शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
3
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
4
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
5
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
6
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
7
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
8
आयोग नव्हे, मतदारच राजा !
9
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
10
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
11
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
12
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
13
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
14
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
15
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
16
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
17
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
18
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
19
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
20
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई

दोन दिवसांत तिप्पट वाढले अवकाळीचे नुकसान क्षेत्र, राज्यातील चार लाख हेक्टरवरील पिकांना तडाखा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2023 09:58 IST

Unseasonal Rain In Maharashtra: राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे प्राथमिक अंदाजानुसार २२ जिल्ह्यातील चार लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे.

मुंबई - राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे प्राथमिक अंदाजानुसार २२ जिल्ह्यातील चार लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. राज्यात २६ ते २८ नोव्हेंबर या तीन दिवसांत झालेल्या अवकाळीमुळे नुकसान झालेल्या क्षेत्राची ही आकडेवारी असून दोन दिवसांतच हा आकडा तिप्पट वाढला आहे. दोन दिवसांपूर्वी १६ जिल्ह्यातील अंदाजे एक लाख हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याचे जाहीर करण्यात आले होते.दोन दिवसांपूर्वीच्या आकडेवारीनुसार बुलढाणा आणि नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले होते. मात्र, नव्याने समोर आलेल्या आकडेवारीनुसार यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले असून त्या खालोखाल हिंगोली, बुलढाणा जिल्ह्याचा क्रमांक आहे. शासनाच्या अंदाजानुसार हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

पश्चिम विदर्भात अवकाळी पावसाचा फेरा अकोला: पश्चिम विदर्भात चौथ्या दिवशीही अवकाळी पाऊस सुरूच आहे. वऱ्हाडात कापूस, तूर पिकाचे मोठे नुकसान झाले असून वाशिम जिल्ह्यात २५ मेंढरांचा गाळात फसून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अकोला, बुलढाणासह वाशिम जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. भाजीपाला आणि रब्बी पिकांनाही या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे.

मंत्री शेतात गेले तरच भले होते का? जरांगेंचा सवालवडीगोद्री (जि. जालना) :  मंत्री शेतात पाहणी करण्यासाठी गेले तरच शेतकऱ्यांचे चांगले होते असे काही नाही. प्रशासनाने तातडीने पंचनामे करून अहवाल द्यावा. शासनाने तातडीने  मदत शेतकऱ्यांना द्यावी, अशी मागणी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे - पाटील यांनी केली. मंत्री भुजबळ यांच्या नुकसानग्रस्त पीक पाहणीवेळी मराठा समाजाने विरोध दर्शविला होता. 

 

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीMaharashtraमहाराष्ट्र