शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
3
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
4
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
5
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
6
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
7
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
8
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
9
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
10
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
11
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
12
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
13
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
14
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!
15
सोन्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा? SBI ची मोठी मागणी, म्हणाले घरांमध्ये पडून असलेलं सोनं..
16
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
17
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
18
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
19
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
20
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन

दोन दिवसांत तिप्पट वाढले अवकाळीचे नुकसान क्षेत्र, राज्यातील चार लाख हेक्टरवरील पिकांना तडाखा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2023 09:58 IST

Unseasonal Rain In Maharashtra: राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे प्राथमिक अंदाजानुसार २२ जिल्ह्यातील चार लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे.

मुंबई - राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे प्राथमिक अंदाजानुसार २२ जिल्ह्यातील चार लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. राज्यात २६ ते २८ नोव्हेंबर या तीन दिवसांत झालेल्या अवकाळीमुळे नुकसान झालेल्या क्षेत्राची ही आकडेवारी असून दोन दिवसांतच हा आकडा तिप्पट वाढला आहे. दोन दिवसांपूर्वी १६ जिल्ह्यातील अंदाजे एक लाख हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याचे जाहीर करण्यात आले होते.दोन दिवसांपूर्वीच्या आकडेवारीनुसार बुलढाणा आणि नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले होते. मात्र, नव्याने समोर आलेल्या आकडेवारीनुसार यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले असून त्या खालोखाल हिंगोली, बुलढाणा जिल्ह्याचा क्रमांक आहे. शासनाच्या अंदाजानुसार हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

पश्चिम विदर्भात अवकाळी पावसाचा फेरा अकोला: पश्चिम विदर्भात चौथ्या दिवशीही अवकाळी पाऊस सुरूच आहे. वऱ्हाडात कापूस, तूर पिकाचे मोठे नुकसान झाले असून वाशिम जिल्ह्यात २५ मेंढरांचा गाळात फसून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अकोला, बुलढाणासह वाशिम जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. भाजीपाला आणि रब्बी पिकांनाही या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे.

मंत्री शेतात गेले तरच भले होते का? जरांगेंचा सवालवडीगोद्री (जि. जालना) :  मंत्री शेतात पाहणी करण्यासाठी गेले तरच शेतकऱ्यांचे चांगले होते असे काही नाही. प्रशासनाने तातडीने पंचनामे करून अहवाल द्यावा. शासनाने तातडीने  मदत शेतकऱ्यांना द्यावी, अशी मागणी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे - पाटील यांनी केली. मंत्री भुजबळ यांच्या नुकसानग्रस्त पीक पाहणीवेळी मराठा समाजाने विरोध दर्शविला होता. 

 

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीMaharashtraमहाराष्ट्र