शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आगामी निवडणुकीत 'तोच' फॉर्म्युला कायम राहील, त्यात...; शिवसेनेचा BJP ला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2023 14:18 IST

महाविकास आघाडीसोबत विशेषत: उद्धव ठाकरेंचे राष्ट्रवादीसोबत जाणे हे आम्हाला शिवसेनेच्या प्रवासासाठी घातक वाटले असा आरोप खासदार गजानन किर्तीकर यांनी केला.

नवी दिल्ली - राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली. त्यात शिंदे-ठाकरे संघर्ष पाहायला मिळाला. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला मिळाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेची पक्षबांधणी सुरू झाली. मात्र तोच शिंदे गटाला केवळ ४८-५० जागा निवडणुकीत दिल्या जातील असं विधान भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले होते. त्यावरून आता नुकतेच संसदीय नेतेपदी निवड झालेल्या खासदार गजानन किर्तीकरांनी स्पष्ट शब्दात उत्तर दिले आहे. 

खासदार गजानन किर्तीकर म्हणाले की, लोकसभा, विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपा २०१९ ला एकत्र लढली. महाराष्ट्रात १२६ शिवसेना आणि १६२ जागा भाजपा लढली. त्यातील भाजपाचे १०२ तर आमचे ५६ आले. लोकसभेलाही ४८ पैकी २२-२६ फॉर्म्युला होता. हाच फॉर्म्युला तसाच राहिला पाहिजे. काही जागांवर चर्चा होईल. परंतु आकडा बदलणार नाही. ही शिवसेना इतकी कमजोर नाही हे लक्षात ठेवावे असं त्यांनी म्हटलं आहे. 

उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीवर नाराजबाळासाहेबांची शिवसेना आमच्या मनात कोरली आहे. उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीचा आम्हाला त्रास होत होता. बाळासाहेबांच्या विचारांशी फारकत घेतली जात होती. आम्ही वारंवार सांगत होतो पण बदल होत नव्हता. काही ठराविक लोकांनी त्यांना घेरले होते. त्यापद्धतीची कार्यपद्धती सुरू होती. आम्ही बाळासाहेबांसोबत काम केले आहे. अमोल आदित्य ठाकरेंसोबत काम करतोय त्यामुळे त्याला काही माहिती नाही. मी इतकी वर्ष शिवसेनेत स्थापन झाल्यापासून काम करतोय. संघटना बांधणीसाठी काम करतोय हा अनुभव घेतल्यानंतर शिवसेना आमच्या मनातील पुसट होत चालली होती. महाविकास आघाडीसोबत विशेषत: उद्धव ठाकरेंचे राष्ट्रवादीसोबत जाणे हे आम्हाला शिवसेनेच्या प्रवासासाठी घातक वाटले. या सर्व गोष्टीचा आम्हाला त्रास होत होता म्हणून आम्ही हा उठाव केला असं गजानन किर्तीकरांनी म्हटलं. 

शिवसेनेचा व्हिप 'त्यांना' लागू होत नाहीशिवसेना जो पक्ष आहे ज्याचे नेतृत्व एकनाथ शिंदे करत आहेत. आता हा पक्ष NDA चा घटक पक्ष व्हावा यासाठी संजय राऊतांना काढावे लागले. त्यांच्याजागी माझी नेमणूक करावी लागली. हा तांत्रिक मुद्दा आहे. लोकसभेत १३ खासदार स्वखुशीने सभापतींना पत्र देऊन शिवसेनेत आले. राज्यात सत्तासंघर्ष झाला. व्हिप लागू होत नाही हे माझे मत आहे. परंतु विधिज्ञ जास्त अनुभवाने सांगतील असंही किर्तीकरांनी सांगितले आहे.  

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाGajanan Kirtikarगजानन कीर्तीकरUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपा