शहरं
Join us  
Trending Stories
1
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
2
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
3
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
4
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
5
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
6
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
7
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
8
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
9
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
10
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
11
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
12
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
13
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
14
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
15
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
16
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
17
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
18
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
19
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
20
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)

आगामी निवडणुकीत 'तोच' फॉर्म्युला कायम राहील, त्यात...; शिवसेनेचा BJP ला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2023 14:18 IST

महाविकास आघाडीसोबत विशेषत: उद्धव ठाकरेंचे राष्ट्रवादीसोबत जाणे हे आम्हाला शिवसेनेच्या प्रवासासाठी घातक वाटले असा आरोप खासदार गजानन किर्तीकर यांनी केला.

नवी दिल्ली - राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली. त्यात शिंदे-ठाकरे संघर्ष पाहायला मिळाला. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला मिळाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेची पक्षबांधणी सुरू झाली. मात्र तोच शिंदे गटाला केवळ ४८-५० जागा निवडणुकीत दिल्या जातील असं विधान भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले होते. त्यावरून आता नुकतेच संसदीय नेतेपदी निवड झालेल्या खासदार गजानन किर्तीकरांनी स्पष्ट शब्दात उत्तर दिले आहे. 

खासदार गजानन किर्तीकर म्हणाले की, लोकसभा, विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपा २०१९ ला एकत्र लढली. महाराष्ट्रात १२६ शिवसेना आणि १६२ जागा भाजपा लढली. त्यातील भाजपाचे १०२ तर आमचे ५६ आले. लोकसभेलाही ४८ पैकी २२-२६ फॉर्म्युला होता. हाच फॉर्म्युला तसाच राहिला पाहिजे. काही जागांवर चर्चा होईल. परंतु आकडा बदलणार नाही. ही शिवसेना इतकी कमजोर नाही हे लक्षात ठेवावे असं त्यांनी म्हटलं आहे. 

उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीवर नाराजबाळासाहेबांची शिवसेना आमच्या मनात कोरली आहे. उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीचा आम्हाला त्रास होत होता. बाळासाहेबांच्या विचारांशी फारकत घेतली जात होती. आम्ही वारंवार सांगत होतो पण बदल होत नव्हता. काही ठराविक लोकांनी त्यांना घेरले होते. त्यापद्धतीची कार्यपद्धती सुरू होती. आम्ही बाळासाहेबांसोबत काम केले आहे. अमोल आदित्य ठाकरेंसोबत काम करतोय त्यामुळे त्याला काही माहिती नाही. मी इतकी वर्ष शिवसेनेत स्थापन झाल्यापासून काम करतोय. संघटना बांधणीसाठी काम करतोय हा अनुभव घेतल्यानंतर शिवसेना आमच्या मनातील पुसट होत चालली होती. महाविकास आघाडीसोबत विशेषत: उद्धव ठाकरेंचे राष्ट्रवादीसोबत जाणे हे आम्हाला शिवसेनेच्या प्रवासासाठी घातक वाटले. या सर्व गोष्टीचा आम्हाला त्रास होत होता म्हणून आम्ही हा उठाव केला असं गजानन किर्तीकरांनी म्हटलं. 

शिवसेनेचा व्हिप 'त्यांना' लागू होत नाहीशिवसेना जो पक्ष आहे ज्याचे नेतृत्व एकनाथ शिंदे करत आहेत. आता हा पक्ष NDA चा घटक पक्ष व्हावा यासाठी संजय राऊतांना काढावे लागले. त्यांच्याजागी माझी नेमणूक करावी लागली. हा तांत्रिक मुद्दा आहे. लोकसभेत १३ खासदार स्वखुशीने सभापतींना पत्र देऊन शिवसेनेत आले. राज्यात सत्तासंघर्ष झाला. व्हिप लागू होत नाही हे माझे मत आहे. परंतु विधिज्ञ जास्त अनुभवाने सांगतील असंही किर्तीकरांनी सांगितले आहे.  

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाGajanan Kirtikarगजानन कीर्तीकरUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपा