शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

थेट नियुक्तीसाठी बेमुदत उपोषण

By admin | Updated: May 13, 2014 03:44 IST

राज्यात जिल्हाधिकारी, तहसील आणि इतर खात्यांच्या कार्यालयात काम करणार्‍या पदवीधर अंशकालीन कर्मचार्‍यांना शासन सेवेत थेट नियुक्ती देण्याची मागणी पदवीधर अंशकालीन कर्मचारी संघटनेने केली आहे.

 मुंबई : राज्यात जिल्हाधिकारी, तहसील आणि इतर खात्यांच्या कार्यालयात काम करणार्‍या पदवीधर अंशकालीन कर्मचार्‍यांना शासन सेवेत थेट नियुक्ती देण्याची मागणी पदवीधर अंशकालीन कर्मचारी संघटनेने केली आहे. ९ जूनपर्यंत मागण्या मान्य केल्या नाही, तर बेमुदत उपोषणाचा इशाराही संघटनेने ‘लोकमत’शी बोलताना दिला आहे. याआधी केवळ ३०० रुपये मानधनावर तहसील कार्यालयांत काम केलेल्या पदवीधर अंशकालीन कर्मचार्‍यांचा प्रश्न गेल्या १५ वर्षांपासून प्रलंबित आहे. १९७६ ते २००० सालादरम्यान हजारो पदवीधरांकडून बाँड सही करून तुटपुंज्या मानधनावर त्यांच्याकडून काम करून घेण्यात आले. मात्र तीन वर्षांनंतरही त्यांना थेट नियुक्ती देण्यात आली नाही. त्यानंतर त्यांचा लढा सुरू झाला. २००९ साली केलेल्या आंदोलनाची दखल घेत तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी संघटनेसोबत एक बैठक घेतली होती. त्यात संघटनेच्या पदाधिकार्‍यांसोबत मंत्रालयाचे सचिवही उपस्थित होते. कर्मचार्‍यांना शासन सेवेत थेट नियुक्तीची मागणी त्या वेळी करण्यात आली होती. त्या बैठकीत उमादेवी व उमाराणी यांच्या खटल्याच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असल्यामुळे थेट नियुक्ती देण्यात येत नसल्याने १० टक्के समांतर आरक्षण देऊन ४६ वर्षांपर्यंत वयाची अट शिथिल करण्यात आली. शासन निर्णयाचा फायदा घेत ४ ते ५ हजार कर्मचारी शासन सेवेत भरती झाल्याचे संघटनाच्या प्रदेश अध्यक्षा रेखा आहेरराव यांनी ‘लोकमत’ला सांगितले. त्या म्हणाल्या, अद्यापही ८ हजार कर्मचारी नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. २७ सप्टेंबर २०१० रोजी झालेल्या या धोरणाआधी सुमारे ५० टक्के कर्मचार्‍यांची वयोमर्यादा उलटली होती. त्यामुळे या धोरणाचा म्हणावा तितका फायदा कर्मचार्‍यांना झाला नाही. ३० जानेवारी २००४ साली झालेल्या शासन निर्णयानुसार, जनगणना कर्मचार्‍यांनंतर पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांचा पसंतीक्रम होता. आतापर्यंत केवळ सातार्‍यातील ८२ पदवीधर अंशकालीन कर्मचार्‍यांना थेट शासन सेवेत नियुक्ती देण्यात आली आहे. अन्यथा राज्यातील कोणत्याही जिल्ह्यात शासन निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे. कर्मचार्‍यांना विना अट थेट नियुक्ती न देता १० टक्के समांतर आरक्षण देण्यात आले आहे. (प्रतिनिधी)