शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
4
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
5
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
6
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
7
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
8
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
9
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
10
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
11
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
12
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
13
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
14
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
15
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
16
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
17
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
18
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
19
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
20
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!

राज्यभरात दरवर्षी जातात नाहक बळी; पतंगासाठीच्या चिनी मांजामुळे पक्ष्यांवर ‘संक्रांत’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2020 09:31 IST

‘तीळगूळ घ्या, गोड-गोड बोला’ अन् पतंगासाठी साधा धागा वापरा...

मुंबई : पतंग उडविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या चिनी मांजाच्या विक्रीवर बंदी असताना सर्रास विक्री होते. संक्रांतीच्या काळात म्हणजे साधारण डिसेंबर आणि जानेवारी महिन्यांत या चिनी मांजामुळे अनेक पक्ष्यांना जीव गमवावा लागतो. ‘लोकमत’ पर्यावरण डेस्कने राज्यातील काही ठराविक शहरांची आकडेवारी मिळविली असता ही संख्या काही हजारांच्या घरात जाते. याशिवाय जखमी होणाºया पक्ष्यांची संख्या वेगळीच.

मकरसंक्रांत जवळ आली की, आकाशात उडणाºया पतंगांचे प्रमाण वाढते. यासाठी धारदार मांजाचा वापर केला जातो. काहीवेळा तर नायलॉन मांजा, तंगूस आणि गट्टू मांजा वापरला जातो. मात्र, अशा मांजामुळे मनुष्यप्राण्यासह पक्षी जखमी होतात. या पार्श्वभूमीवर २०१५ साली एका जनहित याचिकेवर न्यायालयाने घातक मांजावर बंदी घातली. २०१७ साली इकोफ्रेंडली मांजा बाजारात आला. मात्र, त्याचा फारसा सकारात्मक परिणाम झाला नाही. २०१८ साली राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने काचेचे लेपण असलेल्या नायलॉन, तंगूसच्या उत्पादनासह विक्रीवर बंदी घातली. मात्र, चिनी मांजाची विक्री अद्यापही सुरूच आहे. पतंग कटल्यानंतर तो कुठेतरी पडून जातो आणि तुटलेला मांजा लटकत राहतो. या लटकणाºया मांजात पक्ष्यांचे पाय किंवा पंख अडकतात. चिनी मांजा रसायनांनी बनविल्याने तो तोडता येत नाही. या मांजामुळे पक्ष्यांना जखम होते. अनेक वेळा ते त्यांच्या जिवावर बेतते. त्यामुळे सर्वांनी या सणाच्या काळात ‘तीळगूळ घ्या, गोड-गोड बोला’ यासोबतच पतंगासाठी साधा धागा वापरा, हा संदेश द्यावा, असे आवाहन पक्षीप्रेमींकडून केले जात आहे.२०१८ साली मकरसंक्रांतीच्या दिवशी पतंगाच्या मांजामुळे मुंबईत सुमारे ५५० पक्षी जखमी झाले. यातील ४० पक्ष्यांचा मृत्यू झाला. आधीच्या वर्षाच्या तुलनेत हे प्रमाण ५० टक्क्यांनी कमी झाले. २०१९ साली परळ येथील पशू वैद्यकीय रुग्णालयात मांजामुळे जखमी झालेल्या पक्ष्यांची संख्या १२७ होती; यातील तीन पक्ष्यांचा मृत्यू झाला होता. मकरसंक्रांतीला आम्ही आमच्या दोन रुग्णवाहिका तयार ठेवतो. यातील एक रुग्णवाहिका दक्षिण मुंबईत तैनात करण्यात येते. येथे जे पक्षी जखमी होतात; त्यावर रुग्णवाहिकेतच उपचार केले जातात, अशी माहिती परळ येथील बलघोडा रुग्णालयाचे डॉ. जे. सी. खन्ना यांनी ‘लोकमत’ला दिली.पुणे शहरात गेल्यावर्षी चिनी मांजामध्ये अडकलेले एकूण १८७ पक्षी वाचविण्यात आले. ३ पोपट, ४ घारी आणि ३ कावळे मांजामध्ये अडकून झाडावरच मेलेले आढळले. मकरसंक्रातीच्या कालावधीत एक आठवडा पुणे शहरात सुमारे ५५ पक्षी मांजामध्ये अडकल्याच्या घटना घडल्या. त्यात ८ पक्ष्यांचा मृत्यू झाला. संक्रांतीदरम्यानच्या तीन महिन्यांच्या काळात शहरात सुमारे १८७ पक्षी मांजामध्ये अडकल्याचे निदर्शनास आले. त्यात सर्वाधिक ११८ घारी, १९ पोपट आणि इतर पक्षी होते. चिनी मांजाबाबत वनविभागाकडे तक्रार करूनही कारवाई होत नसल्याची खंत पक्षीमित्र संतोष थोरात यांनी व्यक्त केली.संक्रांतीच्या काळात मांजामुळे दरवर्षी मृत्युमुखी पडणाºया पक्ष्यांची संख्या खूप आहे. याची कुठेही शास्त्रशुद्ध पद्धतीने नोंद होत नसली तरी पक्षीप्रेमींकडे उपचारासाठी आणण्यात येणाºया पक्षांच्या संख्येवरून अंदाजित आकडेवारी काढता येते. याविषयी पक्षीमित्र डॉ. किशोर पाठक म्हणाले की, ‘औरंगाबादेत ही संख्या वर्षाला पाचशेच्या घरात जाते. यापैकी निम्म्याहून अधिक पक्षी संक्रांत काळात मांजा लागून मरण पावतात.’गतवर्षी मकर संक्रांतीच्या काळात मांज्यामुळे नगर शहरासह परिसरात कबुतरे, कावळा आणि होला हे पक्षी उपचार न मिळाल्याने मरण पावले, अशी माहिती पक्षीमित्र सुधाकर कुºहाडे यांनी दिली़२०१८ साली झाडांच्या फांद्यांवर तडफडत लटकणाºया १६५ पक्ष्यांची नाशिक मनपा अग्निशमन दलाच्या जवानांनी सुटका केली होती. २०१९ साली अग्निशमन दलाने जानेवारी ते डिसेंबरपर्यंत १३८ पक्ष्यांची नायलॉनच्या सापळ्यातून सुटका केली. २०१८ साली सुमारे ७२ पक्ष्यांना जीव गमवावा लागला, तर २०१९ साली जानेवारी ते डिसेंबरपर्यंत १०० हून अधिक पक्षी मृत्युमुखी पडल्याची भीती पक्षीप्रेमींनी व्यक्त केली आहे.काय काळजी घ्याल?

  • चिनी किंवा नायलॉयनचा मांजा न वापरता पतंगासाठी साधा धागा वापरावा.
  • पतंग कटल्यानंतर तुटलेला मांजा नष्ट करा.
  • विजेच्या तारांवर अडकलेले पतंग सोडवण्याचा प्रयत्न करू नका.
  • मांजामध्ये एखादा पक्षी अडकलेला आढळल्यास पक्षीमित्र संघटनांच्या प्रतिनिधींना तातडीने संपर्क करा.
टॅग्स :Makar Sankrantiमकर संक्रांतीenvironmentपर्यावरण