शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
2
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
3
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
4
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
5
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
6
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
7
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
8
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
9
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
10
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
11
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
12
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
13
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
14
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
15
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
16
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
17
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
18
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
19
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
20
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
Daily Top 2Weekly Top 5

थेट नियुक्तीसाठी बेमुदत उपोषण

By admin | Updated: May 13, 2014 03:44 IST

राज्यात जिल्हाधिकारी, तहसील आणि इतर खात्यांच्या कार्यालयात काम करणार्‍या पदवीधर अंशकालीन कर्मचार्‍यांना शासन सेवेत थेट नियुक्ती देण्याची मागणी पदवीधर अंशकालीन कर्मचारी संघटनेने केली आहे.

 मुंबई : राज्यात जिल्हाधिकारी, तहसील आणि इतर खात्यांच्या कार्यालयात काम करणार्‍या पदवीधर अंशकालीन कर्मचार्‍यांना शासन सेवेत थेट नियुक्ती देण्याची मागणी पदवीधर अंशकालीन कर्मचारी संघटनेने केली आहे. ९ जूनपर्यंत मागण्या मान्य केल्या नाही, तर बेमुदत उपोषणाचा इशाराही संघटनेने ‘लोकमत’शी बोलताना दिला आहे. याआधी केवळ ३०० रुपये मानधनावर तहसील कार्यालयांत काम केलेल्या पदवीधर अंशकालीन कर्मचार्‍यांचा प्रश्न गेल्या १५ वर्षांपासून प्रलंबित आहे. १९७६ ते २००० सालादरम्यान हजारो पदवीधरांकडून बाँड सही करून तुटपुंज्या मानधनावर त्यांच्याकडून काम करून घेण्यात आले. मात्र तीन वर्षांनंतरही त्यांना थेट नियुक्ती देण्यात आली नाही. त्यानंतर त्यांचा लढा सुरू झाला. २००९ साली केलेल्या आंदोलनाची दखल घेत तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी संघटनेसोबत एक बैठक घेतली होती. त्यात संघटनेच्या पदाधिकार्‍यांसोबत मंत्रालयाचे सचिवही उपस्थित होते. कर्मचार्‍यांना शासन सेवेत थेट नियुक्तीची मागणी त्या वेळी करण्यात आली होती. त्या बैठकीत उमादेवी व उमाराणी यांच्या खटल्याच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असल्यामुळे थेट नियुक्ती देण्यात येत नसल्याने १० टक्के समांतर आरक्षण देऊन ४६ वर्षांपर्यंत वयाची अट शिथिल करण्यात आली. शासन निर्णयाचा फायदा घेत ४ ते ५ हजार कर्मचारी शासन सेवेत भरती झाल्याचे संघटनाच्या प्रदेश अध्यक्षा रेखा आहेरराव यांनी ‘लोकमत’ला सांगितले. त्या म्हणाल्या, अद्यापही ८ हजार कर्मचारी नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. २७ सप्टेंबर २०१० रोजी झालेल्या या धोरणाआधी सुमारे ५० टक्के कर्मचार्‍यांची वयोमर्यादा उलटली होती. त्यामुळे या धोरणाचा म्हणावा तितका फायदा कर्मचार्‍यांना झाला नाही. ३० जानेवारी २००४ साली झालेल्या शासन निर्णयानुसार, जनगणना कर्मचार्‍यांनंतर पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांचा पसंतीक्रम होता. आतापर्यंत केवळ सातार्‍यातील ८२ पदवीधर अंशकालीन कर्मचार्‍यांना थेट शासन सेवेत नियुक्ती देण्यात आली आहे. अन्यथा राज्यातील कोणत्याही जिल्ह्यात शासन निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे. कर्मचार्‍यांना विना अट थेट नियुक्ती न देता १० टक्के समांतर आरक्षण देण्यात आले आहे. (प्रतिनिधी)