शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

राज्य कृषी धोरणात ‘एमएसपी’चा समावेश करा; उपमुख्यमंत्री अजित पवारांना काँग्रेसचे साकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2021 07:26 IST

तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत शेतकऱ्यांचे ७० दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. याच अनुषंगाने राज्याचे कृषी धोरण ठरविण्यासाठी सरकारने समिती गठीत केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार या समितीचे अध्यक्ष आहेत.

यवतमाळ : विदर्भ-मराठवाड्यातील पिकांसाठी ‘एमएसपी’ अर्थात किमान आधारभूत किंमत हा विषय महत्त्वाचा असल्याने त्याचा राज्याच्या कृषी धोरणात समावेश करावा, यासाठी काँग्रेसच्या नेत्यांनी रविवारी नागपुरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना साकडे घातले.तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत शेतकऱ्यांचे ७० दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. याच अनुषंगाने राज्याचे कृषी धोरण ठरविण्यासाठी सरकारने समिती गठीत केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार या समितीचे अध्यक्ष आहेत. पवार रविवारी विदर्भाच्या दौऱ्यावर होते. त्यानिमित्ताने काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, लोकमत मीडिया प्रा. लि. च्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांनी त्यांची सायंकाळी नागपुरात भेट घेतली. यावेळी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली.पश्चिम महाराष्ट्र, खान्देशपेक्षाही विदर्भ-मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी शेती उत्पादनांचे किमान आधारभूत मूल्य हा जिव्हाळ्याचा विषय आहे. विदर्भातील कापूस, सोयाबीन, धान, उडीद, मूग, तूर आदी पिकांना ‘एमएसपी’ मिळाल्यास शेतकऱ्यांना मोठा आधार मिळतो. त्यामुळे ‘एमएसपी’चा राज्याच्या कृषी धोरणात समावेश करावा. त्याबाबत केंद्र सरकारकडे शिफारस करावी. कृषी बिलात तो समाविष्ट व्हावा, यासाठी आग्रह धरावा, अशा मागण्या करण्यात आल्या.मुंबईत बोलावणार तातडीची बैठक‘एमएसपी’सह शेतकऱ्यांच्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी विदर्भ-मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या संघटना, नेते, पदाधिकारी यांची तातडीची बैठक नागपुरात बोलविण्याची मागणीही माणिकराव ठाकरे यांनी केली. त्यावर पवार यांनी लगेच प्रतिसाद देत मुंबईत लवकरच ही बैठक बोलविली जाईल, तसेच ‘एमएसपी’चा कृषी धोरणात समावेश केला जाईल, अशी ग्वाही दिली. या भेटीप्रसंगी यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार डॉ. वजाहत मिर्झा, माजी आमदार कीर्ती गांधी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष टिकाराम कोंगरे प्रामुख्याने उपस्थित होते.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारcongressकाँग्रेस