाम ग्रामीण भागातील जीवनमानावरही झाला आहे. यांत्रिकीकरणामुळे कष्टाची कामे तुलनेत पूर्वीपेक्षा खूप कमी झाली आहेत. त्याचा परिणाम आरोग्यावर होत आहे. जागतिकीकरणामुळे विविध बहुराष्ट्रीय कंपन्यांनी आपल्याकडे गुंतवणूक केली. त्यात अनेकांना रोजगार मिळाला. परंतु, त्या कंपन्यांच्या वेळेनुसार काम करावे लागत असल्याने कामाच्या वेळेत खूप बदल होत आहे. खासगी कंपन्यांत टार्गेटनुसार काम करावे लागत आहे. (प्रतिनिधी)तरुणांच्या जीवनशैलीत मोठा बदल झाला आहे. आहारात फास्ट फूड,जंक फूडचे प्रमाण वाढले आहे. शालेय जीवनापासून व्यायाम करणे आवश्यक आहे. दैनंदिन आहार उत्तम असणे आवश्यक आहे. मैदानी खेळ कमी झाले आहेत. त्या तुलनेत बैठ्या खेळांत वाढ आली आहे. लहान मुलांतील स्थूलतेचे प्रमाण शालेय जीवनापासूनच कमी करणे आवश्यक आहे. यासाठी पालकांनी लक्ष देण्याची गरज आहे. - डॉ. किशोर खिलारे, वैद्यकीय अधिकारी